शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
2
NDA मध्ये धुसफूस...? "हो न्याय अगर तो आधा दो...! 15 जागा मिळाल्या नाही तर..."; जितनरामांनी दिली सर्वात मोठी धमकी
3
Max Life पेन्शन फंडाचा परवाना रद्द; लोकांच्या पैशाचं काय होणार? जाणून घ्या
4
“PM मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मोठ्या पॅकेजची घोषणा करावी”: वडेट्टीवार
5
शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा यांना दिलासा नाही! ६० कोटींच्या फसवणूक प्रकरणी अडचणी वाढल्या; न्यायालयाने दिले हे आदेश
6
शेतकऱ्याने तहसील कार्यालयात घेतले विष, खासदार प्रतिभा धानोरकरांवर गंभीर आरोप; मृतदेह स्वीकारण्यास नकार
7
“ठाकरेंची बाजू अतिशय भक्कम, ज्यांची कमकुवत ते प्रकरण पुढे ढकलायचा प्रयत्न करतात”: असीम सरोदे
8
आजपासून पिनसोबतच चेहरा अन् बोटांचे ठसे वापरूनही करा यूपीआयवरून व्यवहार; फसवणुकीला आळा बसणार
9
नात्याला काळीमा! सासूच्या प्रेमात वेडा झाला जावई; पत्नीची केली हत्या, प्रायव्हेट फोटो व्हायरल
10
'डिजिटल अरेस्ट' पासून कसे वाचायचे? समन्स खरे की खोटे असे ओळखा; ईडीने सगळीच माहिती सांगितली
11
समीर पाटील कोण, १०० कोटी कुठून आले?;  चंद्रकांत पाटलांवर शिंदेसेनेच्या नेत्याचा गंभीर आरोप
12
बॉलिवूड हादरलं! 'झुंड' फेम अभिनेत्याची निर्घृण हत्या, अर्धनग्नावस्थेत आढळला प्रियांशूचा मृतदेह
13
“छगन भुजबळ मराठ्यांना शत्रू मानतो, म्हातारा बावचळलाय”; मनोज जरांगे पाटलांची बोचरी टीका
14
भारतासोबतच्या संघर्षादरम्यान मोठी घडामोड; अमेरिका पाकिस्तानला देणार अत्याधुनिक क्षेपणास्त्रे!
15
इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांच्याविरुद्ध आंतरराष्ट्रीय न्यायालयात खटला दाखल; गाझाशी आहे कनेक्शन
16
IND vs WI 2nd Test: बुमराहला संघाबाहेर ठेवणार? Playing XI मध्ये 'हे' २ बदल होण्याची शक्यता
17
अरे हा माणूस आहे का 'क्रेडिट कार्ड'? तब्बल १६३८ कार्ड वापरुन कमावतो पैसे; एक रुपयाही कर्ज नाही
18
देश सोडा अन् IPL खेळा! पॅट कमिन्स-ट्रॅविस हेडला प्रत्येकी ५८-५८ कोटींची ऑफर; ही काय आहे भानगड?
19
Nashik Crime: पाळत ठेवून घराजवळ गाठलं, अमोलची भररस्त्यात सपासप वार करत हत्या; रक्ताच्या थारोळ्यातच गेला जीव
20
कंपनीला एक चूक महागात पडली; सॅलरीपेक्षा ३०० पट रक्कम कर्मचाऱ्याच्या खात्यावर पाठवली, मग जे घडलं...

सिंहांच्या कळपात तिने दिला बाळाला जन्म

By admin | Updated: July 1, 2017 16:01 IST

लुंसापुर गावात एका महिलेची प्रसुती चक्क सिंहाच्या कळपामध्ये झाली आहे.

ऑनलाइन लोकमत

राजकोट, दि. 1- स्त्री गरोदर असताना प्रसुतीचे दिवस जवळ आले की बऱ्याचदा रेल्वे स्टेशनवर, विमानात किंवा क्वचित रेल्वे ट्रेनमध्ये महिलेचे प्रसुती झाल्याच्या बातम्या आपण नेहमीच वाचत असतो. पण सगळ्यानांचा आश्चर्याचा धक्का बसेल अशी घटना राजकोटमध्ये घडली आहे. अमरेलीमधील जाफराबाद तालुक्यातील लुंसापुर गावात एका महिलेची प्रसुती चक्क सिंहाच्या कळपामध्ये झाली आहे.  बुधवारी रात्री ही घटना घडली आहे. त्या महिलेला प्रसुती वेदना सुरू झाल्यावर तिच्या कुटुंबियांनी 108 क्रमांकावर फोन करून अॅम्ब्युलन्स बोलावली होती. नंतर तिला अॅम्ब्युलन्समधून हॉस्पिटलमध्ये नेलं जात होतं. त्यावेळी गावापासून 3 किलोमीटर अंतरावर अॅम्ब्युलन्सला सिंहाच्या कळपाने घेरलं. त्या सिंहाच्या कळपात 11-12 सिंह होते. 
 
108 क्रमांकाच्या इमरजन्सी अॅम्ब्युलन्स सेवेच्या अमरेली जिल्हा प्रमुख चेतन गढिया यांनी सांगितलं, आम्ही गाडीला थांबवून त्या सिंहांना हटविण्याचा प्रयत्न केला पण त्याचा काहीही फायदा झाला नाही. कारण सिंहाचा तो कळप तिथून हालायचा तयारीत नव्हता. त्याचवेळी महिलेला प्रसुती वेदनेसह रक्तस्त्राव व्हायला सुरूवात झाली होती. त्यावेळी अॅम्ब्युलन्समधील कर्मचाऱ्यांनी अॅम्ब्युलन्समध्येच प्रसुती करण्याचा निर्णय घेतला. कर्मचाऱ्यांनी डॉक्टरांशी फोनवरून संपर्क केला आणि डॉक्टरांकडून मार्गदर्शन घेऊन 25 मिनिटांमध्ये त्या महिलेची प्रसुती करण्यात यश मिळवलं.  
महिलेची अॅम्ब्युलन्समध्ये प्रसुती सुरू असताना समोर असलेले सिंह पूर्णवेळ गाडीभोवती फिरत होते. नवजात बाळाला बेबी वॉर्मरमध्ये ठेवल्यानंतर चालकाने अॅम्ब्युलन्स हळूहळू पुढे न्यायला सुरूवात केली. त्यानंतर सिंहसुद्धा रस्त्यावरून बाजूला गेले. काही मिनिटातच ते सिंह रस्त्यापासून लांब गेले. प्रसुती झालेल्या महिलेला आणि बाळाला सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. 
 
आणखी वाचा  :
 

पोलिसांनी केली महिलेची स्टेशनवर डिलिव्हरी

 
 
 
खरंतर 108 क्रमांकावर इमरजन्सी  सेवा देत असताना याआधीही अॅम्ब्युलन्सा सिंहाच्या कळपाला सामोरं जावं लागलं होतं. अमरेली गावात नेहमीच सिंह दिसत असतात. त्यामुळे या परिस्थितीचा सामना करण्यासाठी कर्मचाऱ्यांना तसं प्रशिक्षण दिलं जातं. अनेक वेळा रस्ते नीट नसल्याने अॅम्ब्युलन्समधील कर्मचाऱ्यांना चालतसुद्धा जावं लागतं, असं गढिया यांनी सांगितलं आहे.