शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
3
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
4
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
5
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
6
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
7
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
8
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
9
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
10
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
11
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
12
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
13
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण
14
पुण्यातील विठ्ठल भक्तांवर पंढरपुरात हल्ला करणारे 'ते' तिघे कोण? वाद इतका विकोपाला का गेला?
15
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
16
देशातल्या खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेनं दिलं खास दिवाळी गिफ्ट, आपल्याला कसा होणार फायदा? जाणून घ्या
17
प्रीमियम लूक, इंटीरियरमध्ये लक्झरी आणि स्पोर्टी टच; टोयोटा फॉर्च्यूनर लीडर भारतात लॉन्च!
18
रशियात शिकायला गेला आणि सैन्यात भरती झाला, अखेर युक्रेनी सैन्यासमोर सरेंडर, गुजराती तरुणासोबत काय घडलं? 
19
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता एकाच App मध्ये मिळणार बस, ट्रेन आणि मेट्रोचे तिकीट...
20
बॉलिवूड हादरलं! 'झुंड' फेम अभिनेत्याची निर्घृण हत्या, अर्धनग्नावस्थेत आढळला प्रियांशूचा मृतदेह

शहा यांची अध्यक्षपदी फेरनिवड निश्चित

By admin | Updated: January 13, 2016 04:11 IST

भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांची पुढच्या आठवड्यात कोणत्याही क्षणी पक्षाध्यक्षपदी फेरनिवड केली जाण्याची शक्यता आहे. किमान १२ राज्यांमधील पक्ष संघटनात्मक निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली

- हरीश गुप्ता,  नवी दिल्ली

भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांची पुढच्या आठवड्यात कोणत्याही क्षणी पक्षाध्यक्षपदी फेरनिवड केली जाण्याची शक्यता आहे. किमान १२ राज्यांमधील पक्ष संघटनात्मक निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली आहे आणि उर्वरित पाच राज्यांमधील संघटनात्मक निवडणुकाही लवकरच पार पडण्याची शक्यता आहे. बिहार निवडणुकीतील दारुण पराभवानंतर अमित शहा यांना हटवून त्यांच्या जागी नवा पक्षाध्यक्ष निवडला जाण्याची शक्यता असल्याचे भाजपच्या गोटात मानले जात होते; परंतु राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेनंतर शहा यांना हटविण्याचा विचार बाजूला ठेवण्यात आला. राजनाथसिंग किंवा नितीन गडकरी यापैकी कुणालाही पक्षाच्या कामासाठी सोडण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदींची तयारी नाही. त्यामुळे शहा यांनी तीन वर्षांच्या कार्यकाळासाठी पक्षाध्यक्षपदी कायम राहावे, अशी मोदींची इच्छा आहे. तथापि, समेट घडवून आणण्याचा एक भाग म्हणून पक्ष संघटनात्मक बदल करताना काही ज्येष्ठ नेत्यांच्या सूचनांनाही उचित महत्त्व दिले जाणार आहे.सरकारमध्ये खांदेपालट करताना केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्या खांद्यावर एखादी अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात येण्याची शक्यता आहे. त्यांच्याकडे नागरी उड्डयन खात्याचा अतिरिक्त कारभार सोपविला जाऊ शकतो, असे मानले जात आहे. गडकरी यांना रेल्वे मंत्रिपद दिले जाण्याची शक्यताही वर्तविण्यात आली होती; परंतु पंतप्रधान मोदी हे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या कामगिरीबाबत समाधानी असल्याने ही शक्यता कमी आहे. गडकरी यांची त्यांच्या मंत्रालयातील कामगिरी कौतुकास्पद राहिलेली आहे. गडकरी हे नागपूरचे आहेत आणि ते सरसंघचालक मोहन भागवत यांचे विश्वासू मानले जातात. केंद्रीय मंत्रिमंडळात लवकरच फेरबदलपंतप्रधान नरेंद्र मोदी हे लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल करण्याची प्रक्रिया सुरू करणार आहेत. अमित शहा यांची पक्षाध्यक्षपदी फेरनिवड झाल्याची अधिकृत घोषणा करण्यात आल्यानंतर लगेच ही प्रक्रिया प्रारंभ होईल. दिल्लीत एक कार्यक्रम आयोजित करून त्यात शहा यांच्या फेरनिवडीची घोषणा केली जाणार असल्याचे समजते. केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल करताना बिहारचे प्रतिनिधित्व कमी करून २०१६-१७ मध्ये विधानसभा निवडणुका होऊ घातलेल्या राज्यांना जादा प्रतिनिधित्व दिले जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.