शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

तिकिटासाठी शिवसेनेत शह-काटशह

By admin | Updated: September 23, 2014 00:30 IST

कळवा-मुंब्य्रात आव्हाडांना घेरण्याच्या नादात आता शिवसेनेकडून या मतदारसंघात काँग्रेसमधील इच्छुकाने मुलाखत दिली आहे

ठाणे : कळवा-मुंब्य्रात आव्हाडांना घेरण्याच्या नादात आता शिवसेनेकडून या मतदारसंघात काँग्रेसमधील इच्छुकाने मुलाखत दिली आहे. दुसरीकडे ठाणे शहर मतदारसंघात नरेश म्हस्के आणि रवींद्र फाटक यांच्यात तिकिटावरून दोन गट तयार झाले आहेत. त्यात ओवळा-माजिवडा मतदारसंघाचे विद्यमान आमदार प्रताप सरनाईक यांच्यावरदेखील आरोपांच्या फैरी झडू लागल्याने या तीन मतदारसंघांत आता शह-काटशहाचे राजकारण सुरू झाले आहे.कळवा - मुंब्रा मतदारसंघात राष्ट्रवादीचे इच्छुक उमेदवार जितेंद्र आव्हाड यांना त्यांच्यात घरात घेरण्यासाठी सर्वपक्षीय नेते मंडळी एकत्र आले असून त्या दृष्टीने शिवसेनेने व्यूहरचनादेखील आखली आहे. त्यानुसार, मुलाखतीच्या वेळेस राष्ट्रवादीतून शिवसेनेत डेरेदाखल झालेले दशरथ पाटील आणि सुधीर भगत यांनी मुलाखती दिल्या आहेत. विशेष म्हणजे पाटील यांना शिवसेनेत आणण्यासाठी त्यांना सुरुवातीलाच कमिटमेंट दिली गेली होती. परंतु, आता शिवसेनेनेच ही कमिटमेंट तोडण्याचा घाट घातला आहे. वारंवार पक्ष बदलणाऱ्या काँग्रेसचे राजन किणे यांनी येथील जागेसाठी शिवसेनेतून मुलाखत दिल्याने पाटलांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. विशेष म्हणजे यामुळे येथील स्थानिक शिवसैनिक चांगलेच धास्तावले आहेत. परंतु, आता त्याचे परिणाम शिवसेनेला येथे भोगावे लागण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. त्यामुळे आव्हाडांना येथे घेरण्याच्या नादात शिवसेनेत किणे यांच्या निमित्ताने ठिणगी पडल्याचे चित्र आहे.दुसरीकडे ठाणे शहर मतदारसंघातही ९ जण रेसमध्ये असले तरीदेखील तिकीट मिळवण्याची खरी रेस ही सभागृह नेते नरेश म्हस्के आणि काँग्रेसमधून शिवसेनेत आलेले रवींद्र फाटक यांच्यात असू शकते. फाटकांना तिकीट दिले तर निष्ठावान शिवसैनिकांनी त्यांचा प्रचार न करण्याचे जवळजवळ निश्चित केले आहे. तसेच अशोक वैती, अनंत तरे, गोपाळ लांडगे हेदेखील येथूनतिकीट मिळवण्याच्या रेसमध्ये आहेत. त्यामुळे येथे देखील आता फाटकविरोधी वातावरण निर्माण झाले असून निष्ठावान विरुद्ध फाटक असा काहीसा सामना येथे तिकीट मिळण्यापूर्वीच रंगला आहे. त्यामुळे कोणाच्या पारड्यात तिकीट पडणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. ओवळा-माजिवडा मतदारसंघातही आता प्रताप सरनाईक यांच्या विरोधातील सूर वाढल्याचे चित्र आहे. मुलाखतीसाठी गेलेल्या सरनाईक यांच्यावर आता आरोप केले जात असून राष्ट्रवादी सोडून ते शिवसेनेत जरी डेरेदाखल झाले असले तरी ते आजही एकनिष्ठ नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. परंतु, यामागे वेगळेच राजकारण शिजत असल्याचा आरोप सरनाईकांच्या निकटवर्तीयांनी केला आहे. त्यामुळे आता त्यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. (प्रतिनिधी)