शहरं
Join us  
Trending Stories
1
स्मृती मानधनाच्या वडिलांना रुग्णालयातून डिस्चार्ज; पलाश मुच्छलसोबत लग्न अद्यापही लांबणीवरच!
2
आजचे राशीभविष्य, २६ नोव्हेंबर २०२५: 'या' राशींसाठी आहे धनलाभाचा योग; वाचा आपले आजचे राशीभविष्य!
3
आरक्षणाची मर्यादा ओलांडली तर निवडणूक रद्दही होऊ शकते; निवडणुकांवरील टांगती तलवार कायम
4
हमासनं जमिनीखाली वसवलं ८० खोल्यांचं गाव! केवळ इस्रायलच नाही, तर अख्खं जग थक्क झालं
5
नरिमन पाँईंटवरून थेट विरार...पोहचा एका तासातच सुसाट; उत्तन-विरार सागरी सेतूच्या ‘DPR’ला मान्यता
6
रेड झोन झाला तर बांधकामे बंद होणार; प्रदूषणाचा विळखा कायम, मुंबई महापालिकेचा इशारा
7
असत्यावर सत्य विजय मिळविते याचे भगवा ध्वज हे प्रतीक - पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
मुंबईत ४.३३ लाख दुबार मतदार, महापालिकेची कबुली; म्हणाले, नावे काढण्याचा अधिकार आम्हाला नाही
9
खोटा प्रचार केल्याने वास्तव बदलणार नाही; अरुणाचल प्रदेशावर दावा करणाऱ्या चीनला भारताचे प्रत्युत्तर
10
पतीकडून शारीरिक, मानसिक छळ; सेलिना जेटली हायकोर्टात, ५० कोटींची पोटगी हवी?
11
४ वर्षांची चिमुकली सहा महिन्यांनी पुन्हा आईच्या कुशीत; लेकीला पाहिले अन् आईची शुद्ध हरपली 
12
शेवग्याची शेंग ५०० रुपये किलाेवर; संपूर्ण राज्यात महिनाभर तुटवडा राहणार, कारण काय?
13
वरळीतील ४ प्रभागांत सर्वाधिक दुबार मतदार; उद्धवसेनेच्या नगरसेवकांच्या प्रभागात आढळली दुबार नावे
14
अरुणाचल प्रदेश हा भारताचा भूभाग नाही, हा आमचा झांगनान; चीनची दर्पोक्ती, भारतावर निशाणा
15
२६/११ अतिरेकी हल्ल्याला १७ वर्षे पूर्ण; सीएसएमटी स्टेशनवर एकही बॉडी स्कॅनर नाही, सुरक्षा धोक्यात
16
कुजबुज! एकनाथ शिंदेंसमोरच 'उद्धवसाहेब आगे बढो' जयघोष; प्रचारसभेत कार्यकर्तेही पडले गोंधळात
17
१८८९ ते १९४९ - राज्यघटनेच्या जन्माची ६० वर्षे! 'असा' भारतीय घटनेच्या निर्मितीचा इतिहास
18
‘काँग्रेस’चे शशी थरूर भाजपमध्ये (कधी) जातील?; केरळच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावतील
19
भेटायला म्हणून गेला अन् भलताच अडकला! गावकऱ्यांनी २ मुलांच्या आईसोबत लावून दिलं तरुणाचं लग्न अन्... 
20
राम मंदिरावर धर्मध्वज डौलानं फडकला, ध्वजावरील ‘ते’ झाड नेमकं कोणतं? इंटरेस्टिंग माहिती...
Daily Top 2Weekly Top 5

पलाणीस्वामींची उद्या शक्तिपरीक्षा

By admin | Updated: February 17, 2017 03:37 IST

अण्णा द्रमुकच्या सरचिटणीस व्ही. के. शशीकला यांचे निष्ठावंत ई. के. पलाणीस्वामी (६३) यांना अखेर राज्यपाल विद्यासागर राव यांनी

चेन्नई : अण्णा द्रमुकच्या सरचिटणीस व्ही. के. शशीकला यांचे निष्ठावंत ई. के. पलाणीस्वामी (६३) यांना अखेर राज्यपाल विद्यासागर राव यांनी गुरुवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. ते करतानाच त्यांना १५ दिवसांत विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यास राज्यपालांनी सांगितले. मात्र, ते १८ फेब्रुवारी रोजी विधानसभेत बहुमत सिद्ध करून दाखवणार आहेत. काळजीवाहू मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांनी शशीकला यांच्याविरोधात बंड केल्यामुळे गेल्या दहा दिवसांपासून राज्यात निर्माण झालेल्या राजकीय अस्थिरतेला पूर्णविराम मिळाला. त्यांच्या शपथविधीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पलाणीस्वामी यांचे फोन करून अभिनंदन केले. द्रमुकचे कार्यकारी अध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांनीही नव्या मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले आणि राज्यात स्थिर सरकार राहावे, अशी आशा व्यक्त केली. पलाणीस्वामी यांनी राज्यपाल राव यांच्याकडे आपणास १२४ आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा करीत, त्यांची यादी बुधवारी रात्री सादर केली होती. त्यानंतर, पनीरसेल्वमही राज्यपालांना भेटले. मात्र, त्या वेळी त्यांना १0 आमदारांचाच पाठिंबा असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे राव यांनी त्यांना पलाणीस्वामी यांना सरकार स्थापन करण्यास गुरुवारी निमंत्रित केले. विधानसभेचे सदस्य २३४ आहे. (वृत्तसंस्था)पलाणीस्वामी यांचे मंत्रिमंडळ ३१ जणांचे आहे. गेल्या नऊ महिन्यांत मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे पलाणीस्वामी हे अण्णा द्रमुकचे तिसरे नेते आहेत. जयललिता यांनी मे २०१६ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत मोठे यश प्राप्त केले. त्या ७४ दिवस रुग्णालयात असेपर्यंत मुख्यमंत्री होत्या. त्यांचे ५ डिसेंबर रोजी जयललिता यांचे निधन झाले आणि पनीरसेल्वम मुख्यमंत्रीपद झाले. जयललिता भ्रष्टाचाराच्या खटल्यात तुरुंगात गेल्या तेव्हाही त्यांनी मुख्यमंत्रिपद सांभाळले होते.पनीरसेल्वमचा संघर्षाचा पवित्रा कायम ओ. पनीरसेल्वम यांनी जे. जयललिता यांची राजवट स्थापन होईपर्यंत शशीकला व त्यांच्या कुटुंबीयांविरोधातील माझा लढा सुरूच राहील, असे गुरुवारी सायंकाळी म्हटले. एका कुटुंबाच्या हाती पक्ष व सरकार पुन्हा जाण्यापासून रोखण्यासाठी आपण सगळे एक होऊ या. लोकांच्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करणारे सरकार पुन्हा एकदा आपल्याला स्थापन करायचे आहे आणि ते होईपर्यंत हा संघर्ष सुरूच राहील, असे ते म्हणाले.