शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

धक्कादायक ! चेन्नईजवळ 50 भटक्या कुत्र्यांची जाळून हत्या

By admin | Updated: June 15, 2016 12:10 IST

चेन्नईपासून शहरापासून 50 किमी अंतरावर असलेल्या किझामूर गावात 50 भटक्या कुत्र्यांना जाळून ठार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे

ऑनलाइन लोकमत - 
चेन्नई, दि. 15 - शहरापासून 50 किमी अंतरावर असलेल्या किझामूर गावात 50 भटक्या कुत्र्यांना जाळून ठार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कुत्र्यांना मारण्याआधी त्यांच्या जेवणात किटकनाशक औषध मिसळण्यात आलं होतं. मेंढ्या, बक-यांवर कुत्र्यांनी हल्ला केल्यांच्या रागातून काही गावक-यांनी हे कृत्य केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 
 
एका गावक-याने प्राणीमित्र पी अस्वथ यांना याबद्दल माहिती दिल्यानंतर चार दिवसानंतर ही घटना उजेडात आली. अस्वथ यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी चार गावक-यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये मुरली, मुथू, मुरुगदोस आणि जीवा या गावक-यांचा समावेश आहे. आमच्या मेंढ्या, बक-या चरत असताना काही कुत्र्यांनी त्यांच्यावर हल्ला करुन त्यांना जखमी केल्याचं गावक-यांनी सांगितलं असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 
 
'मी जेव्हा पंचायतीचे प्रमुख आणि इतरांना याबद्दल विचारलं तेव्हा त्यांनी सर्व आरोप फेटाळले. मात्र 50 हून जास्त कुत्र्यांची हत्या झाली आहे हे सिद्ध करण्यासाठी माझ्याकडे पुरावे आहेत', असं अस्वथ यांनी सांगितलं आहे. 
 
'पोलिसांकडे जेव्हा मी पहिल्यांदा गेलो होतो तेव्हा त्यांनी हे प्रकरण गंभीरपणे घेतलं नव्हतं. त्यांना कदाचित गावक-यांची बाजू पटली होती. पण कुत्र्यांना विष देऊन नंतर केरोसिन टाकून जाळण्यात आलं होतं. मी घटनास्थळी जाऊन पाहणी केली तेव्हा काही मृतदेह अर्धे जळालेल्या अवस्थेत होते, अखेर मी ते सर्व मृतदेह गोळा करुन जाळले', असल्याचंही अस्वथ यांनी सांगितलं आहे.