शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
4
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
5
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
6
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
7
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
8
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
9
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
10
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
11
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
12
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
13
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
14
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
15
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
16
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
17
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
18
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
19
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
20
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?

शरियत न्यायालये बेकायदा

By admin | Updated: July 8, 2014 02:14 IST

न्यायालयांकडून जारी केल्या जाणा:या फतव्यांची कोणाहीविरुद्ध सक्तीने अंमलबजावणी केली जाऊ शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केले आहे.

 नवी दिल्ली : देशातील 15 कोटी मुस्लिम नागरिकांच्या व्यक्तिगत जीवनातील कौटुंबिक आणि विवाहविषयक वाद सोडविण्यासाठी ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने देशाच्या विविध भागात स्थापन केलेल्या शरियत न्यायालयांना (दारुल काझा) कोणतेही संवैधानिक व कायदेशीर अधिष्ठान नाही. तसेच या न्यायालयांकडून जारी केल्या जाणा:या फतव्यांची कोणाहीविरुद्ध सक्तीने अंमलबजावणी केली जाऊ शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केले आहे.

असे असले तरी या शरियत न्यायालयांचे अस्तित्व व त्यांच्याकडून जारी केले जाणारे फतवे हे मूलत: बेकायदा नाहीत. समान धर्मावलंबी दोन पक्षांमधील दिवाणी स्वरूपाच्या वादांमध्ये, धर्मशास्त्र व स्वत: पैगंबर महम्मदाचे आचरण याआधारे, समेट/तडजोड घडवून आणणारी ती अनौपचारिक न्यायदानाची व्यवस्था आहे. अशा न्यायालयांकडून जारी केले जाणारे फतवे पाळायचे की नाही हे ठरविण्याचे स्वातंत्र्य संबंधित व्यक्तीला आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
न्यायालय म्हणते की, असे फतवे ते धर्माच्या आधारे देण्यात येत असल्याने असा फतवा धुडकावल्यास संबंधित व्यक्तीवर त्याचा गंभीर स्वरूपाचा मानसिक परिणाम होऊ शकतो. 
सर्वसामान्य लोक परमेश्वराची भीती बाळगून असतात व या जन्मात केलेल्या भल्या-बु:या कृत्यांचा त्या जगन्नियंत्याला जाब द्यावा लागेल, अशी त्यांची ठाम भावना असते. त्यामुळे शरियत न्यायालयांच्या फतव्यांना कायदेशीर बंधनकारकता नसली तरी असे लोक धर्माच्या भीतीपोटी असे फतवे पाळत 
असतात.
विश्व लोचन मदन या वकिलाने सात वर्षापूर्वी केलेली जनहित याचिका निकाली काढताना न्या. चंद्रमौली कुमार प्रसाद आणि न्या. पिनाकी चंद्र घोष यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला. मात्र शरियत न्यायालये ही प्रस्थापित न्यायव्यवसेथेला समांतर अशी व्यवस्था आहे, हे अजर्दाराचे म्हणणो न्यायालयाने मान्य केले नाही. तसेच शरियत न्यायालयांना कायदेशीर मान्यता नसली तरी ती बंद करण्याचा आदेशही न्यायालयाने दिला नाही. (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
4न्यायालयाने असेही म्हटले की, एखाद्या धार्मिक मुद्यावर किंवा ज्याने भारतीय राज्यघटनेने व्यक्तीला दिलेल्या मूलभूत हक्कांची पायमल्ली होणार नाही अशा अन्य कोणत्याही विषयावर फतवा काढला जाण्यास कदाचित आक्षेप असू शकणार नाही. तसेच ज्याचा संबंध एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिगत जीवनाशी नव्हे तर ढोबळमानाने सर्व समाजाशी आहे अशा विषयावर कोणाही त्रयस्थाने फतवा मागणोही समजू शकते. 
 
4कोणाही व्यक्तीने इतर कोणाच्या तरी व्यक्तिगत जीवनाशी संबंधित प्रश्नावर फतवा मागितल्यास शरियत न्यायालयांनी त्यास प्रतिसाद देताना सावधपणा बाळगायला हवा. इतर कोणाच्या तरी आग्रहाखातर कोणाच्याही व्यक्तिगत जीवनात हस्तक्षेप करणो ही त्या व्यक्तीच्या मानवी हक्कांची पायमल्ली ठरू शकते. 
 
4शरियत न्यायालयांनी दिलेल्या फतव्यांना मुगल साम्राज्यात किंवा ब्रिटिशांच्या आमदानीत काहीही दर्जा असला तरी राज्यघटनेनुसार कारभार चालणा:या स्वतंत्र भारतात या न्यायालयांना व त्यांच्या फतव्यांना कोणतेही स्थान नाही, असे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीद्वय चंद्रमौली प्रसाद व पिनाकी चंद्र घोष यांनी सांगितले.