शहरं
Join us  
Trending Stories
1
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
2
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
3
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा वापर ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
4
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
5
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
6
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
7
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
8
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
9
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
10
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
11
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
12
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
13
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
14
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
15
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
16
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
17
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
18
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
19
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
20
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य

सिंहांच्या कळपात तिने दिला बाळाला जन्म

By admin | Updated: July 1, 2017 16:01 IST

लुंसापुर गावात एका महिलेची प्रसुती चक्क सिंहाच्या कळपामध्ये झाली आहे.

ऑनलाइन लोकमत

राजकोट, दि. 1- स्त्री गरोदर असताना प्रसुतीचे दिवस जवळ आले की बऱ्याचदा रेल्वे स्टेशनवर, विमानात किंवा क्वचित रेल्वे ट्रेनमध्ये महिलेचे प्रसुती झाल्याच्या बातम्या आपण नेहमीच वाचत असतो. पण सगळ्यानांचा आश्चर्याचा धक्का बसेल अशी घटना राजकोटमध्ये घडली आहे. अमरेलीमधील जाफराबाद तालुक्यातील लुंसापुर गावात एका महिलेची प्रसुती चक्क सिंहाच्या कळपामध्ये झाली आहे.  बुधवारी रात्री ही घटना घडली आहे. त्या महिलेला प्रसुती वेदना सुरू झाल्यावर तिच्या कुटुंबियांनी 108 क्रमांकावर फोन करून अॅम्ब्युलन्स बोलावली होती. नंतर तिला अॅम्ब्युलन्समधून हॉस्पिटलमध्ये नेलं जात होतं. त्यावेळी गावापासून 3 किलोमीटर अंतरावर अॅम्ब्युलन्सला सिंहाच्या कळपाने घेरलं. त्या सिंहाच्या कळपात 11-12 सिंह होते. 
 
108 क्रमांकाच्या इमरजन्सी अॅम्ब्युलन्स सेवेच्या अमरेली जिल्हा प्रमुख चेतन गढिया यांनी सांगितलं, आम्ही गाडीला थांबवून त्या सिंहांना हटविण्याचा प्रयत्न केला पण त्याचा काहीही फायदा झाला नाही. कारण सिंहाचा तो कळप तिथून हालायचा तयारीत नव्हता. त्याचवेळी महिलेला प्रसुती वेदनेसह रक्तस्त्राव व्हायला सुरूवात झाली होती. त्यावेळी अॅम्ब्युलन्समधील कर्मचाऱ्यांनी अॅम्ब्युलन्समध्येच प्रसुती करण्याचा निर्णय घेतला. कर्मचाऱ्यांनी डॉक्टरांशी फोनवरून संपर्क केला आणि डॉक्टरांकडून मार्गदर्शन घेऊन 25 मिनिटांमध्ये त्या महिलेची प्रसुती करण्यात यश मिळवलं.  
महिलेची अॅम्ब्युलन्समध्ये प्रसुती सुरू असताना समोर असलेले सिंह पूर्णवेळ गाडीभोवती फिरत होते. नवजात बाळाला बेबी वॉर्मरमध्ये ठेवल्यानंतर चालकाने अॅम्ब्युलन्स हळूहळू पुढे न्यायला सुरूवात केली. त्यानंतर सिंहसुद्धा रस्त्यावरून बाजूला गेले. काही मिनिटातच ते सिंह रस्त्यापासून लांब गेले. प्रसुती झालेल्या महिलेला आणि बाळाला सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. 
 
आणखी वाचा  :
 

पोलिसांनी केली महिलेची स्टेशनवर डिलिव्हरी

 
 
 
खरंतर 108 क्रमांकावर इमरजन्सी  सेवा देत असताना याआधीही अॅम्ब्युलन्सा सिंहाच्या कळपाला सामोरं जावं लागलं होतं. अमरेली गावात नेहमीच सिंह दिसत असतात. त्यामुळे या परिस्थितीचा सामना करण्यासाठी कर्मचाऱ्यांना तसं प्रशिक्षण दिलं जातं. अनेक वेळा रस्ते नीट नसल्याने अॅम्ब्युलन्समधील कर्मचाऱ्यांना चालतसुद्धा जावं लागतं, असं गढिया यांनी सांगितलं आहे.