शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

नदी पुनरुज्जीवनाला अनास्थेची बाधा सात कोटी निधी प्राप्त : जून अखेरची मुदत मात्र एकाही कामाला सुरुवात नाही

By admin | Updated: May 21, 2016 00:07 IST

जळगाव : राज्य शासनातर्फे जलयुक्त शिवार योजनेंतर्गत नदी पुनरुज्जीवनाच्या कामासाठी ७ कोटी १३ लाखांचा निधी प्राप्त झाला आहे. जून अखेरपर्यंत हे काम पूर्ण होणे अपेक्षित असताना अद्यापपर्यंत ८६ पैकी एकाही बंधार्‍याच्या कामाला सुरुवात झालेली नसल्याची धक्कादायक स्थिती आहे.

जळगाव : राज्य शासनातर्फे जलयुक्त शिवार योजनेंतर्गत नदी पुनरुज्जीवनाच्या कामासाठी ७ कोटी १३ लाखांचा निधी प्राप्त झाला आहे. जून अखेरपर्यंत हे काम पूर्ण होणे अपेक्षित असताना अद्यापपर्यंत ८६ पैकी एकाही बंधार्‍याच्या कामाला सुरुवात झालेली नसल्याची धक्कादायक स्थिती आहे.

१० नद्यांवर ८६ बंधार्‍यांचे कामे
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत नदी पुनरुज्जीवन योजनेची कामे सुरू आहेत. यात मालन, भोगावती, खडकी, कांग, तितूर, हिवरा, बहुळा, गिरणा, व्याघ्रा, देव या नद्यांवर ८६ बंधारे बांधण्यात येणार आहे. यासाठी १८ कोटी ३७ लाखांचा निधी अपेक्षित आहे. त्यापैकी मार्च महिन्यात सात कोटी १३ लाखांचा निधी या कामांसाठी प्राप्त झाला आहे.

दोन नद्यांच्या कामाला सुरुवात
नदी पुनरुज्जीवन योजनेंतर्गत लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता, जि.प.लघुसिंचन विभाग, मध्यम प्रकल्प विभाग क्रमांक दोन या यंत्रणांकडे कामे सोपविण्यात आली आहे. त्या पैकी बोदवड व भुसावळ तालुक्यातून जाणार्‍या भोगावती नदीवरील तीन बंधार्‍यांवरील फाउंडेशनचे काम पूर्ण झाले आहे. तर चार बंधार्‍यांच्या फाउंडेशनच्या कामाला सुरुवात झाली आहे. तर बोदवड तालुक्यातील देव नदीच्या ७ बंधार्‍यांच्या फाउंडेशनच्या कामाला सुरुवात झाली असून सात बंधार्‍यांचे फाउंडेशन पूर्ण झाले आहे.

अनेक बंधार्‍यांचे काम निविदास्तरावर
अमळनेर तालुक्यातील मालन नदी, जामनेर तालुक्यातील कांग व खडकी नदी, पाचोरा तालुक्यातील तितूर, हिवरा, बहुळा, चाळीसगाव तालुक्यातील गिरणा नदी, बोदवड तालुक्यातील व्याघ्रा नदीवरील बहुतांश बंधार्‍यांच्या काम हे निविदास्तरावर तर काही कामे हे कार्यारंभ आदेशासाठी प्रलंबित आहे. कांग नदीवरील १० बंधार्‍यांचे दोन कोटी १३ लाखांचा प्रस्ताव सुधारित मान्यतेसाठी शासनाकडे सादर करण्यात आला आहे. तर गिरणा नदीवरील नाला खोलीकरण विषयक असल्याने चाळीसगावात तितूर नदी ११ बंधार्‍यांचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

चांगला पाऊस झाल्यास काम अशक्य
सध्या नदी पात्रात पाणी नसल्याने बंधार्‍यांचे काम सहज पूर्ण होण्यासारखी स्थिती आहे. यावर्षी चांगल्या पावसाचा अंदाज हवामानखात्याने वर्तविला आहे. त्यामुळे जून महिन्यातच चांगला पाऊस होऊन नदी व नाले भरल्यास बंधारे उभारणीच्या कामाला खीळ बसणार आहे. त्यामुळे बंधार्‍यांच्या कामाला वेग देण्याची गरज आहे.