शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
2
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
3
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
6
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
7
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
8
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
9
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
10
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
11
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
12
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
13
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
14
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
15
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
16
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
17
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
18
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
19
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
20
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
Daily Top 2Weekly Top 5

वृत्तपत्रांच्या अनधिकृत पीडीएफ प्रती पाठवणे कॉपीराईट व आयटी अ‍ॅक्टचा भंग- दिल्ली उच्च न्यायालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 02:42 IST

ई-पेपरची प्रत बनवून वितरित केल्याने न भरून येणारे नुकसान होते

- खुशालचंद बाहेती मुंबई : समाजमाध्यमांवर विशेषत: व्हॉटस्अ‍ॅपवर फिरणाऱ्या वृत्तपत्राच्या अनधिकृत पीडीएफ प्रती या अनैतिक तर आहेतच; पण स्वामीत्व अधिकार कायदा आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याचा भंग करणाºयाही आहेत.वृत्तपत्रांच्या व्यवस्थापनाचे वृत्तपत्रांवर, ई-वृत्तपत्रावर इतकेच नव्हे, तर त्यातील मजकुरावर स्वामीत्व अधिकार असतो. त्यामुळे त्याच्या अनधिकृतपणे प्रती बनविणे व त्या प्रसारित करणे हा स्वामीत्व अधिकार कायद्याचा भंग ठरतो.ई-पेपरवरून या प्रती पीडीएफ फॉरमॅटमध्ये बनवल्या जातात आणि त्या वृत्तपत्रातर्फे अधिकृतपणे प्रसारित होत आहेत, असे दर्शविण्यात येते. या प्रतीमध्ये अनेक वेळा मूळ प्रतीतील मजकुराशी छेडछाड केलेली असते. वृत्तपत्राच्या मूळ व्यवस्थापनाला याबद्दल कल्पनाही नसते.वृत्तपत्रातील मजकूर बनवताना मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ, संसाधने, तंत्रज्ञान, आर्टवर्कचा उपयोग करण्यात येतो. वृत्तपत्र तयार करून वाचकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली जात असते.वृत्तपत्रातील प्रचंड मेहनतीने बनवलेला मजकूर अनेकांना प्रसारित केल्याने किंवा संकेतस्थळावर टाकल्याने तो वैयक्तिक उपयोगापुरता मर्यादित न राहता सार्वजनिक ठरतो. स्वामीत्व कायद्याप्रमाणे वृत्तपत्राच्या व्यवस्थापनासच यातील मजकूर पुन्हा प्रकाशित करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे अशा प्र्रकारे पुन्हा प्रकाशित करणारा प्रत्येक जण स्वामीत्व कायद्याचा भंग करीत असतो. वृत्तपत्र व्यवस्थापनाच्या परवानगीशिवाय डिजिटल आवृत्तीचे प्रसारण हा माहिती तंत्रज्ञान कायद्याचाही भंग ठरतो.माहिती तंत्रज्ञान कायद्याचे कलम ४३ प्रमाणे संगणकीय माहितीत फेरबदल करणे, नष्ट करणे याबरोबरच त्याचे मूल्य कमी होईल, असा प्रयत्न करणे, यास प्रतिबंध करण्यात आला आहे. असा प्रयत्न करणाºया व्यक्तीकडून नुकसानभरपाई घेण्याची तरतूद या कायद्यात आहे. वृत्तपत्रांचे अनधिकृत प्रसारण करणारे जनहितार्थ करीत असल्याचा दावा करतात; पण माहिती तंत्रज्ञान कायद्यात ही सबब अपवाद ठरत नाही.एका वृत्तसमूहाने त्यांच्या वृत्तपत्रातील मजकुराचे अनधिकृत प्रसारण ‘टेलिग्राम’ या मेसेजिंग अ‍ॅप वरून होत असल्याची व तो बंद व्हावा यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. दिल्ली उच्च न्यायालयाने ई-पेपरची प्रत बनवून ती वितरित केल्याने वृत्तपत्रांचे न भरून येणारे नुकसान होते, असे म्हणत हे थांबवण्याचा आदेश दिला आहे.यापूर्वी इंडियन न्यूज पेपर सोसायटी या वृत्तपत्रांच्या सर्वोच्च संघटनेने अशा वितरणावर आक्षेप घेत टीका केली होती. या मूळ वृत्तपत्रांची आर्थिक हानी तर होतेच; पण वृत्तपत्रांच्या नावावर फेक न्यूजचा मोठ्या प्रमाणात प्रसार होण्याची शक्यता निर्माण होते, असे मत आय.एन.एस.ने व्यक्त केले होते.