शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमदार माजलेत असं बाहेर म्हटलं जातंय, राजकारणाच्या पलीकडे जाणार की नाही?"; CM फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं
2
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
3
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
4
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
5
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
6
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
7
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 
8
"जितेंद्र आव्हाड राजकारणातून बाहेर पडले तर मला आवडेल, कारण...", पत्नी ऋता नेमकं काय म्हणाल्या?
9
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार; चांदीत ₹१३०० ची तेजी
10
Sara Ali Khan : फॅट टू फिट! ९६ किलो वजनाच्या साराने कसं कमी केलं तब्बल ४५ किलो वजन? 'हे' आहे टॉप सीक्रेट
11
'करेंगे दंगे चारों ओर', महाराष्ट्र विधानसभेतील हाणामारीवर कुणाल कामराने टीका केली; व्हिडीओ व्हायरल
12
Lunchbox Recipe: झटपट तयार होणारी 'पडवळ करी' एकदा ट्राय करा, दोन घास जास्तच जातील!
13
पाकव्याप्त काश्मीरमध्ये दिसला मसूद अजहर; आता बिलावल भुट्टो आपला शब्द खरा करणार का?
14
विदेशी सट्टेबाजांचा वायदे बाजारावर डाव, छोट्या गुंतवणूकदारांनो सजगतेनं करा बचाव!
15
विधिमंडळ परिसरात धक्काबुक्की प्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी निर्णय दिला, दोषींवर होणार अशी कारवाई 
16
सोन्याची झळाळी कमी होणार, चांदीची चमक मात्र वाढणार; १३ टक्क्यांच्या तेजीचा अंदाज, किती जाऊ शकतो भाव?
17
शाहरुख खानच्या मेकअप रुमबाहेर काढला फोटो, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केला आनंद
18
"मोदींच्या नेतृत्वाखाली २०२९ निवडणूक लढवावी लागणे ही भाजपची मजबुरी"; भाजप खासदाराचे विधान
19
रेफ्रिजरेटर आणि वॉशिंग मशीन मार्केटमध्ये रिलायन्सची एन्ट्री, १०० वर्ष जुनी अमेरिकन कंपनी केली खरेदी
20
Narendra Modi : "बिहारला लुटलं, बदला घेतला..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेस-राजदवर जोरदार हल्लाबोल

धक्कादायक ! प्रत्येक वर्षी 100 हून अधिक जवान करतायेत आत्महत्या

By admin | Updated: March 11, 2017 08:59 IST

देशात प्रत्येक वर्षी 100 हून अधिक जवान आत्महत्या करत आहेत, अशी धक्कादायक आणि तितकीच गंभीर माहिती समोर आली आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 11 - देशात प्रत्येक वर्षी 100 हून अधिक जवान आत्महत्या करत आहेत, अशी धक्कादायक आणि तितकीच गंभीर माहिती समोर आली आहे. 2016 मध्ये विविध परिस्थितींच्या पार्श्वभूमीवर 125 जवानांनी आत्महत्या करत स्वतःचे आयुष्य संपवले आहे. संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी शुक्रवारी लोकसभेत ही माहिती दिली आहे.  
 
'101 सैनिक, 19 एअरमन आणि 5  खलाशांनी गेल्या वर्षी आत्महत्या केली', अशी माहिती सुभाष भामरे यांनी लोकसभेत दिली. याव्यतिरिक्त जवानांच्या हत्येच्या तीन गंभीर घटनाही समोर आल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, जानेवारी 2017 पासून ते आतापर्यंत 13 जवानांनी आत्महत्या केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. दुर्गम भागात देशाच्या सेवेसाठी तत्पर असलेले सैनिक तणावाखाली येऊन आत्महत्या करत असल्याचे म्हटले जात आहे. 
 
भामरे यांनी सांगितले की,  सरकारकडून या समस्यांवर उपाय काढण्याच्या दिशेने अनेक पाऊले उचलण्यात आली आहेत.  यात उपजीविकेची स्थिती, चांगले राहणीमान आणि नातेवाईकांसाठी चांगल्या सुविधा याचाही उपाययोजनेत समावेश आहे. शिवाय, ताण कमी करण्यासाठी जवानांसाठी योग आणि मेडिटेशन कार्यक्रमांचीही सुरुवात करण्यात आली आहे.  या कार्यक्रमांतर्गत जवानांसहीत त्यांच्या कुटुंबीयांचेही समुपदेशन करण्यात येते. 
 
या मोहीमेत मानसोपचारतज्ज्ञांचीही मदत घेण्यात येत आहे. एका अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, आताच्या काळात जवानांचा कुटुंबीयांशी मोबाइल फोनद्वारे थेट संपर्क होत आहे, त्यामुळे अनेकदा जवानांमध्ये तणावात असतात. 
 
(लष्करी तळांची सुरक्षा अद्यापही रामभरोसेच)
दुसरीकडे, भारतातील लष्करी तळांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतरही संरक्षण मंत्रालयाने तेथील सुरक्षेच्या दृष्टीने काहीच पावले उचलली नसल्याचे निदर्शनास आले आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते निवृत्त मेजर जनरल भुवन चंद्र खंडुरी यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या संसदेच्या उच्चस्तरीय समितीनेच हा निष्कर्ष काढला आहे. सुरक्षेशी संबंधित मुद्द्यांवरुन समितीने सादर केलेल्या अहवालात संरक्षण मंत्रालयावर ताशेरे ओढण्यात आले आहेत. पठाणकोट दहशतवादी हल्ल्यानंतरही संरक्षण मंत्रालयाकडून महत्त्वाची व आवश्यक अशी कोणतीही पावले उचलण्यात आली नाहीत, असे समितीने म्हटले आहे. 
 
पंजाबमधील पठाणकोट तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये भारताचे सात जवान शहीद झाले होते. संसदीय समितीने म्हटले आहे की सुरक्षेत सुधारणा करण्यासाठी लेफ्टनंट जनरल फिलीप काम्पोज यांनी मे 2016 मध्येच आपला अहवाल सोपवला होता. मात्र त्यानंरही संरक्षण मंत्रालयाने कोणतीही हालचाल केल्याचे दिसलेले नाही. संसदेत गुरुवारी सादर केलेल्या अहवालात म्हटले की, पठाणकोट आणि उरी हल्ल्यावेळी परिस्थिती जितकी गंभीर होती, तशीच परिस्थिती आजही कायम आहे. लेफ्टनंट जनरल काम्पोज यांचा अहवाल सादर होऊन 6 ते 7 महिने झाले तरी अद्याप ठोस निर्णय किंवा पाऊल उचलण्यात आल्याचे दिसत नाही.