शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
3
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
4
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
5
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
6
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
7
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
8
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
9
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
10
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
11
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
12
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
13
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
14
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
15
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
16
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
17
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
18
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
19
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
20
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!

डाळ शिजेना!

By admin | Updated: October 20, 2015 04:35 IST

ऐन दिवाळीच्या तोंडावर २०० रुपयांचा उच्चांक गाठणाऱ्या डाळींच्या दराने केंद्र व राज्यातील भाजपा सरकारची कोंडी झाली असून, जनतेतील असंतोषावर तात्पुरती मलमपट्टी करण्यासाठी

मुंबई : ऐन दिवाळीच्या तोंडावर २०० रुपयांचा उच्चांक गाठणाऱ्या डाळींच्या दराने केंद्र व राज्यातील भाजपा सरकारची कोंडी झाली असून, जनतेतील असंतोषावर तात्पुरती मलमपट्टी करण्यासाठी अखेर डाळी, खाद्यतेल आणि खाद्य तेलबियांच्या साठ्यावर ११ महिन्यांसाठी निर्बंध घालण्यात आले आहेत. वाढत्या दरामुळे गरिबाघरी डाळ शिजेना म्हणून, केंद्र सरकारने या वस्तूंचा साठा करण्याकरिता लागू केलेल्या निर्बंधांना अनुसरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरील आदेश जारी केले. राज्यात डाळी, खाद्यतेले आणि तेलबियांची साठेबाजी करण्यावरील निर्बंध ३० सप्टेंबर २०१६पर्यंत लागू असणार आहेत. यापूर्वी एप्रिल २०१५मध्ये डाळी आणि खाद्यतेलांच्या साठवणुकीवरील निर्बंध उठवण्यासाठी काढण्यात आलेले आदेश रद्द करण्यात आले आहेत. आजच्या आदेशानुसार डाळी, खाद्यतेलबिया आणि खाद्यतेल यांच्या साठवणुकीवर सरकारने फेब्रुवारी २०१०मध्ये लागू केले तसे निर्बंध लागू राहतील.या उपाययोजनेनंतर अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून राज्यातील परिस्थितीवर काटेकोर लक्ष ठेवण्यात येणार असून, याबाबत दररोज सायंकाळी विभागाकडून आढावा घेण्यात येणार आहे, असे या विभागाचे सचिव दीपक कपूर यांनी सांगितले आहे. दरम्यान, केंद्र शासनाने डाळींचा काळाबाजार व साठेबाजीविरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु महाराष्ट्रात मागील दोन महिन्यांमध्ये सामान्य नागरिक, बाजार समित्यांचे प्रतिनिधी व विरोधी पक्षही साठेबाजी थांबविण्याची मागणी सातत्याने करीत आहेत. एक वर्षापासून डाळी बाजार समितीमधून वगळण्यात आल्या आहेत. त्यामुळे साठेबाजांवर बाजार समिती कारवाई करीत नाही. शासनाने कारवाई करणे अपेक्षित असताना बाजारभाव २०० रुपयांपेक्षा जास्त झाल्यानंतरही अद्याप एकाही साठेबाजावर कारवाई केलेली नाही. (विशेष प्रतिनिधी)२५ लाखांची डाळ चोरीलानागपूरमध्ये २५ लाख रुपये किमतीची तुरीची डाळ चोरीला गेल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. कळमना पोलिसांनी रविवारी या प्रकरणी ट्रकचालक व अन्य काही जणांना ताब्यात घेतले. साठवणुकीच्या मर्यादा अशाघाऊक आणि किरकोळ डाळ विक्रेत्यांसाठी साठा मर्यादा महानगरपालिका, अ वर्ग पालिका क्षेत्र इतर ठिकाणी अनुक्र मे ३५०० व २०० क्विंटल, २५०० व १५० क्विंटल आणि १५०० व १५० क्विंटल याप्रमाणे असेल.खाद्यतेलबियांसाठी (टरफले असलेल्या शेंगदाण्यासह) साठा मर्यादा घाऊक आणि किरकोळ विक्रे त्यांसाठी महापालिका क्षेत्र आणि इतर ठिकाणी अनुक्र मे २००० व २०० क्विंटल आणि ८०० व १०० क्विंटल अशी असेल. (शेंगदाणे अथवा बियांसाठी याप्रमाणाच्या ७५ टक्के साठा मर्यादा लागू राहील.)सर्व प्रकारच्या खाद्यतेलांच्या बाबतीत महापालिका क्षेत्रातील घाऊक विक्रे ते १००० क्विंटल, तर किरकोळ विक्रे ते ४० क्विंटल खाद्यतेल साठवू शकतील. इतर ठिकाणी मात्र या मर्यादा घाऊक व किरकोळ विक्रेत्यांसाठी अनुक्र मे ३०० व २० क्विंटल याप्रमाणे असतील.डाळींच्या किमती एक वर्षात दुप्पटदसरा, दिवाळी जवळ आली असताना डाळींचे भाव गगनाला भिडले आहेत. एक वर्षात तूरडाळ तिप्पट व इतर डाळींचे दर जवळपास दुप्पट झाले आहेत. गेल्या एक वर्षामध्ये भाववाढीने विक्रम केला आहे.