शहरं
Join us  
Trending Stories
1
Cyclone Montha : मोंथाचा विध्वंस! २.१४ लाख एकर पिकं उद्ध्वस्त, १८ लाख लोकांना फटका, रेल्वे स्टेशन पाण्याखाली
2
आजचे राशीभविष्य, ३० ऑक्टोबर २०२५: सरकारी मदत, आर्थिक लाभ; जुने मित्र भेटतील, आनंदी दिवस
3
आता ब्लू इकॉनॉमीकडे झेप, तब्बल १२ लाख कोटींचे करार; शिवछत्रपतींच्या विचारांनी भारत प्रगतीपथावर
4
राज ठाकरेही मेळाव्यात फोडणार मतचोरीचा बॉम्ब? बोगस नावे, मतचोरी, EVM घोटाळ्यांवर सादरीकरण
5
मुंबई पालिकेची निवडणूक जानेवारीच होणार? आरक्षण सोडत ११ नोव्हेंबरला, आयोगाकडून सूचना प्रसिद्ध
6
५ नोव्हेंबरपर्यंत पाऊसधारांचा अंदाज; कमी दाबाचा पट्टा ओमानकडे जाण्याऐवजी किनारपट्ट्यांवर रेंगाळला
7
सावध व्हा, ‘कॉल मर्जिंग स्कॅम’ धाेका ! नव्या पद्धतीने केवळ काही अवधीत लाखो रुपयांवर डल्ला
8
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
9
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
10
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
11
काँग्रेसमध्ये महापालिकेसाठी इच्छुकांची गर्दी; आले ४५० अर्ज, इच्छुकांकडून ५०० रुपये शुल्क
12
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
13
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
14
सेंट जॉर्जेस रुग्णालयातील मृत्यूदर का वाढला? दाखल रुग्णांपैकी २४ ते २५ टक्के जण दगावतात
15
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
16
अर्बन कंपनी सर्च केले आणि ऑनलाइन मेड मागविली; महिलेचे खातेच झाले रिकामे
17
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
18
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
19
संभाव्य दुबार मतदारांची तपासणी करा; राज्य निवडणूक आयोगाचे मतदार याद्यांबाबत आदेश
20
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन

हॉटेलात सेवाशुल्क बंधनकारक नाही

By admin | Updated: April 22, 2017 04:34 IST

यापुढे हॉटेलांत आणि रेस्टॉरंट्समध्ये गेल्यावर बिलासोबत सेवाशुल्क द्यायचे की नाही, हे पूर्णपणे ग्राहकांनीच ठरवायचे असून, तेथील व्यवस्थापन

नवी दिल्ली : यापुढे हॉटेलांत आणि रेस्टॉरंट्समध्ये गेल्यावर बिलासोबत सेवाशुल्क द्यायचे की नाही, हे पूर्णपणे ग्राहकांनीच ठरवायचे असून, तेथील व्यवस्थापन तुमच्या संमतीशिवाय सेवाशुल्क आकारू शकणार नाही. केंद्र सरकारने या संदर्भातील मार्गदर्शक सूचना तयार केल्या असून, त्याचे पालन सर्व रेस्टॉरंट्स आणि हॉटेलांना करावेच लागेल.अन्न व ग्राहक व्यवहारमंत्री राम विलास पासवान यांनी शुक्रवारी सांगितले की, सेवाशुल्क हा कोणताही कर नसून, ते देण्याचे बंधन ग्राहकांवर अजिबात नाही. सेवाशुल्क द्यायचे की नाही, हे ठरविण्याचा अधिकार ग्राहकांनाच आहे. हॉटेल व्यवस्थापन बिलामध्ये सेवाशुल्काचा समावेश करू शकत नाहीत. तसे त्यांनी केल्यास त्याविरोधात ग्राहक न्यायालयात दाद मागता येईल.गेल्या काही काळापासून अनेक हॉटेल व रेस्टॉरंट्सची व्यवस्थापने ग्राहकांकडून सेवाकरासोबतच सेवाशुल्कही आकारू लागली आहेत. सेवाशुल्क देणे बंधनकारक आहे, असा दावाच ते करीत आहेत. मात्र, सेवाशुल्क म्हणजे एका प्रकारची टिप असून, ती द्यायची की नाही, हे ग्राहकाने ठरवायचे असते. सेवाशुल्काची रक्कम बिलामध्ये घातली जात असल्याच्या तक्रारी येत होत्या. केंद्र सरकारने तशा मार्गदर्शक सूचना तयार केल्या आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)ही प्रथा कायदेशीरचहॉटेल अँड रेस्टॉरंट्स असोसिएशन आॅफ वेस्टर्न इंडियाचे अध्यक्ष दिलीप दातवाणी यांनी मात्र, सरकारचा निर्णय चुकीचा असल्याचे म्हटले आहे. सेवाशुल्क आकारण्याची प्रथा जगभर आणि गेली ५0 वर्षे सुरू आहे. ती कायदेशीर प्रथा आहे. त्याचा उल्लेख मेन्यू कार्डवरही असतो. त्यामुळे ते देण्या न देण्याचा अधिकार ग्राहकांना देणे अयोग्य आहे. हा व्यवसाय आहे. त्यामुळे सेवाशुल्क आकारण्याचा अधिकार आम्हाला असायलाच हवा, असेही ते म्हणाले.