शहरं
Join us  
Trending Stories
1
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
2
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
3
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
4
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
5
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
6
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
7
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
8
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
9
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
10
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)
11
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
12
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
13
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
14
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
15
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
16
BCCI New Rules For IPL Celebration : बंगळुरुमधील 'त्या' दुर्घटनेनंतर आता BCCI नं घेतला मोठा निर्णय
17
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
18
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
19
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
20
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?

शिवसेनेची भूमिका निर्णायक (पदवीधर विश्लेषण) पदवीधर निवडणूक : कॉँग्रेसच्या पथ्यावर; भाजपाला मारक

By admin | Updated: January 31, 2017 02:06 IST

प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यावर येऊन ठेपलेल्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या तोंडावर राज्यात शिवसेनेने भाजपाशी युती तोडण्याची केलेल्या घोषणेमुळे या निवडणुकीची सारी राजकीय गणितं बदलण्याची शक्यता निर्माण झाली असून, शिवसेनेने भाजपाला मदत न करण्याचे जाहीर करून मग कोणाच्या बाजूने कौल देणार हे गुलदस्त्यात ठेवल्यामुळे ज्याप्रमाणे कॉँग्रेस उत्साहित झाली आहे, अगदी त्याच धर्तीवर राष्ट्रवादी कॉँग्रेसने शेवटच्या टप्प्यात प्रचारातून अंग काढून घेतल्याने भाजपालाही हायसे वाटले आहे. त्यामुळे नेहमीपेक्षा काहीशा वेगळ्या वळणावर पोहोचलेल्या या निवडणुकीने अखेरच्या क्षणी उत्कंठा वाढविली आहे.

प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यावर येऊन ठेपलेल्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या तोंडावर राज्यात शिवसेनेने भाजपाशी युती तोडण्याची केलेल्या घोषणेमुळे या निवडणुकीची सारी राजकीय गणितं बदलण्याची शक्यता निर्माण झाली असून, शिवसेनेने भाजपाला मदत न करण्याचे जाहीर करून मग कोणाच्या बाजूने कौल देणार हे गुलदस्त्यात ठेवल्यामुळे ज्याप्रमाणे कॉँग्रेस उत्साहित झाली आहे, अगदी त्याच धर्तीवर राष्ट्रवादी कॉँग्रेसने शेवटच्या टप्प्यात प्रचारातून अंग काढून घेतल्याने भाजपालाही हायसे वाटले आहे. त्यामुळे नेहमीपेक्षा काहीशा वेगळ्या वळणावर पोहोचलेल्या या निवडणुकीने अखेरच्या क्षणी उत्कंठा वाढविली आहे.
पदवीधर मग ते कोणत्याही क्षेत्रातील असो, त्यांच्या प्रश्नांना विधीमंडळात मांडून शासनाकडून अपेक्षित असलेले निर्णय पदरात पाडून घेण्यासाठी या मतदारसंघाला प्रतिनिधित्व देण्यात आलेले आहे. पारंपरिकपणे भाजपाच्या ताब्यात असलेल्या हा मतदारसंघ सात वर्षांपूर्वी कॉँग्रेसने आपल्याकडे खेचून घेत डॉ. सुधीर तांबे यांच्या ताब्यात दिला असून, आत्ताही निवडणुकीच्या रिंगणात शिक्षक लोकशाही आघाडीच्या पाठिंब्यावर कॉँग्रेसकडून तांबे हेच रिंगणात आहेत, तर भाजपाने गेल्या दोन निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी डॉ. प्रशांत पाटील यांना उमेदवारी दिली आहे. वरकरणी या दोन्ही पक्षांमध्येच ही लढत दिसत असली तरी अन्य राजकीय पक्षांचीही भूमिका तितकीच महत्त्वाची आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी राज्यात कॉँग्रेस व राष्ट्रवादीने आघाडी केल्यामुळे डॉ. तांबे यांच्या पाठीशी राष्ट्रवादी पूर्ण ताकदीने उभी राहण्याची व्यक्त केलेली अपेक्षा फोल ठरली आहे. त्यामागच्या अनेक कारणांपैकी एक कारण म्हणजे जिल्हा परिषद व महापालिका निवडणुकीत कॉँग्रेसने आघाडी करण्यासाठी चालविलेली टाळटाळ हे होय. त्यामुळे राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते अंग मोडून प्रचारात सहभागी झालेले दिसत नाहीत, त्यामागे आणखी दुसरे कारण म्हणजे तुरुंगात असलेले राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्याकडून अद्याप कार्यकर्त्यांना निरोप आलेला नाही. या दोन्ही बाबी डॉ. तांबे यांच्या अडचणी वाढविणार्‍या व भाजपाला उत्साहित करणार्‍या असल्या तरी, शिवसेनेने भाजपाबरोबर तोडलेल्या युतीमुळे कॉँग्रेसला हायसे वाटणे स्वाभाविक आहे. सेना-भाजपात सध्या असलेले वैर पाहता, भाजपाच्या पराभवासाठी सैनिक त्वेषाने पेटून उठतील अशीच रणनिती कॉँग्रेसने आखली आहे. त्यामुळे शिवसेनेची भूमिका जशी भाजपासाठी महत्त्वाची आहे, तशीच ती कॉँग्रेससाठीही तितकीच आशादायी आहे.
या निवडणुकीच्या प्रचारासाठी अवघे दोन दिवस शिल्लक असून, दोन्ही पक्षांनी मतदारांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत असल्याचे दावे करून स्वत:ची समजूत काढण्याचा प्रयत्न चालविला असला तरी, निवडणुकीच्या रिंगणात तिसर्‍या आघाडीचे कॉ. प्रकाश देसले यांनीदेखील कॉँग्रेस व भाजपापुढे पर्याय उभा केलेला आहे. त्यामुळे या निवडणुकीत एरव्ही राजकीय मुद्द्याला फारसे महत्त्व देण्यात आलेले नाही, यंदा मात्र राजकीय मुद्द्यावरच ही निवडणूक लढविली जात आहे. पदवीधरांचे प्रश्न अनेक आहेत, त्याची चर्चा या प्रचारात झाली नाही, फक्त शिक्षक हाच एकमेव पदवीधर असल्याच्या समजातून फक्त शैक्षणिक संस्थांवरच सार्‍यांनी लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे कोणत्या संस्थावर कोणाचे वर्चस्व आहे त्यावरच निवडणुकीचे गणितं मांडले जात आहेत. या निवडणुकीच्या माध्यमातूनच भविष्यातील शिक्षक मतदारसंघाचेही भवितव्य अजमाविले जाणार असल्याने राजकीय पक्षांनी त्या दृष्टीने या निवडणुकीकडे पाहण्यास सुरुवात केली आहे. घोडा मैदान जवळच असून, केंद्रात व राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपाला मतदार अनुकूलता दर्शवितात की, सरकारवरील नाराजीतून कॉँग्रेसला जवळ करतात हे लवकरच स्पष्ट होणार आहे.