शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

काश्मिरात प्राणघातक शस्त्रे होणार ‘म्यान’!

By admin | Updated: September 4, 2016 03:46 IST

काश्मीरमध्ये सर्वपक्षीय शिष्टमंडळ उद्या, रविवारी तिथे जात असून, त्याआधी शनिवारी गृहमंत्री राजनाथसिंग यांनी खोऱ्यात पेलेट गन्स वापरण्यात येणार नाही, असे स्पष्ट केले.

नवी दिल्ली : काश्मीरमध्ये सर्वपक्षीय शिष्टमंडळ उद्या, रविवारी तिथे जात असून, त्याआधी शनिवारी गृहमंत्री राजनाथसिंग यांनी खोऱ्यात पेलेट गन्स वापरण्यात येणार नाही, असे स्पष्ट केले. पेलेट गन्समुळे खोऱ्यातील अनेकांच्या डोळ्यांना, शरीराला गंभीर इजा झाली असून, काही जण छर्रे शरीरात शिरल्याने मरणही पावले. त्यामुळे पेलेट्सचा वापर थांबवा, अशी मागणी सातत्याने होत होती.यापुढे काळी मिरीची पूड वापरून तयार केलेल्या पावा शेल्स वापरण्यात येतील. त्यामुळे डोळ्यासमोर अंधारी येणे, डोळ्यांची आग होणे, शरीराची काही काळ आग होणे असा त्रास होतो. पण मोठी इजा होत नाही. त्याआधी झालेल्या सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीतही पेलेट्सचा वापर थांबवण्याची मागणी झाली. तसेच तिढा सोडवण्यासाठी फुटीरवादी गट आणि हुर्रियतशीही चर्चा व्हावी, असे मत सीताराम येचुरी यांच्यासह काही नेत्यांनी व्यक्त केले. ३0 नेत्यांचे शिष्टमंडळ आज श्रीनगरमध्ये दाखलकाश्मीरमधील सर्व पक्ष, गट तसेच फुटीरवादी नेत्यांचे म्हणणे सरकारने आणि सर्वांनी ऐकून घ्यायलाच हवे, अशी मागणी काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनीही केली आहे. उद्या ३0 नेत्यांचे शिष्टमंडळ श्रीनगरमध्ये कन्व्हेंशन सेंटरमध्ये राहणार असून, तिथेच दोन दिवस संबंधित मंडळींशी चर्चा करेल. तेथील परिस्थिती पाहता, ते रुग्णालयांतही जाणार नाही.या नेत्यांनी हुर्रियतशी चर्चेवर जोर दिला असला तरी हुर्रियतचे नेते गिलानी यांनी शिष्टमंडळाला कोणीही भेटू, असे म्हटले आहे. या नेत्यांना काश्मीरचा प्रश्न नेमका काय आहे, हे समजलेलेच नाही, अशी टीका गिलानींनी केली आहे.ताठर भूमिक ा नको; प्रश्न अधिकच बिकट बनेल मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी आणि काँग्रेसचे गुलाम नबी आझाद व मल्लिकार्जुन खरगे यांनी आजच्या बैठकीत बोलताना काश्मीरच्या प्रत्येक घटकाशी चर्चा करण्याची गरज आहे.येचुरी म्हणाले की, हुर्रियतशी बोलणार नाही, अमूक नेत्यांशी चर्चा करणार नाही, अशी भूमिका केंद्राने सोडायला हवी. अशा ताठर भूमिकेमुळे काश्मीरचा प्रश्न सुटण्याऐवजी अधिकच बिकट बनेल. अकाली दलाचे प्रेमसिंग चंदुमांजरा म्हणाले की, गेले ५७ दिवस चाललेल्या हिंसाचारामुळे काश्मीरचा धर्मनिरपेक्ष चेहरा नष्ट झाला असून, ही चिंतेची बाब आहे. या शिष्टमंडळात पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री जीतेंद्र सिंग, काँग्रेसच्या अंबिका सोनी यांचाही समावेश आहे.