शहरं
Join us  
Trending Stories
1
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
2
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
3
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
4
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
5
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
6
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
7
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
8
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
9
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
10
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
11
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
12
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
13
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
14
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
15
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
16
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
17
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
18
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
19
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
20
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!

शिवसेनेकडून अद्याप नावाचा प्रस्ताव नाही

By admin | Updated: May 21, 2015 02:48 IST

बाळासाहेबांचे नाव देण्याचे भाग्य लाभले तर मला आनंदच होईल, पण या क्षणापर्यंत कोणत्याच नावाची शिफारस आलेली नाही, असे स्वत: रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी स्पष्ट केले आहे.

सुरेश प्रभू : वांद्रे टर्मिनसला बाळासाहेबांचे नाव दिल्यास आनंदच !रघुनाथ पांडे - नवी दिल्लीशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव मुंबईच्या वांद्रे टर्मिनसला देण्यासाठी आक्रमक मागणी केलेल्या शिवसेनेने किंवा पालिका स्तरावर अशाच मागणीची भाषा वापरणाऱ्या मनसेने त्यासाठी कोणताही प्रस्ताव दिला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. बाळासाहेबांचे नाव देण्याचे भाग्य लाभले तर मला आनंदच होईल, पण या क्षणापर्यंत कोणत्याच नावाची शिफारस आलेली नाही, असे स्वत: रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी स्पष्ट केले आहे. मोदी सरकारच्या वर्षपूर्तीच्या उंबरठ्यावर ‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते म्हणाले, की रेल्वे स्थानकांना नाव देण्याबाबत गृह मंत्रालय निर्णय घेते. तिथेच प्रस्ताव येतो. मुळात कोकणातून आणि शिवसेनेतून राजकारणात आलेल्या पण आता भाजपात असलेल्या प्रभू यांनी जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प झालाच पाहिजे, असा शिवसेनेशी विसंगत पवित्रा घेतला. अणुऊर्जा प्रकल्प झाला पाहिजे अशी माझी भूमिका आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.मुंबईकरांचे हाल मला माहीत आहेतमुंबईकरांचे हाल मला माहीत आहेत. त्यांना फक्त दिलासा नको, कृती हवी असल्याने मी काम सुरू केले. मुंबईतील उपनगरीय रेल्वे सेवा आधुनिक केली जात आहे. त्याचा आठवडी अहवाल मी घेत असतो. रेल्वे फलाट व डब्यांची उंची एकसारखी करणे, महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांची योजना आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा जपानच्या सहयोगाने अभ्यास पूर्ण झाला आहे असून, या मार्गावर हाय स्पीड रेल्वेसाठी आता काहीच अडचण नाही. तीन-साडेतीन वर्षांत हा मार्ग प्रत्यक्षात येण्यासाठी मी स्वत: प्रयत्न करीत आहे. त्यामुळे हे केवळ स्वप्न आहे, असे समजू नये.पुणे व नागपूर मेट्रोचा विषय राज्य सरकार व केंद्राच्या नागरी विकास मंत्रालयाशी संबंधित आहे. रेल्वे मंत्रालयाचा फार संबंध या प्रकल्पांशी नाही. पण माझे अनुकूल मत त्यांना दिले आहे. वर्षअखेर हे दोन्ही प्रकल्प गती घेतील, असा विश्वास प्रभू यांनी व्यक्त केला.स्मार्ट स्टेशन्स ही तर नावीन्यपूर्ण योजना आहे. मुंबईतील अंधेरी, दादर, ठाणे या स्थानकांचा लखलखता विकास येत्या तीन वर्षांत झालेला असेल. शिवाजीनगर, नागपूरचाही विकास याचबरोबरीने केला जाईल. तर वांद्रे स्थानकाचा हेरिटेज स्थानक म्हणून विकास व जोपासना केली जाणार आहे.शिवसेनाप्रमुखांचे स्मारक शिवाजी पार्कवर उभारण्याच्या मागणीवरून आणि त्यासाठी आक्रमक होण्याऐवजी राज्य सरकारबरोबर सामोपचाराची, शिवसेनेच्या स्वभावाशी विसंगत भूमिका घेण्यावरून राजकीय वादंग निर्माण झाले होते. -विशेष