शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
4
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
5
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
6
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
7
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
8
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
9
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
10
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
11
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
12
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
13
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
14
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
15
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
16
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
17
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
18
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
19
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
20
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...

तिकिटासाठी शिवसेनेत शह-काटशह

By admin | Updated: September 23, 2014 00:30 IST

कळवा-मुंब्य्रात आव्हाडांना घेरण्याच्या नादात आता शिवसेनेकडून या मतदारसंघात काँग्रेसमधील इच्छुकाने मुलाखत दिली आहे

ठाणे : कळवा-मुंब्य्रात आव्हाडांना घेरण्याच्या नादात आता शिवसेनेकडून या मतदारसंघात काँग्रेसमधील इच्छुकाने मुलाखत दिली आहे. दुसरीकडे ठाणे शहर मतदारसंघात नरेश म्हस्के आणि रवींद्र फाटक यांच्यात तिकिटावरून दोन गट तयार झाले आहेत. त्यात ओवळा-माजिवडा मतदारसंघाचे विद्यमान आमदार प्रताप सरनाईक यांच्यावरदेखील आरोपांच्या फैरी झडू लागल्याने या तीन मतदारसंघांत आता शह-काटशहाचे राजकारण सुरू झाले आहे.कळवा - मुंब्रा मतदारसंघात राष्ट्रवादीचे इच्छुक उमेदवार जितेंद्र आव्हाड यांना त्यांच्यात घरात घेरण्यासाठी सर्वपक्षीय नेते मंडळी एकत्र आले असून त्या दृष्टीने शिवसेनेने व्यूहरचनादेखील आखली आहे. त्यानुसार, मुलाखतीच्या वेळेस राष्ट्रवादीतून शिवसेनेत डेरेदाखल झालेले दशरथ पाटील आणि सुधीर भगत यांनी मुलाखती दिल्या आहेत. विशेष म्हणजे पाटील यांना शिवसेनेत आणण्यासाठी त्यांना सुरुवातीलाच कमिटमेंट दिली गेली होती. परंतु, आता शिवसेनेनेच ही कमिटमेंट तोडण्याचा घाट घातला आहे. वारंवार पक्ष बदलणाऱ्या काँग्रेसचे राजन किणे यांनी येथील जागेसाठी शिवसेनेतून मुलाखत दिल्याने पाटलांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. विशेष म्हणजे यामुळे येथील स्थानिक शिवसैनिक चांगलेच धास्तावले आहेत. परंतु, आता त्याचे परिणाम शिवसेनेला येथे भोगावे लागण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. त्यामुळे आव्हाडांना येथे घेरण्याच्या नादात शिवसेनेत किणे यांच्या निमित्ताने ठिणगी पडल्याचे चित्र आहे.दुसरीकडे ठाणे शहर मतदारसंघातही ९ जण रेसमध्ये असले तरीदेखील तिकीट मिळवण्याची खरी रेस ही सभागृह नेते नरेश म्हस्के आणि काँग्रेसमधून शिवसेनेत आलेले रवींद्र फाटक यांच्यात असू शकते. फाटकांना तिकीट दिले तर निष्ठावान शिवसैनिकांनी त्यांचा प्रचार न करण्याचे जवळजवळ निश्चित केले आहे. तसेच अशोक वैती, अनंत तरे, गोपाळ लांडगे हेदेखील येथूनतिकीट मिळवण्याच्या रेसमध्ये आहेत. त्यामुळे येथे देखील आता फाटकविरोधी वातावरण निर्माण झाले असून निष्ठावान विरुद्ध फाटक असा काहीसा सामना येथे तिकीट मिळण्यापूर्वीच रंगला आहे. त्यामुळे कोणाच्या पारड्यात तिकीट पडणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. ओवळा-माजिवडा मतदारसंघातही आता प्रताप सरनाईक यांच्या विरोधातील सूर वाढल्याचे चित्र आहे. मुलाखतीसाठी गेलेल्या सरनाईक यांच्यावर आता आरोप केले जात असून राष्ट्रवादी सोडून ते शिवसेनेत जरी डेरेदाखल झाले असले तरी ते आजही एकनिष्ठ नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. परंतु, यामागे वेगळेच राजकारण शिजत असल्याचा आरोप सरनाईकांच्या निकटवर्तीयांनी केला आहे. त्यामुळे आता त्यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. (प्रतिनिधी)