शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक युद्ध थांबविणारे ट्रम्प कोण? दाल में कुछ तो काला है : राहुल गांधी
2
बनावट दूतावास उघडले, ४ खोटे देशही बनविले; गाझियाबादमध्ये कारवाई; ४४ लाख रुपये, शिक्के जप्त
3
पाच वर्षांनंतर भारताचा मोठा निर्णय; चिनी पर्यटकांना पुन्हा व्हिसा, चीनकडूनही स्वागत
4
‘ग्रीन इंडिया’मध्ये महाराष्ट्राला सहा वर्षांपासून निधीच नाही; देशभरात एकूण ७४५ कोटी रुपये निधी उपलब्ध
5
कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारीनंतर दोन महिने अटक करता येणार नाही; कायद्याचा गैरवापर टाळण्यासाठी कोर्टाचा उपाय
6
डिजिटल अरेस्ट करणाऱ्या गँगवर मोठी कारवाई, कंबोडियामध्ये १०५ भारतीयांसह ३०७५ अटकेत
7
'देशाच्या राजकारणातील आशादायी नेतृत्व...'; संजय राऊत यांची नितीन गडकरींसाठी खास पोस्ट
8
उड्डाण करत असतानाच विमानाच्या इंजिनाला आग, पायलटने दिला मेडे कॉल, अहमदाबादमध्ये मोठा अपघात टळला  
9
छेड काढणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या माजी प्रदेशाध्यक्षांना महिलेने चपलेने मारले 
10
IND vs ENG 4th Test Day 1 Stumps : साईच्या 'फिफ्टी'सह मोठा तिढा सुटला, पण...
11
कॉलेजमध्ये मराठीत बोलल्याने विद्यार्थ्याला हॉकी स्टिकने मारहाण, जिवे मारण्याची धमकी देऊन आरोपी फरार
12
बापरे! टीम इंडियाला मोठा धक्का; उलटा फटका मारताना पंतला दुखापत; लंगडत लंगडत सोडलं मैदान (VIDEO)
13
धुळ्यात भरचौकात गोळीबार करत मुंबईतील ज्वेलर्सच्याय कर्मचाऱ्यांकडून लाखोंचे सोने लुटले
14
"महायुती सरकारने महाराष्ट्राचा बनवला तमाशा, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा’’, काँग्रेसची बोचरी टीका  
15
वाखारीत न्यू अंबिका कला केंद्रात गोळीबार;आमदाराच्या भावासह चौघांवर गुन्हा दाखल
16
IND vs ENG: चेंडू खेळला नाही म्हणून पंचांनी गिलला दिलं OUT; स्टोक्सच्या गोलंदाजीवर काय घडलं? (VIDEO)
17
बहीण मित्रासोबत गेली लॉजवर, पाठलाग करत पोहचला भाऊ, रंगेहात पकडलं आणि...
18
IND vs ENG : यशस्वीची फिफ्टी ठरली खास; कारण ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात ५० वर्षांनी असं घडलं
19
Nala Sopara: नालासोपाऱ्यात १२व्या मजल्यावरून पडून तीन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू!
20
मुंबईकरांसाठी खुशखबर! शहराला पाणीपुरवठा करणारा तानसा तलाव ओसंडून वाहू लागला!

हॉटेलात सेवाशुल्क बंधनकारक नाही

By admin | Updated: April 22, 2017 04:34 IST

यापुढे हॉटेलांत आणि रेस्टॉरंट्समध्ये गेल्यावर बिलासोबत सेवाशुल्क द्यायचे की नाही, हे पूर्णपणे ग्राहकांनीच ठरवायचे असून, तेथील व्यवस्थापन

नवी दिल्ली : यापुढे हॉटेलांत आणि रेस्टॉरंट्समध्ये गेल्यावर बिलासोबत सेवाशुल्क द्यायचे की नाही, हे पूर्णपणे ग्राहकांनीच ठरवायचे असून, तेथील व्यवस्थापन तुमच्या संमतीशिवाय सेवाशुल्क आकारू शकणार नाही. केंद्र सरकारने या संदर्भातील मार्गदर्शक सूचना तयार केल्या असून, त्याचे पालन सर्व रेस्टॉरंट्स आणि हॉटेलांना करावेच लागेल.अन्न व ग्राहक व्यवहारमंत्री राम विलास पासवान यांनी शुक्रवारी सांगितले की, सेवाशुल्क हा कोणताही कर नसून, ते देण्याचे बंधन ग्राहकांवर अजिबात नाही. सेवाशुल्क द्यायचे की नाही, हे ठरविण्याचा अधिकार ग्राहकांनाच आहे. हॉटेल व्यवस्थापन बिलामध्ये सेवाशुल्काचा समावेश करू शकत नाहीत. तसे त्यांनी केल्यास त्याविरोधात ग्राहक न्यायालयात दाद मागता येईल.गेल्या काही काळापासून अनेक हॉटेल व रेस्टॉरंट्सची व्यवस्थापने ग्राहकांकडून सेवाकरासोबतच सेवाशुल्कही आकारू लागली आहेत. सेवाशुल्क देणे बंधनकारक आहे, असा दावाच ते करीत आहेत. मात्र, सेवाशुल्क म्हणजे एका प्रकारची टिप असून, ती द्यायची की नाही, हे ग्राहकाने ठरवायचे असते. सेवाशुल्काची रक्कम बिलामध्ये घातली जात असल्याच्या तक्रारी येत होत्या. केंद्र सरकारने तशा मार्गदर्शक सूचना तयार केल्या आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)ही प्रथा कायदेशीरचहॉटेल अँड रेस्टॉरंट्स असोसिएशन आॅफ वेस्टर्न इंडियाचे अध्यक्ष दिलीप दातवाणी यांनी मात्र, सरकारचा निर्णय चुकीचा असल्याचे म्हटले आहे. सेवाशुल्क आकारण्याची प्रथा जगभर आणि गेली ५0 वर्षे सुरू आहे. ती कायदेशीर प्रथा आहे. त्याचा उल्लेख मेन्यू कार्डवरही असतो. त्यामुळे ते देण्या न देण्याचा अधिकार ग्राहकांना देणे अयोग्य आहे. हा व्यवसाय आहे. त्यामुळे सेवाशुल्क आकारण्याचा अधिकार आम्हाला असायलाच हवा, असेही ते म्हणाले.