शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
2
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
3
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
4
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
5
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
6
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
7
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
8
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
9
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
10
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूरचं जे लक्ष्य होतं ते साध्य केलं - राजनाथ सिंह
11
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
12
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
13
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
14
Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्जनं दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना धु-धू धुतलं, ऐतिहासिक शतक ठोकलं!
15
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?
16
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
17
'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमा बनवा! नेटकऱ्यांची बॉलिवूडकडे मागणी, सुचवलं 'या' अभिनेत्याचं नाव
18
पोलिसाच्या वर्दीत पाहून लेकाची काय होती प्रतिक्रिया? अंकुश चौधरी म्हणाला, "त्याने भलतीच मागणी..."
19
Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर बांगलादेशच्या मनात भिती; खेळाडूंच्या सुरक्षेबाबत उपस्थित केले प्रश्न
20
वर्धा: विवाहित महिला आणि पुरुषाचे प्रेमसंबंध, शेतातील विहिरीत सापडले दोघांचे मृतदेह

साखर कारखान्यांच्या सेवेसाठीच धरणे!

By admin | Updated: April 27, 2016 06:02 IST

हाराष्ट्रातील धरणे शेतकऱ्यांच्या हितासाठी नव्हे तर साखर कारखान्यांची सेवा करण्यासाठी बांधण्यात आली आहेत

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील धरणे शेतकऱ्यांच्या हितासाठी नव्हे तर साखर कारखान्यांची सेवा करण्यासाठी बांधण्यात आली आहेत, असा आरोप करून केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग यांनी मंगळवारी लोकसभेत महाराष्ट्रातील पूर्वाश्रमीच्या काँग्रेस सरकारांवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी राज्यातील दुष्काळावर सभागृहात विचारण्यात आलेल्या प्रश्नावरून सत्तारूढ पक्ष आणि विरोधकांमध्ये वाक्युद्ध भडकले.संपुआच्या राजवटीचा अप्रत्यक्षपणे उल्लेख करताना सिंग म्हणाले, ‘मागील अनेक वर्षांपासून राज्यांना मनरेगा योजनेअंतर्गत उशिरा म्हणजे जुलै-आॅगस्टमध्ये निधी मिळत आला होता. परंतु रालोआ सरकारने अर्थसंकल्प मंजूर झाल्याच्या २४ तासांतच हा निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.’ सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेल्या गुंतवणुकीवर विचारण्यात आलेल्या आणखी एका प्रश्नाच्या उत्तरात कृषिमंत्री सिंग म्हणाले, असे ८० सिंचन प्रकल्प मागील २० वर्षांपासून प्रलंबित आहेत. आता सरकारने त्यापैकी काही प्रकल्प पूर्ण करण्याचे ठरविले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)काँग्रेस-भाजपात उडाली चकमकच्महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्याला सरकार दुष्काळी मदत करणार काय, या शिवसेनेच्या सदस्याने प्रश्नोत्तराच्या तासात विचारलेल्या पूरक प्रश्नाला कृषिमंत्री सिंग हे उत्तर देत असताना; ही मदत अन्य दुष्काळी जिल्ह्णांनाही मिळणार आहे काय, असा प्रश्न काँग्रेस सदस्यांनी विचारला. मध्येच विचारलेल्या या प्रश्नामुळे सिंग संतप्त झाले आणि काँग्रेस सदस्यांना उद्देशून म्हणाले, ‘माझे उत्तर ऐकून घेण्यासाठी जरा धैर्य बाळगा. च्शेतकऱ्यांचे हित जपण्यासाठी नव्हे तर साखर कारखान्यांचे हित जपण्यासाठीच महाराष्ट्रात धरणे बांधण्यात आली आहेत, असा आरोप सिंग यांनी केला. महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा व्हावी अशी माझी मागणी आहे, जेणेकरून सत्य उघड होऊ शकेल.’च्सिंग यांच्या या आरोपावरून काँग्रेस सदस्य भडकले. यावेळी काँग्रेस आणि सत्तारूढ पक्षाच्या सदस्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली आणि आरोप प्रत्यारोपाच्या फैरीही झडल्या. काही काँग्रेस सदस्यांनी सिंग यांच्याशी वाद घातला.