शहरं
Join us  
Trending Stories
1
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
2
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
3
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
4
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
5
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
6
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
7
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
8
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
9
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
10
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
11
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
12
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
13
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
14
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
15
राज्यात धरणग्रस्तांच्या जमीन वाटपात मोठा भ्रष्टाचार; जयंत पाटलांचा विधानसभेत घणाघाती आरोप
16
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
17
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज
18
"मी प्रदेशाध्यक्ष आहे, भाजपमध्ये जाण्यासाठी मला..."; भाजप प्रवेशावर जयंत पाटलांनी सोडलं मौन
19
7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल
20
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"

सात हजार गावे विद्युत दिव्यांनी उजळली

By admin | Updated: March 29, 2016 01:40 IST

चालू आर्थिक वर्षात केंद्र सरकारने निश्चित केलेले विद्युतीकरणाचे लक्ष्य पूर्ण केले आहे. याअंतर्गत देशातील ७ हजार गावे विद्युत दिव्यांनी उजळून निघाली आहेत.

नवी दिल्ली : चालू आर्थिक वर्षात केंद्र सरकारने निश्चित केलेले विद्युतीकरणाचे लक्ष्य पूर्ण केले आहे. याअंतर्गत देशातील ७ हजार गावे विद्युत दिव्यांनी उजळून निघाली आहेत.केंद्रीय विद्युत मंत्रालयाने एक निवेदन जारी करून ही माहिती दिली. निवेदनात म्हटले की, २0१५-१६ या आर्थिक वर्षात ७,0१२ गावांत वीज पोहोचविण्यात आली आहे. आणखी ११,४४0 गावे विजेविना आहेत. त्यापैकी ७,८४३ गावांना ग्रीडच्या माध्यमातून वीज पोहोचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. ३,१४८ गावांना आॅफ-ग्रिड वीज पोहोचविली जाणार आहे. दूरवर्ती आणि डोंगराळ असल्यामुळे या भागांत ग्रीड पोहोचलेले नाही. त्यामुळे आॅफ-ग्रीड वीज पुरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ४४९ गावांतराज्य सरकारांना वीज पुरविण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. निवेदनात म्हटले की, एप्रिल ते आॅगस्ट २0१५ या काळात १,६५४ गावांत वीज पोहोचविण्यात आली. आॅगस्ट ते मार्च या काळात आणखी ५,३५८ गावांत वीज पोहोचविण्यात आली. विद्युतीकरणावर सरकारचे खास लक्ष होते. या प्रक्रियेला गती देण्यासाठी ग्रामविद्युत अभियंत्यांकडून कडक निगराणी केली जात होती. प्रत्येक महिन्याला नियमितपणे प्रगतीचा आढावाही घेतला जात होता. आवश्यकता वाटल्यास अन्य उपाययोजनाही करण्यात आल्या. (वृत्तसंस्था)