शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
3
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
4
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
5
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
6
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
7
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
8
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
9
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
10
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
11
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
12
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
13
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
14
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
15
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
16
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
17
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
18
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
19
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ

अडवाणी राष्ट्रपती व्हावे यासाठी शत्रुघ्न सिन्हांची जोरदार बॅटींग

By admin | Updated: June 14, 2017 16:48 IST

राष्ट्रपतीपदाची निवडणूक जुलै महिन्यात होणार आहे. गेले कित्येक दिवसांपासून या निवडणुकीसंदर्भात दिल्लीत राजकीय खलबतं सुरु आहेत.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 14 - राष्ट्रपतीपदाची निवडणूक जुलै महिन्यात होणार आहे. गेले कित्येक दिवसांपासून या निवडणुकीसंदर्भात दिल्लीत राजकीय खलबतं सुरु आहेत. राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीसाठी लालकृष्ण अडवाणी ते शरद पवार अशी अनेक नावं चर्चेत आली असली तरी सत्ताधारी एनडीए आणि विरोधी बाकांवरील युपीएकडून कोण उमेदवार असणार याबद्दल सस्पेन्स अजून कायम आहे.  
 
दरम्यान, भाजपाचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना देशाचे राष्ट्रपती बनवावे यासाठी जोरदार मोहीम उघडली आहे. गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर त्यांनी यासाठी कॅम्पेन सुरू केलं आहे. अडवाणींच्या समर्थनार्थ सिन्हा दोन दिवसांपासून सातत्याने ट्विट करत आहे.      
 
सध्याच्या परिस्थितीत राष्ट्रपतीपदासाठी अडवाणी हे पहिला आणि शेवटचा पर्याय असायला हवेत. राष्ट्रपती निवडणुकीसाठी जर आत्ता जनमत चाचणी घेण्यात आली तर अडवाणी इतरांपेक्षा खूप पुढे असतील अशाप्रकारचे अनेक ट्विट शत्रुघ्न सिन्हा यांनी केले आहेत. अडवाणींसाठी सिन्हा यांनी सुरू केलेली ही मोहीम केंद्र सरकार गांभीर्याने घेतं का हे याकडे आता सर्वांचे लक्ष असणार आहे. 
 राष्ट्रपती कोण होणार याबाबत संभ्रम कायम-
 रायसीना हिलवर राष्ट्रपती भवनात यंदा कोण पोहोचणार? जुलै महिन्यात होऊ घातलेली निवडणूक एकमताने होणार की सत्ताधारी आणि विरोधक आपापले बळ अजमावण्यासाठी मतदान घडवणार? याबाबत स्थिती अद्याप स्पष्ट नाही. भारताचे १४ वे राष्ट्रपती ऐंशीच्या दशकानंतर प्रथमच अशा स्थितीत निवडले जाणार आहेत की एकूण मतदानाच्या ४0 टक्के हमखास मते सत्ताधारी एनडीएकडे आहेत. साहजिकच राष्ट्रपतीपदावर आपल्या पसंतीचा उमेदवार विराजमान करण्यासाठी पंतप्रधान मोदी आणि एनडीए विजयाच्या निकट आहेत.
मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीएकडे ३३८ खासदार व १३५२ आमदारांचे संख्याबळ आहे. त्यांच्या मतमूल्याची बेरीज आजमितीला ५ लाख ३२ हजार 0३६ आहे. तरीही बहुमतासाठी सत्ताधारी आघाडीला आणखी १७ हजार ४0४ मतांची आवश्यकता आहेच.
एनडीएच्या साऱ्या मतदारांना एकत्र ठेवून आणखी एकदोन गैर काँग्रेस पक्षांना आपल्याकडे ओढण्यात मोदी यशस्वी ठरले तर राष्ट्रपतीपदावर आपल्या पसंतीचा उमेदवार निवडून आणण्यात त्यांना फारसा त्रास होणार नाही. तथापि एनडीएतील शिवसेना, अकाली दल, तेलुगु देशम यासारख्या पक्षांनी ऐनवेळी वेगळी भूमिका घेतली तर सध्याच्या गणितात बराच फरक पडू शकतो.
... तर सर्वसंमतीने होऊ शकते निवड
 
राष्ट्रपतीपदाचे उमेदवार कोण यावरही हा खेळ बऱ्यापैकी अवलंबून आहे. एखादे असे नाव अचानक पुढे आले तर दोन्ही आघाड्यातील अंतर्विरोधही स्पष्टपणे सामोरे येतील आणि सारी समीकरणेही बदलू शकतील.
 
ज्या नावाला विरोध करणे बहुतांश विरोधकांना अशक्य होईल, असे नाव पुढे करण्यात जर एनडीएने पुढाकार घेतला तर सर्वसंमतीने राष्ट्रपतीपदाची निवडणूक पार पडू शकते. वाजपेयींच्या काळात असे घडले आहे.
 
डॉ. अब्दुल कलाम यांची निवड बिनविरोध झाली नसली तरी डावे पक्ष वगळता, देशातील सर्व राजकीय पक्षांनी कलाम यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला होता.
 
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत यंदा संसदेच्या दोन्ही सभागृहांत ७७६ खासदार व सर्व राज्यांतील मिळून ४१२0 आमदार मतदान करणार आहेत.
 
आमदार, खासदारांचे मिळून मतदानाचे जे निर्वाचक मंडळ (इलेक्टोरल कॉलेज) तयार करण्यात आले आहे, त्याचे एकूण मतमूल्य १0,९८,८८२ इतके आहे.
 
देशातील सर्व आमदारांच्या मतमूल्याची बेरीज ५ लाख ४९ हजार ४७४ इतकी आहे. तर ७७६ खासदारांच्या मतमूल्याची बेरीज ५ लाख ४९ हजार ४0८ आहे.
 
राष्ट्रपतीपदावर निवडून येण्यासाठी यापैकी किमान ५ लाख ४९ हजार ४४१ मतांची आवश्यकता आहे.