शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

आमचं लक्ष्य एकच! सीरम, भारत बायोटेककडून वादावर पडदा; संयुक्त निवेदन प्रसिद्ध

By कुणाल गवाणकर | Updated: January 5, 2021 15:44 IST

भारतासह जगाला कोरोना लसींचा सुरळीत पुरवठा करण्यास कटिबद्ध; दोन्ही कंपन्यांचं संयुक्त निवेदन

मुंबई: सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि भारत बायोटेक यांच्यातील वादावर अखेर पडदा पडला आहे. सीरम आणि भारत बायोटेकच्या कोरोना लसींच्या आपत्कालीन वापराला परवानगी मिळाल्यानंतर दोन्ही संस्थांकडून एकमेकांवर अप्रत्यक्षपणे टीका होत होती. लसीची परिणामकारकता आणि इतर मुद्द्यांवरून दोन्ही संस्था एकमेकांना लक्ष्य करत होत्या. मात्र आता या वादाला पूर्णविराम मिळाला आहे. दोन्ही संस्थांनी संयुक्त निवेदन प्रसिद्ध करत याबद्दलची माहिती दिली आहे.भारताला आणि जगाला कोरोनावरील लसी लवकर उपलब्ध व्हाव्यात यासाठी दोन्ही कंपन्या एकत्रितपणे काम करतील, अशी माहिती संयुक्त निवेदनातून देण्यात आली आहे. 'भारताला आणि जगाला कोरोनावरील लसी उपलब्ध व्हाव्यात यासाठी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि भारत बायोटेक कटिबद्ध आहे,' असं दोन्ही कंपन्यांनी संयुक्त निवेदनात नमूद केलं आहे. दोन्ही कंपन्या एकत्र येऊन लसीच्या उत्पादन आणि वितरणावर काम करतील, असा इरादादेखील निवेदनातून व्यक्त करण्यात आला आहे.'भारत आणि जगभरातील लोकांचे जीव वाचवण्याचं मोठं आव्हान आमच्यासमोर आहे. लसी या जगभरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं महत्त्वाच्या आहेत. लोकांचं आयुष्य वाचवण्याची आणि अर्थचक्राचा गाडा रुळावर आणण्याची क्षमता लसींमध्ये आहे. उत्तम दर्जाच्या, सुरक्षित आणि प्रभावी लसींची निर्मिती, पुरवठा आणि वितरण यावर आम्ही लक्ष केंद्रीत केलं आहे,' असं दोन्ही कंपन्यांनी संयुक्त निवेदनात पुढे म्हटलं आहे. 'दोन्ही कंपन्या लसींच्या उत्पादनावर आणि वितरणावर काम करत आहेत. कोरोना लसींचा सुरळीत पुरवठा करणं याला आम्ही देशाप्रती आणि जगाप्रती असलेलं कर्तव्य समजतो. आम्ही नियोजनानुसार हे काम सुरूच ठेवू. नागरिकांसाठी कोरोना लस किती महत्त्वाची आहे, याची जाणीव आम्हाला आहे. संपूर्ण जगाला कोरोना लस पुरवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,' असं सीरम आणि भारत बायोटेकनं म्हटलं आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या