शहरं
Join us  
Trending Stories
1
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
2
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
3
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
4
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
5
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...
6
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
7
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान
8
मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई
9
छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा
10
ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता
11
मतदारयाद्या पुनरावलोकनाच्या काही नियमांत सूट; बिहार निवडणूक; आता बीएलओंवर जबाबदारी
12
दोन ठाकरेंच्या एकत्र येण्याचे असे झाले प्लॅनिंग..!
13
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
14
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
15
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
16
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
17
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
18
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
19
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
20
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?

लाखेगाव येथे पाण्याची भीषण टंचाई

By admin | Updated: February 14, 2015 23:50 IST

कचनेर : पैठण तालुक्यातील लाखेगाव- अलीपूर येथे पिण्याच्या पाण्याची दीड महिन्यापासून तीव्र टंचाई असून हंडाभर पाण्यासाठी महिलांना भरउन्हात फिरावे लागत आहे. गावातील हातपंप शेवटची घटिका मोजत आहे. सरपंच अंकुश रहाटवाडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, शासनाकडे अधिग्रहण विहिरीसाठी प्रस्ताव तीन-चार दिवसांपूर्वी पाठविला आहे. पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. तातडीने पिण्याच्या पाण्याची शासनाने व्यवस्था करण्याची मागणी सरपंच अंकुश रहाटवाडे यांनी केली आहे.

कचनेर : पैठण तालुक्यातील लाखेगाव- अलीपूर येथे पिण्याच्या पाण्याची दीड महिन्यापासून तीव्र टंचाई असून हंडाभर पाण्यासाठी महिलांना भरउन्हात फिरावे लागत आहे. गावातील हातपंप शेवटची घटिका मोजत आहे. सरपंच अंकुश रहाटवाडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, शासनाकडे अधिग्रहण विहिरीसाठी प्रस्ताव तीन-चार दिवसांपूर्वी पाठविला आहे. पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. तातडीने पिण्याच्या पाण्याची शासनाने व्यवस्था करण्याची मागणी सरपंच अंकुश रहाटवाडे यांनी केली आहे.

शेतकर्‍याची आत्महत्या
लिंबेजळगाव : तुर्काबाद खराडीजवळील राजुरा येथील कर्जबाजारी शेतकर्‍याने विषारी द्रव सेवन करून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (दि. १३) रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास घडली. गंगापूर तालुक्यातील राजुरा येथील शेतकरी कारभारी अंबादास बोबडे (५५) याने सतत नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून स्वत:च्या शेत गट क्र. १४ मध्ये जाऊन कपासीवर मारण्याचे मोनोसील हे विषारी औषध शुक्रवार रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास सेवन केले. बेशुद्धावस्थेत त्यास मुलगा व नातेवाईकांनी उपचारार्थ घाटी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. कारभारी अंबादास बोबडे या शेतकर्‍याकडे बँक ऑफ महाराष्ट्र, तुर्काबाद शाखेचे ५० हजार रुपये पीककर्ज तसेच राजुरा येथील संत ज्ञानेश्वर बचत गटाचे ८७ हजार ५०० रुपये कर्ज होते.
गंगापूर तालुक्यात सतत दोन ते तीन वर्षांपासून दुष्काळजन्य परिस्थिती आहे. त्यामुळे अनेक गावांतील पीकपाणी ठीक नाही. बोबडे यास शेत गटक्रमांक १४ मध्ये ३ एकर १० गंुठे जमीन असून शेतात विहीर खोदलेली आहे. ती ५१ फूट खोल आहे. बोबडे यांनी शेतात मिरची, वांगे, मका व कापसाची लागवड केली होती. मात्र, शेतातील विहिरीचे पाणी हळूहळू कमी होऊन विहीर पाण्याविना कोरडीठाक पडलेली आहे. त्यामुळे शेतात लावलेले मिरचीचे पीक वाळून गेले असून वांगे व मका जेमतेम झाले, तर कपासीचे पीकही फारसे आले नाही. त्यात कापसाला यावर्षी अत्यंत कमी भाव मिळाला. त्यामुळे निराश होऊन कारभारी बोबडे यांनी आपली जीवनयात्रा संपविली. कारभारी बोबडे हे शेतात वस्ती करून कुटुंबासह राहतात. त्यांना दोन मुले, एक मुलगी, पत्नी व आई तसेच नातवंडे आहेत. याबाबत वाळूज पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.