शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
3
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
4
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
5
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
6
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
7
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
8
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
9
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
10
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
11
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
12
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
13
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
14
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
15
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
16
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
17
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
18
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
19
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
20
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?

सुरक्षा, ग्राहक सेवेला प्राधान्य देणार

By admin | Updated: November 11, 2014 02:33 IST

रेल्वे सुरक्षा आणि ग्राहक सेवा हा आपला प्राधान्यक्रम असेल, अशी ग्वाही सुरेश प्रभू यांनी सोमवारी रेल्वे मंत्रिपदाचा कार्यभार सांभाळल्यानंतर दिली.

सुरेश प्रभू : रेल्वे मंत्रलयाचा पदभार स्वीकारला
नवी दिल्ली : रेल्वे सुरक्षा आणि ग्राहक सेवा हा आपला प्राधान्यक्रम असेल, अशी ग्वाही सुरेश प्रभू यांनी सोमवारी रेल्वे मंत्रिपदाचा कार्यभार सांभाळल्यानंतर दिली. रेल्वेच्या क्षमतेचा ख:या अर्थाने उपयोग करण्यात येईल, असे प्रभू म्हणाले.
पत्रकारांशी बोलताना प्रभू म्हणाले, भूतकाळात आम्ही रेल्वेच्या संचालनात अनेक आव्हानांचा सामना केलेला आहे. आमच्याजवळ क्षमता आहे; परंतु त्याचा योग्यरीत्या उपयोग झाला नाही. पंतप्रधानांनी रेल्वेची परिस्थिती बदलण्याचा निर्णय घेतला आहे. दोन बाबींकडे आम्ही अधिक लक्ष देणार आहोत. एक ग्राहक सेवा आणि दुसरी रेल्वे सुरक्षा. कारण प्रवाशांची सुरक्षा हा चिंतेचा विषय बनत चालला आहे.
जनतेने सरकारवर मोठा विश्वास टाकलेला आहे, असे नमूद करून प्रभू म्हणाले, रेल्वेमंत्री म्हणून मी कोणती पावले उचलणार हे येत्या काही दिवसांत दिसेल. रेल्वे हा अर्थव्यवस्थेचा अविभाज्य घटक आहे आणि रेल्वेचा विकास झाला तर आर्थिक विकास होईल.
राज्यवर्धन सिंग राठोड
राज्यवर्धन सिंग राठोड यांनीही सोमवारी माहिती व प्रसारण राज्यमंत्रिपदाची सूत्रे सांभाळली. याप्रसंगी पत्रकारांशी बोलताना राठोड म्हणाले, सत्तेवर आल्यानंतर सरकारने सर्वप्रथम देशाची अर्थव्यवस्था, प्रतिष्ठा व सुरक्षा परत रुळावर आणण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचललेली आहेत. अरुणजी आणि मी तुमच्यासाठी उपलब्ध होण्याचा आणि दुतर्फा संवाद साधण्याचा प्रय} करू. (वृत्तसंस्था)
 
4माहिती व प्रसारण हे अत्यंत महत्त्वपूर्ण मंत्रलय असून सरकार व मंत्र्यांच्या माहितीचे आदानप्रदान याचद्वारे होत असते, असे अरुण जेटली म्हणाले. 
4जेटली यांनी प्रकाश जावडेकर यांच्याकडून या मंत्रलयाचा कार्यभार हाती घेतला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. 
4मी यापूर्वीही या खात्याचा मंत्री होतो. त्यावेळी इलेक्ट्रॉनिकपेक्षा प्रिंट मीडियाचा प्रभाव होता. आज डिजिटल माध्यमांचा विस्तार झाला आहे.
 
देशाची सुरक्षा बळकट करण्यासाठी प्रयत्नशील
4शेजारी देशांसोबतचे संबंध हा अतिशय संवेदनशील मुद्दा आहे. देशाची सुरक्षा बळकट बनविण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जातील आणि शत्रूविरुद्ध आम्ही संरक्षणविहिन असणार नाही, असे प्रतिपादन संरक्षणमंत्री मनोहर र्पीकर यांनी केले आहे.
 
4देशाच्या सुरक्षेबाबत विचारले असता र्पीकर म्हणाले, ‘मी आज माध्यमांपुढे सुरक्षाविहिन आहे; परंतु शत्रूविरुद्ध आम्ही कधीही सुरक्षाविहिन असणार नाही. मी संरक्षणमंत्री बनल्याचे मला रविवारी रात्री 11.35 वाजता कळले. मला थोडा वेळ द्या. या मंत्रलयात रुळायला मला वेळ लागेल. 
 
 सशस्त्र दलांच्या बळकटीसाठी कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्याकडे आपण अधिक लक्ष देणार असल्याचे म्हणाले.