शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
2
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
3
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
4
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
5
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
6
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
7
अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
8
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
9
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
10
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
11
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
12
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
13
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...
14
मुंबई, पंजाब नाहीतर 'हा' संघ जिंकणार आयपीएलची ट्रॉफी; सुनील गावस्कर यांची भविष्यवाणी
15
भयंकर! ४ वर्षे पालकांनी ३ मुलांना घरात ठेवलेलं कोंडून; कारण ऐकून बसेल मोठा धक्का
16
पुत्र जन्मला! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला, गोंडस लेकाला दिला जन्म
17
पत्नीची हत्या करुन मृतदेह पुरला, तीन दिवसांनी हात बाहेर येताच...; दृष्य पाहून पोलिसही हादरले
18
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या
19
“तेव्हा मी केंद्रात होतो, फडणवीस नाही”; जातनिहाय जनगणनेवर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले
20
Tata Motors नं Q4 निकाल आणि डिविडेंडपूर्वी घेतला मोठा निर्णय; ५०० कोटी रुपयांचं आहे प्रकरण

सात पाकिस्तानी सैनिक ठार, भारताकडून क्षेपणास्त्राचा वापर ?

By admin | Updated: November 14, 2016 15:02 IST

नियंत्रण रेषेवर भारतीय सैन्याच्या गोळीबारात आमचे सात सैनिक मारले गेले असा दावा पाकिस्तानने केला आहे.

ऑनलाइन लोकमत 

इस्लामाबाद, दि. १४ - नियंत्रण रेषेवर भारतीय सैन्याच्या गोळीबारात आमचे सात सैनिक मारले गेले असा दावा पाकिस्तानने केला आहे. भिमबेर सेक्टरमध्ये रात्री झालेल्या गोळीबारात आमचे सात सैनिक ठार झाले असे पाकिस्तानने म्हटले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विनाकारण गोळीबार करणा-या पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारतीय सैन्याने मोठया प्रमाणावर तोपाचा वापर केला तसेच रणगाडे विरोधी क्षेपणास्त्रही वापरले.
 
 
सीमेवर सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करुन कुरापती काढणा-या पाकिस्तानला भारतीय सैन्य जशास तसे प्रत्युत्तर देत आहे. पाकिस्तानच्या गोळीबारातही भारताचे काही जवान शहीद झाले. अनेक निष्पाप नागरीक मारले गेले. मागच्या काही दिवसात सीमा सुरक्षा दलाने केलेल्या कारवाईत पाकिस्तानचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले पण पाकिस्तानने कधीही जाहीरपणे हे मान्य केले नाही. 
 
तसेच बदनामी टाळण्यासाठी या बातम्या दाबून ठेवल्या पण यावेळी पाकिस्तानने प्रथमच आपले सात सैनिक मारले गेल्याचा दावा केला आहे. मागच्या काही आठवडयात भारताच्या गोळीबारात पाकव्याप्त काश्मिरमधील २५ नागरीक ठार झाल्याचे पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले होते.