शहरं
Join us  
Trending Stories
1
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
2
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
3
एका सल्ल्यासाठी ₹११ कोटी! पीकेंच्या कमाईचे आकडे पाहून चक्रावून जाल; ₹९८ कोटी दान केले...
4
'त्या नारी शक्तीचे एक उदाहरण...', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जॉर्जिया मेलोनी यांच्या आत्मचरित्राला प्रस्तावना लिहिली
5
प्रशांत किशोर यांची 3 वर्षांची कमाई बघून थक्क व्हाल, जन सूरज पक्षाला डोनेट केले तब्बल 98 कोटी!
6
अरेरे! लहान वयात केस पिकले, नारळाच्या तेलात 'हे' मिसळा; चिंता सोडा, पांढऱ्या केसांना टाटा करा
7
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
8
'हे' मेड इन इंडिया मॅसेजिंग अ‍ॅप घेणार WhatsApp ची जागा? दुर्गम भागातील लोकांना होणार फायदा?
9
एशिया कप 2025 चा हिरो: विजयाचा तिलक लावला खरा, पण कुटुंबाचे २०२२ पर्यंत स्वत:चे घर नव्हते...; वडील इलेक्ट्रीशिअन...
10
ऑटो कंपन्यांचे पाकिस्तानातून पलायन! सरकारकडून सेकंड हॅन्ड गाड्यांना आयात करण्यासाठी परवानगी
11
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
12
वनप्लस १३ नंतर १४ नाही, थेट १५ सिरीज बाजारात आणणार; भारतात कधी लाँच होणार... 
13
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंच्या नावाची रस्त्यावर रांगोळी; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
14
सणासुदीच्या काळात सावध राहा! सायबर गुन्हेगार AI वापरुन करतायेत फसवणूक; कसं राहाल सुरक्षित?
15
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
16
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
17
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
18
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
19
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
20
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप

मॅगीविरुद्धच्या तक्रारीची सरकारकडून गंभीर दखल

By admin | Updated: May 30, 2015 09:07 IST

नेस्ले कंपनीच्या मॅगी उत्पादनाच्या दर्जाबद्दल निर्माण झालेल्या वादानंतर सरकारने या प्रकरणात अन्नसुरक्षा आणि दर्जा प्राधिकरणाला लक्ष घालण्यास सांगितले आहे.

नवी दिल्ली : नेस्ले कंपनीच्या मॅगी उत्पादनाच्या दर्जाबद्दल निर्माण झालेल्या वादानंतर सरकारने या प्रकरणात अन्नसुरक्षा आणि दर्जा प्राधिकरणाला (फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडिया) लक्ष घालण्यास सांगितले आहे. या प्रकरणात राष्ट्रीय ग्राहक वाद निवारण आयोगाकडे तक्रार करण्यात आली तर सामूहिक खटलादेखील होऊ शकतो, असे ग्राहक व्यवहारमंत्री रामविलास पासवान यांनी शुक्रवारी म्हटले.उत्तर प्रदेश अन्नसुरक्षा आणि औषध प्रशासन विभागाने नेस्ले इंडियाला फेब्रुवारी २०१४ मध्ये उत्पादन झालेली मॅगीची बॅच बाजारातून काढून घेण्यास सांगितले होते. मॅगीची चव वाढविणाऱ्या एमएसजीचे व शिशाचे प्रमाण निर्धारित पातळीपेक्षा जास्त असल्याचे या बॅचमध्ये (फेब्रुवारी २०१४) आढळल्यानंतर प्रशासनाने हा आदेश दिला होता. नेस्ले इंडियाने प्रशासनाच्या तक्रारीशी सहमत नसल्याचे सांगून आम्ही या प्रकरणी दाद मागू, असे म्हटले. मॅगीविरुद्धची तक्रार गंभीर असून आम्ही ती अन्न सुरक्षा आणि दर्जा प्राधिकरणकडे सोपविली आहे. सध्याच्या कायद्यानुसार या प्राधिकरणाला दंड ठोठावण्याचा आणि मोठी शिक्षा करण्याचा अधिकार आहे, असे पासवान यांनी म्हटले. वेगवेगळ्या ग्राहकोपयोगी उत्पादनाशी संबंधित तक्रारींची हाताळणी वेगवेगळे अधिकारी करतात. आरोग्य मंत्रालयांतर्गत असलेले हे प्राधिकरण अन्न विषयाच्या तक्रारी हाताळते, असे ते म्हणाले.(लोकमत न्यूज नेटवर्क)