शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

विभागीय शेअर बाजारातून 7क्क् कंपन्या गायब?

By admin | Updated: August 8, 2014 02:09 IST

कंपनी व्यवहार मंत्रलय आणि विभागीय स्टॉक एक्स्चेंजकडील आकडेवारीनुसार एक्स्चेंजवर नोंद झालेल्या सुमारे 700 कंपन्यांचा थांगपत्ता नसल्याचे उघड झाले आहे.

मुंबई : कंपनी व्यवहार मंत्रलय आणि विभागीय स्टॉक एक्स्चेंजकडील आकडेवारीनुसार एक्स्चेंजवर नोंद झालेल्या सुमारे 700 कंपन्यांचा थांगपत्ता नसल्याचे उघड झाले आहे. या कंपन्यांच्या अधिकृत पत्त्यावर कोणतीही माहिती मिळालेली नाही. अधिकृत सरकारी आकडेवारीनुसार मात्र नाहीशा झालेल्या कंपन्यांचा आकडा फक्त 87 एवढा आहे.
या कंपन्यांकडून स्टॉक एक्स्चेंजलाही दीर्घकाळापासून कोणताही पत्रव्यवहार झालेला नाही. गुंतवणूकदार संघटनेने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार या कंपन्यांचे एकत्रित मूल्य 29 हजार कोटी रुपये एवढे आहे.
नाहीशा झालेल्या कंपन्या म्हणजे अशा कंपन्या ज्यांनी प्राथमिक भागविक्रीच्या माध्यमातून गुंतवणूकदारांकडून रक्कम गोळा केली आणि नंतर त्यांची कोणतीही माहिती मिळू शकत नाही.
कंपनी मंत्रलयाची समन्वय आणि देखरेख समिती व सेबीसह रिझव्र्ह बँक यावर लक्ष ठेवून आहे. गेल्या दोन दशकांत देशात अशा प्रकारच्या कंपन्या उघड झाल्या नव्हत्या. मात्र, सीएमसीच्या मागच्या बैठकीतील नोंदीनुसार समितीच्या अध्यक्षांनी अशा कंपन्यांचा आकडा वाढत असल्याचे म्हटल्याचे पुढे आले आहे. विभागीय स्टॉक एक्स्चेंजवर अशा कंपन्या असल्याचे यात म्हटले. 
ताळेबंद मांडण्यात त्रुटी असणा:या 2 हजार 397 कंपन्या असून, यातील 1 हजार 12 कंपन्यांची बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज अथवा नॅशनल स्टॉक एक्स्चेंजवर नोंद असून, उर्वरित 1 हजार 835 कंपन्यांची नोंद आहे. बीएसई अथवा एनएसईवर नोंदणी झालेल्या कंपन्यांपैकी निम्म्या कंपन्या नाहीशा झाल्या असाव्यात, असे या इतिवृत्तात म्हटले. ही बैठक गेल्या वर्षी जुलै महिन्यात झाली होती. (प्रतिनिधी)
 
 
 
राष्ट्रीय एक्स्चेंजवरील अशा कंपन्यांच्या संख्येशी तुलना करता विभागीय स्टॉक एक्स्चेंजवरील अशा कंपन्यांची संख्या कमी असली, तरी ती 700 च्या आसपास असण्याची शक्यता आहे. प्रत्यक्षात ही संख्या आणखी वाढू शकते. सीएमसीच्या गेल्या वर्षीच्या बैठकीनंतर अनेक विभागीय स्टॉक एक्स्चेंज बंद होण्याच्या मार्गावर आहेत.
 
4 या एक्स्चेंजना त्यांच्याकडे नोंद झालेल्या कंपन्यांची माहिती पाठविण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार 11 विभागीय एक्स्चेंजनी दिलेल्या माहितीनुसार नोंद झालेल्या 3 हजार 669 कंपन्यांनी नोंदणीसाठीच्या करारातील तरतुदी पूर्ण केलेल्या नाहीत.  आठ  एक्स्चेंजकडील माहितीचा यात समावेश नाही.