शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात ‘कृषी समृद्धी’ योजना राबविणार ; जुन्या योजनेत गैरप्रकार, नवी पीकविमा योजना लागू 
2
आजचे राशीभविष्य, १६ जुलै २०२५: 'या' राशीच्या लोकांना नशिबाची साथ लाभून अचानक धनलाभ होईल
3
पहलगाममध्ये २६ जणांना ठार मारल्यानंतर दहशतवाद्यांनी हवेत गोळीबार करून आनंद साजरा केला, प्रत्यक्षदर्शीने केला मोठा खुलासा
4
संपादकीय: बहिणींसाठी भावांना चुना; सरकारला पैसा हवा, मद्यावर कर वाढवला...
5
नाही-नाही करत अखेर जयंत पाटील यांचा राजीनामा; शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष
6
वेलकम बॅक शुभांशू... चारही अंतराळवीरांचे पृथ्वीवर सुखरूप आगमन
7
बिस्किटांच्या बॉक्समधून ६० कोटींच्या कोकेनची तस्करी; भारतीय महिलेला अटक
8
खासदारांचे बाष्पस्नान, ‘हॉट स्टोन’ मालिश आणि ‘डीटॉक्स’
9
धक्कादायक! एक कोटी १२ लाख एसआयपी बंद म्हणजे बंदच...; का पैसे काढून घेतायत लोक...
10
दिलासा देणारी बातमी...! वर्षाला ५ लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्यांच्या कमाईत वाढ
11
झोपडपट्टी पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून गदारो‌ळ, मंत्री देसाई अन् ठाकरे-सरदेसाईंमध्ये खडाजंगी
12
आर्थिक गंडा घातल्यास दंडही वाढेल अन् वसुलीही होईल; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधानसभेत घोषणा
13
२०२९ चा ‘मुहूर्त’ धरून ‘तुलसी’ का परत येते आहे?
14
भाजप आमदारांची मागणी भाजपच्याच मंत्र्यांनी लावली धुडकावून; बाजार समितीवरून झाला खेळ...
15
२३ वर्षांपूर्वीच्या कांदा धोरण समितीच्या अहवालाचे काय?
16
बोगस डॉक्टर, पॅथलॅबप्रकरणी कायद्यासाठी लवकरच समिती; नगरविकास राज्यमंत्री  मिसाळ यांची घोषणा
17
कुत्र्यांना तुमच्या घरी का खाऊ घालत नाही? याचिकाकर्त्याला सर्वोच्च न्यायालयाने सुनावले
18
अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे चिखलफेक करणे नव्हे : कोर्ट
19
सावत्र बापाने घात केला, बेपत्ता चिमुरडीचा मृतदेह सापडला ससून डाॅक समुद्रात 
20
"मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गवर हल्ला करू शकता?"; झेलेन्स्की यांच्या सोबत झालेल्या सिक्रेट बैठकीत ट्रम्प यांनी तयार केला खतरनाक प्लॅन!

मॅगीविरुद्धच्या तक्रारीची सरकारकडून गंभीर दखल

By admin | Updated: May 30, 2015 09:07 IST

नेस्ले कंपनीच्या मॅगी उत्पादनाच्या दर्जाबद्दल निर्माण झालेल्या वादानंतर सरकारने या प्रकरणात अन्नसुरक्षा आणि दर्जा प्राधिकरणाला लक्ष घालण्यास सांगितले आहे.

नवी दिल्ली : नेस्ले कंपनीच्या मॅगी उत्पादनाच्या दर्जाबद्दल निर्माण झालेल्या वादानंतर सरकारने या प्रकरणात अन्नसुरक्षा आणि दर्जा प्राधिकरणाला (फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडिया) लक्ष घालण्यास सांगितले आहे. या प्रकरणात राष्ट्रीय ग्राहक वाद निवारण आयोगाकडे तक्रार करण्यात आली तर सामूहिक खटलादेखील होऊ शकतो, असे ग्राहक व्यवहारमंत्री रामविलास पासवान यांनी शुक्रवारी म्हटले.उत्तर प्रदेश अन्नसुरक्षा आणि औषध प्रशासन विभागाने नेस्ले इंडियाला फेब्रुवारी २०१४ मध्ये उत्पादन झालेली मॅगीची बॅच बाजारातून काढून घेण्यास सांगितले होते. मॅगीची चव वाढविणाऱ्या एमएसजीचे व शिशाचे प्रमाण निर्धारित पातळीपेक्षा जास्त असल्याचे या बॅचमध्ये (फेब्रुवारी २०१४) आढळल्यानंतर प्रशासनाने हा आदेश दिला होता. नेस्ले इंडियाने प्रशासनाच्या तक्रारीशी सहमत नसल्याचे सांगून आम्ही या प्रकरणी दाद मागू, असे म्हटले. मॅगीविरुद्धची तक्रार गंभीर असून आम्ही ती अन्न सुरक्षा आणि दर्जा प्राधिकरणकडे सोपविली आहे. सध्याच्या कायद्यानुसार या प्राधिकरणाला दंड ठोठावण्याचा आणि मोठी शिक्षा करण्याचा अधिकार आहे, असे पासवान यांनी म्हटले. वेगवेगळ्या ग्राहकोपयोगी उत्पादनाशी संबंधित तक्रारींची हाताळणी वेगवेगळे अधिकारी करतात. आरोग्य मंत्रालयांतर्गत असलेले हे प्राधिकरण अन्न विषयाच्या तक्रारी हाताळते, असे ते म्हणाले.(लोकमत न्यूज नेटवर्क)