शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
7
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

शशिकला यांनी केला सरकार स्थापनेचा दावा

By admin | Updated: February 9, 2017 20:45 IST

तामिळनाडूत आण्णा द्रमुक पक्षामध्ये सुरू असलेली राजकीय वर्चस्वाची लढाई आता रंगतदार टप्प्यावर पोहोचली आहे.

ऑनलाइन लोकमत
 चेन्नई, दि. 9 - तामिळनाडूत आण्णा द्रमुक पक्षामध्ये सुरू असलेली राजकीय वर्चस्वाची लढाई आता रंगतदार टप्प्यावर पोहोचली आहे.  अण्णा द्रमुक पक्षाच्या महासचिव शशिकला नटराजन यांनी आज संध्याकाळी राज्यपाल विद्यासागर राव यांची भेट घेत तामिळनाडूमध्ये सरकार स्थापनेचा दावा केला. यावेळी आपल्याकडे पुरेशा आमदारांचा पाठिंबा असल्याचेही शशिकला यांनी सांगितले. दरम्यान, गरज पडल्यास बहुमत सिद्ध करण्यासाठी पनीरसेल्वम यांना पाठिंबा देऊ असे सांगत राज्यातील विरोधी पक्ष असलेल्या द्रमुकने अण्णा द्रमुक पक्षातील वादात तेल ओतले आहे. 
आज संध्याकाळी शशिकला यांनी जयललिता यंच्या समाधीस्थानाला भेट देत जयललितांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर त्यांनी राजभवन येथे जात राज्यपालांची भेट घेतली. यावेळी शशिकला यांनी राज्यपालांना आपल्याला समर्थन देणाऱ्या आमदारांचे समर्थन पत्र सोपवले आणि राज्यात सरकार स्थापनेचा दावा केला. यावेळी शशिकला यांच्यासोबत अण्णा द्रमुकचे पाच ज्येष्ठ नेतेही होते.