शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
4
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
5
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
6
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
7
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
8
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
9
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
10
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
11
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
12
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
13
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
14
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
15
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
16
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
17
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
18
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
19
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
20
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...

नदी पुनरुज्जीवनाला अनास्थेची बाधा सात कोटी निधी प्राप्त : जून अखेरची मुदत मात्र एकाही कामाला सुरुवात नाही

By admin | Updated: May 21, 2016 00:07 IST

जळगाव : राज्य शासनातर्फे जलयुक्त शिवार योजनेंतर्गत नदी पुनरुज्जीवनाच्या कामासाठी ७ कोटी १३ लाखांचा निधी प्राप्त झाला आहे. जून अखेरपर्यंत हे काम पूर्ण होणे अपेक्षित असताना अद्यापपर्यंत ८६ पैकी एकाही बंधार्‍याच्या कामाला सुरुवात झालेली नसल्याची धक्कादायक स्थिती आहे.

जळगाव : राज्य शासनातर्फे जलयुक्त शिवार योजनेंतर्गत नदी पुनरुज्जीवनाच्या कामासाठी ७ कोटी १३ लाखांचा निधी प्राप्त झाला आहे. जून अखेरपर्यंत हे काम पूर्ण होणे अपेक्षित असताना अद्यापपर्यंत ८६ पैकी एकाही बंधार्‍याच्या कामाला सुरुवात झालेली नसल्याची धक्कादायक स्थिती आहे.

१० नद्यांवर ८६ बंधार्‍यांचे कामे
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत नदी पुनरुज्जीवन योजनेची कामे सुरू आहेत. यात मालन, भोगावती, खडकी, कांग, तितूर, हिवरा, बहुळा, गिरणा, व्याघ्रा, देव या नद्यांवर ८६ बंधारे बांधण्यात येणार आहे. यासाठी १८ कोटी ३७ लाखांचा निधी अपेक्षित आहे. त्यापैकी मार्च महिन्यात सात कोटी १३ लाखांचा निधी या कामांसाठी प्राप्त झाला आहे.

दोन नद्यांच्या कामाला सुरुवात
नदी पुनरुज्जीवन योजनेंतर्गत लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता, जि.प.लघुसिंचन विभाग, मध्यम प्रकल्प विभाग क्रमांक दोन या यंत्रणांकडे कामे सोपविण्यात आली आहे. त्या पैकी बोदवड व भुसावळ तालुक्यातून जाणार्‍या भोगावती नदीवरील तीन बंधार्‍यांवरील फाउंडेशनचे काम पूर्ण झाले आहे. तर चार बंधार्‍यांच्या फाउंडेशनच्या कामाला सुरुवात झाली आहे. तर बोदवड तालुक्यातील देव नदीच्या ७ बंधार्‍यांच्या फाउंडेशनच्या कामाला सुरुवात झाली असून सात बंधार्‍यांचे फाउंडेशन पूर्ण झाले आहे.

अनेक बंधार्‍यांचे काम निविदास्तरावर
अमळनेर तालुक्यातील मालन नदी, जामनेर तालुक्यातील कांग व खडकी नदी, पाचोरा तालुक्यातील तितूर, हिवरा, बहुळा, चाळीसगाव तालुक्यातील गिरणा नदी, बोदवड तालुक्यातील व्याघ्रा नदीवरील बहुतांश बंधार्‍यांच्या काम हे निविदास्तरावर तर काही कामे हे कार्यारंभ आदेशासाठी प्रलंबित आहे. कांग नदीवरील १० बंधार्‍यांचे दोन कोटी १३ लाखांचा प्रस्ताव सुधारित मान्यतेसाठी शासनाकडे सादर करण्यात आला आहे. तर गिरणा नदीवरील नाला खोलीकरण विषयक असल्याने चाळीसगावात तितूर नदी ११ बंधार्‍यांचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

चांगला पाऊस झाल्यास काम अशक्य
सध्या नदी पात्रात पाणी नसल्याने बंधार्‍यांचे काम सहज पूर्ण होण्यासारखी स्थिती आहे. यावर्षी चांगल्या पावसाचा अंदाज हवामानखात्याने वर्तविला आहे. त्यामुळे जून महिन्यातच चांगला पाऊस होऊन नदी व नाले भरल्यास बंधारे उभारणीच्या कामाला खीळ बसणार आहे. त्यामुळे बंधार्‍यांच्या कामाला वेग देण्याची गरज आहे.