शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

सीमा हैदर अन् शेख हसीनाला परत पाठवा; त्या भारतीयांची अवस्था पाहून शिवसेनेचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 15:50 IST

Illegal Immigration: अमेरिका अवैध स्थलांतरितांवर कारवाई करू शकते, तर भारतानेही करावी, अशी मागणी शिवसेनेने केली.

Shiv Sena Protest: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानंतर अवैध भारतीय स्थलांतरितांना युएस लष्कराच्या विमानाने मायदेशात पाठवण्यात आले. या सर्व भारतीयांच्या हात आणि पायात बेड्या घालण्यात आल्या होत्या. याचे फोटो अन् व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहेत. याविरोधात पद्धतीवर आज जम्मूतील शिवसेना कार्यकर्त्यांनी तीव्र निदर्शने केली. यासोबतच भारतानेही बेकायदेशीरपणे वास्तव्यास असलेल्या रोहिंग्या निर्वासितांना लवकरात लवकर देशाबाहेर काढावे, अशी मागणीही केली.

जम्मूमध्ये केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने करणाऱ्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी 'सीमा हैदरला परत पाठवा', 'शेख हसीनाला परत पाठवा' आणि 'रोहिंग्यांना परत पाठवा' अशा घोषणा दिल्या. ज्याप्रमाणे अमेरिकेने स्थलांतरितांविरोधात कठोर भूमिका घेतली आहे, त्याचप्रमाणे भारतानेही बेकायदेशीर भारतात राहणाऱ्या स्थलांतरितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जम्मू शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केली.

बांग्लादेशी घुसखोरीने चिंता 

जम्मू-काश्मीर शिवसेनेचे अध्यक्ष मनीष साहनी म्हणाले की, 2007 मध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार सुमारे 1.25 कोटी बांगलादेशी भारतात बेकायदेशीरपणे राहत होते आणि दरवर्षी तीन लाख नवीन बांगलादेशी घुसखोरी करतात. सध्या भारतात बेकायदेशीर बांगलादेशींची संख्या सुमारे दोन कोटींवर पोहोचली असल्याचा दावा त्यांनी केला.

भाजपवरही निशाणा साधला

शिवसेनेने भाजप सरकारवरही निशाणा साधला. बेकायदेशीर स्थलांतरितांना बाहेर पाठवण्याची आश्वासने निवडणुकीत दिली जातात, मात्र आजतागायत ठोस पावले उचलली गेली नाहीत. बांग्लादेशला लागून असलेल्या 856 किमी लांबीच्या सीमेला अद्याप पूर्णपणे कुंपण घालण्यात आलेले नाही, त्यामुळे घुसखोरी सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.

जम्मू-काश्मीरमध्ये राहणाऱ्या रोहिंग्या निर्वासितांची कोणतीही अधिकृत नोंद नाही, ज्यामुळे सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो, असेही शिवसेना कार्यकर्त्यांनी म्हटले. जर अमेरिका अवैध स्थलांतरितांवर कारवाई करू शकत असेल तर भारतानेही त्याच दिशेने पावले उचलली पाहिजेत, अशी शिवसेनेनं मागणी केली.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाJammu Kashmirजम्मू-काश्मीरBangladeshबांगलादेशPakistanपाकिस्तान