शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

लाखेगाव येथे पाण्याची भीषण टंचाई

By admin | Updated: February 14, 2015 23:50 IST

कचनेर : पैठण तालुक्यातील लाखेगाव- अलीपूर येथे पिण्याच्या पाण्याची दीड महिन्यापासून तीव्र टंचाई असून हंडाभर पाण्यासाठी महिलांना भरउन्हात फिरावे लागत आहे. गावातील हातपंप शेवटची घटिका मोजत आहे. सरपंच अंकुश रहाटवाडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, शासनाकडे अधिग्रहण विहिरीसाठी प्रस्ताव तीन-चार दिवसांपूर्वी पाठविला आहे. पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. तातडीने पिण्याच्या पाण्याची शासनाने व्यवस्था करण्याची मागणी सरपंच अंकुश रहाटवाडे यांनी केली आहे.

कचनेर : पैठण तालुक्यातील लाखेगाव- अलीपूर येथे पिण्याच्या पाण्याची दीड महिन्यापासून तीव्र टंचाई असून हंडाभर पाण्यासाठी महिलांना भरउन्हात फिरावे लागत आहे. गावातील हातपंप शेवटची घटिका मोजत आहे. सरपंच अंकुश रहाटवाडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, शासनाकडे अधिग्रहण विहिरीसाठी प्रस्ताव तीन-चार दिवसांपूर्वी पाठविला आहे. पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. तातडीने पिण्याच्या पाण्याची शासनाने व्यवस्था करण्याची मागणी सरपंच अंकुश रहाटवाडे यांनी केली आहे.

शेतकर्‍याची आत्महत्या
लिंबेजळगाव : तुर्काबाद खराडीजवळील राजुरा येथील कर्जबाजारी शेतकर्‍याने विषारी द्रव सेवन करून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (दि. १३) रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास घडली. गंगापूर तालुक्यातील राजुरा येथील शेतकरी कारभारी अंबादास बोबडे (५५) याने सतत नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून स्वत:च्या शेत गट क्र. १४ मध्ये जाऊन कपासीवर मारण्याचे मोनोसील हे विषारी औषध शुक्रवार रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास सेवन केले. बेशुद्धावस्थेत त्यास मुलगा व नातेवाईकांनी उपचारार्थ घाटी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. कारभारी अंबादास बोबडे या शेतकर्‍याकडे बँक ऑफ महाराष्ट्र, तुर्काबाद शाखेचे ५० हजार रुपये पीककर्ज तसेच राजुरा येथील संत ज्ञानेश्वर बचत गटाचे ८७ हजार ५०० रुपये कर्ज होते.
गंगापूर तालुक्यात सतत दोन ते तीन वर्षांपासून दुष्काळजन्य परिस्थिती आहे. त्यामुळे अनेक गावांतील पीकपाणी ठीक नाही. बोबडे यास शेत गटक्रमांक १४ मध्ये ३ एकर १० गंुठे जमीन असून शेतात विहीर खोदलेली आहे. ती ५१ फूट खोल आहे. बोबडे यांनी शेतात मिरची, वांगे, मका व कापसाची लागवड केली होती. मात्र, शेतातील विहिरीचे पाणी हळूहळू कमी होऊन विहीर पाण्याविना कोरडीठाक पडलेली आहे. त्यामुळे शेतात लावलेले मिरचीचे पीक वाळून गेले असून वांगे व मका जेमतेम झाले, तर कपासीचे पीकही फारसे आले नाही. त्यात कापसाला यावर्षी अत्यंत कमी भाव मिळाला. त्यामुळे निराश होऊन कारभारी बोबडे यांनी आपली जीवनयात्रा संपविली. कारभारी बोबडे हे शेतात वस्ती करून कुटुंबासह राहतात. त्यांना दोन मुले, एक मुलगी, पत्नी व आई तसेच नातवंडे आहेत. याबाबत वाळूज पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.