शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
3
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
4
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
5
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
6
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
7
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
8
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा
9
शनैश्वर बनावट ॲप तयार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आंदोलने मजेसाठी नसतात, लोकांचे हक्क महत्वाचे; मद्रास हायकोर्ट : पक्षाची मनमानी चालू शकत नाही
11
‘सुंदर’ फिरकीने भारताचा ‘रूट’ मोकळा; भारताला विजयासाठी १९३ धावांचे लक्ष्य
12
भारताचा पराभव, पण मालिका ३-२ ने जिंकली; शेफाली वर्माची अर्धशतकी खेळी व्यर्थ
13
बाजाराची चाल कंपन्यांचे निकाल ठरवणार; विक्रीचा मारा सुरूच
14
तुमच्यामुळे झाला महाराष्ट्र टॉपर! नागरिकांची यूपीआयला पसंती
15
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
16
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
17
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
18
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
19
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
20
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  

जमिनीच्या वादातून ज्येष्ठ नेत्याची हत्या

By admin | Updated: November 23, 2015 02:03 IST

जमिनीच्या वादातून महाराष्ट्र एकीकरण समितीचे ज्येष्ठ नेते गणपतराव लक्ष्मण पाटील (८०) यांची वीस ते पंचवीस तरुणांनी तलवार आणि तीक्ष्ण हत्यारांनी वार करून हत्या केली

बेळगाव : जमिनीच्या वादातून महाराष्ट्र एकीकरण समितीचे ज्येष्ठ नेते गणपतराव लक्ष्मण पाटील (८०) यांची वीस ते पंचवीस तरुणांनी तलवार आणि तीक्ष्ण हत्यारांनी वार करून हत्या केली. या हल्ल्यात त्यांचा मुलगा संजयही जखमी झाला आहे. खानापूर तालुक्यातील जळगा गावातील शेतवडीत रविवारी दुपारी चार वाजता ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी गुरव गटाच्या आठ जणांना ताब्यात घेतले आहे. भूविकास बँकेचे अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते मुरलीधर पाटील यांचे ते वडील होते. घटनास्थळी तेरा दुचाकी वाहने सापडली आहेत. त्याआधारे हल्लेखोर हे बेळगाव आणि अनगोळ परिसरातील असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला.गणपतराव पाटील आणि गुरव कुटुंबीयांत गेल्या तीस वर्षांपासून जमिनीचा वाद न्यायालयात सुरू आहे. जमिनीचा ताबा पाटील यांच्याकडे होता. त्यांच्या ताब्यात असलेल्या शेतातील भात कोणीतरी येऊन कापत आहे, असे समजल्यावर गणपतराव आणि त्यांची दोन मुले मुरलीधर आणि संजय शेतात गेले. या वेळी गुरव आणि पाटील यांच्यात जोरदार वाद झाला. गुरव यांच्यासमवेत वीस पंचवीस तरुणही होते. मुरलीधर तातडीने पोलिसांना बोलाविले. पोलिसांनी त्वरेने घटनास्थळी येऊन दोन्ही गटांची समजूत काढली आणि दोन्ही बाजूंना कागदपत्रे घेऊन पोलीस स्थानकात येण्यास सांगितले होते. पोलीस निघून गेल्यावर कागदपत्रे आणण्यासाठी मुरलीधर पाटील खानापूरला गेल्यावर गुरव गटाने पुन्हा वाद काढला. त्या वेळी गणपतराव यांनी आपल्या बंदुकीतून दोन गोळ्या हवेत उडवल्या. त्यामुळे गुरव आणि समर्थकांनी तलवारी आणि इतर हत्यारे घेऊन गणपतराव व संजय यांचा पाठलाग केला आणि गणपतराव यांच्या डोक्यात तलवारीने वार केला. त्यात गणपतरावांचा जागीच मृत्यू झाला. संजय यांच्यावरही हल्ला झाला, पण त्याने जखमी अवस्थेत पळून जाऊन आपला जीव वाचविला. या प्रकरणाची नोंद नंदगड पोलीस स्थानकात झाली आहे. (प्रतिनिधी)