शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
3
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
4
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
5
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
6
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
7
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
8
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
9
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
11
सर्वपित्री अमावास्या २०२५: पूर्वज स्मरणासह ‘ही’ कामे अवश्य कराच; पुण्य-वरदान-कृपा लाभेल!
12
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
13
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
14
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
15
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
16
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
17
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
18
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले
19
Navratri 2025: नवरात्रीला घटस्थापना कशी करावी? जाणून घ्या साहित्य, मुहूर्त आणि शास्त्रोक्त विधी!
20
निलेश साबळेनेच मला बाईचं कॅरेक्टर करायला सांगितलं होतं, भाऊ कदमचा खुलासा

बातमीसाठी पाकीट पाठवितो

By admin | Updated: February 1, 2016 00:03 IST

जळगाव : सामाजिक, राजकीय काम करीत असताना आमचीही बातमी व छायाचित्र वृत्तपत्रात छापुन येतात, तेही मोठ मोठे छापुन येतात, मात्र बर्‍याच वेळा कार्याची दखल घेतली जात नसल्याने बातमी येण्यासाठी पाकीटे पाठवितो, असे धक्कादायक विधान महसुलमंत्री एकनाथराव खडसे यांनी मासिक लेवाशक्ती प्रकाशन सोहळ्यात केले.

जळगाव : सामाजिक, राजकीय काम करीत असताना आमचीही बातमी व छायाचित्र वृत्तपत्रात छापुन येतात, तेही मोठ मोठे छापुन येतात, मात्र बर्‍याच वेळा कार्याची दखल घेतली जात नसल्याने बातमी येण्यासाठी पाकीटे पाठवितो, असे धक्कादायक विधान महसुलमंत्री एकनाथराव खडसे यांनी मासिक लेवाशक्ती प्रकाशन सोहळ्यात केले.
औद्योगिक वसाहत परिसरातील एका हॉटेलमध्ये झालेल्या या सोहळ्यात ते बोलत होेते. ते पुढे म्हणाले की समाजातील यशस्वी बांधवांचा कार्याचा गौरव व्हायला हवा, आमचाही क ार्याचा विविध वृत्तपत्रांच्या माध्यमातून होत असतो, छायाचित्र छापून येत असतात, मात्र काही वेळा छापले जात नाहीत, त्यासाठी पाकीटे पाठवितो, बातमीचे.....असे विधान केले. तसेच लेवा पाटील समाजाने प्रत्येक क्षेत्रात भरारी घेतली आहे. मात्र समाजाचा सन्मान होताना दिसत नाही. कारण समाज विखुरला गेला असून त्यात दुरावा देखील निर्माण झाला आहे. यशस्वी झालेल्या आपल्या या समाज बांधवांचा गौरव आपणच करायला हवा, यासाठी समाजातील दुरावा दुर करण्यासाठी एकत्र या, असे आवाहनही त्यांनी कार्यक्रमाद्वारे केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष लेवा पाटील समाजाचे कुटुंब प्रमुख रमेश विठोबा पाटील होते. तर व्यासपीठावर खासदार रक्षा खडसे, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, पद्मश्री शितल महाजन, आमदार सुरेश भोळे, आमदार हरिभाऊ जावळे, आमदार गुरूमुख जगवानी, माजी आमदार शिरीष चौधरी, डॉ. अर्जुन भंगाळे, माजी महापौर विष्णु भंगाळे, उद्योजक गौरव अत्तरदे, नरेंद्र भर्‍हाटे, मिलिंद चौधरी, उपमहापौर सुनिल महाजन, कुंदन ढाके, शेेखर पाटील आदी उपस्थित होते.

इन्फो -
जळगावात आय.टी.पार्क उभारण्याचा मानस
खासदार असल्याने खेड्या पाड्यात फिरावे लागते, मात्र फिरताना घरातील कर्ते तरुण कामानिमित्त मुंबई, पुणे येथे गेले असल्याने घरात फक्त वृद्ध आई वडीलच दिसले. जेव्हा उतारवयात त्यांना मुलांची गरज आहे, तेव्हाच मुले सोडून गेल्याचे हे चित्र कुठेतरी बदलायला हवे, त्यासाठी सरकारच्या मदतीने जळगावात आय.टी.पार्क उभारण्याचा मानस आहे. जेणेकरून तरुणांना नोकरी स्थानिक ठिकाणीच मिळेल आणि आई वडीलांना उतारवयात सहारादेखील मिळेल. यासाठी मात्र जिल्‘ातील सर्व नेत्यांनी एकत्र यायला हवे.
-रक्षा खडसे, खासदार