शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
“कार्यकर्त्यांच्या मनातला निर्णय होईल”; दोन्ही NCP एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंचे विधान
3
Viral : मेहुणीला बघून कंट्रोल सुटला, भर स्टेजवरच नवरदेवाने ताल धरला! व्हिडीओ होतोय व्हायरल
4
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
5
MS Dhoni च्या गॅरेजमध्ये 100 हून अधिक लक्झरी बाईक्स; किंमत ऐकून बसेल धक्का..!
6
मणिपूरमध्ये पुन्हा गोंधळ! निदर्शकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, पोलिसांशी हिंसक संघर्ष
7
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
8
भारत-इंग्लंड कसोटी आधी तेंडुलकर-अँडरसनमुळे वातावरण तापलं! ECB अन् BCCI असा काढणार तोडगा?
9
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
10
"सध्या अ‍ॅक्शन सिनेमे चालत आहेत, त्यामुळे.."; आमिर खान 'सितारे जमीन पर'साठी चिंताग्रस्त, म्हणाला-
11
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
12
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
13
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
14
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
15
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
16
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण
17
विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
19
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
20
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक

विभागीय शेअर बाजारातून 7क्क् कंपन्या गायब?

By admin | Updated: August 8, 2014 02:09 IST

कंपनी व्यवहार मंत्रलय आणि विभागीय स्टॉक एक्स्चेंजकडील आकडेवारीनुसार एक्स्चेंजवर नोंद झालेल्या सुमारे 700 कंपन्यांचा थांगपत्ता नसल्याचे उघड झाले आहे.

मुंबई : कंपनी व्यवहार मंत्रलय आणि विभागीय स्टॉक एक्स्चेंजकडील आकडेवारीनुसार एक्स्चेंजवर नोंद झालेल्या सुमारे 700 कंपन्यांचा थांगपत्ता नसल्याचे उघड झाले आहे. या कंपन्यांच्या अधिकृत पत्त्यावर कोणतीही माहिती मिळालेली नाही. अधिकृत सरकारी आकडेवारीनुसार मात्र नाहीशा झालेल्या कंपन्यांचा आकडा फक्त 87 एवढा आहे.
या कंपन्यांकडून स्टॉक एक्स्चेंजलाही दीर्घकाळापासून कोणताही पत्रव्यवहार झालेला नाही. गुंतवणूकदार संघटनेने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार या कंपन्यांचे एकत्रित मूल्य 29 हजार कोटी रुपये एवढे आहे.
नाहीशा झालेल्या कंपन्या म्हणजे अशा कंपन्या ज्यांनी प्राथमिक भागविक्रीच्या माध्यमातून गुंतवणूकदारांकडून रक्कम गोळा केली आणि नंतर त्यांची कोणतीही माहिती मिळू शकत नाही.
कंपनी मंत्रलयाची समन्वय आणि देखरेख समिती व सेबीसह रिझव्र्ह बँक यावर लक्ष ठेवून आहे. गेल्या दोन दशकांत देशात अशा प्रकारच्या कंपन्या उघड झाल्या नव्हत्या. मात्र, सीएमसीच्या मागच्या बैठकीतील नोंदीनुसार समितीच्या अध्यक्षांनी अशा कंपन्यांचा आकडा वाढत असल्याचे म्हटल्याचे पुढे आले आहे. विभागीय स्टॉक एक्स्चेंजवर अशा कंपन्या असल्याचे यात म्हटले. 
ताळेबंद मांडण्यात त्रुटी असणा:या 2 हजार 397 कंपन्या असून, यातील 1 हजार 12 कंपन्यांची बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज अथवा नॅशनल स्टॉक एक्स्चेंजवर नोंद असून, उर्वरित 1 हजार 835 कंपन्यांची नोंद आहे. बीएसई अथवा एनएसईवर नोंदणी झालेल्या कंपन्यांपैकी निम्म्या कंपन्या नाहीशा झाल्या असाव्यात, असे या इतिवृत्तात म्हटले. ही बैठक गेल्या वर्षी जुलै महिन्यात झाली होती. (प्रतिनिधी)
 
 
 
राष्ट्रीय एक्स्चेंजवरील अशा कंपन्यांच्या संख्येशी तुलना करता विभागीय स्टॉक एक्स्चेंजवरील अशा कंपन्यांची संख्या कमी असली, तरी ती 700 च्या आसपास असण्याची शक्यता आहे. प्रत्यक्षात ही संख्या आणखी वाढू शकते. सीएमसीच्या गेल्या वर्षीच्या बैठकीनंतर अनेक विभागीय स्टॉक एक्स्चेंज बंद होण्याच्या मार्गावर आहेत.
 
4 या एक्स्चेंजना त्यांच्याकडे नोंद झालेल्या कंपन्यांची माहिती पाठविण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार 11 विभागीय एक्स्चेंजनी दिलेल्या माहितीनुसार नोंद झालेल्या 3 हजार 669 कंपन्यांनी नोंदणीसाठीच्या करारातील तरतुदी पूर्ण केलेल्या नाहीत.  आठ  एक्स्चेंजकडील माहितीचा यात समावेश नाही.