शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
3
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
4
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
5
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
6
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
7
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
8
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
9
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
10
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
11
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
12
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
13
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
14
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
15
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
16
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
17
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
18
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
19
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
20
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  

विश्वासार्हता टिकवण्यासाठी सुरक्षा परिषदेत सुधारणा आवश्यक - नरेंद्र मोदी

By admin | Updated: September 26, 2015 14:09 IST

संयुक्त राष्ट्रांची विश्वासार्हता व औचित्य टिकवण्यासाठी सुरक्षा परिषदेत सुधारणा करण्याची आवश्यकता असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्ट केले.

ऑनलाइन लोकमत
न्यूयॉर्क, दि. २६ - संयुक्त राष्ट्रांची विश्वासार्हता व औचित्य टिकवण्यासाठी सुरक्षा परिषदेत व्यापक प्रतिनिधित्व व सुधारणा करण्याची आवश्यकता असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्ट केले. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेतील भारताच्या कायम सदस्यत्वासाठी राष्ट्रसंघाच्या शाश्‍वत विकास परिषदेमध्ये ते बोलत होते. 'सध्याच्या जगातील वास्तविकतेचा विचार केल्यास संयुक्त राष्ट्रसंघांच्या रचनेते बदल केले पाहिजेत तसेच प्रत्येकाला सुरक्षित वाटेल अशा जगाची निर्मिती आपण केली पाहिजे,' असे ते म्हणाले. तसेच 'मानवतेचा विकास हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवले पाहिजे. जगात शांतता कायम राहण्यासाठी गरिबी हटवणे आवश्यक आहे, त्याशिवाय कोणत्याही देशाचा पूर्णपणे विकास होणे अशक्य असल्याचेही त्यांनी सांगितले.
शेवटच्या स्तरातील व्यक्तींपर्यंत लाभ पोहोचवणे हेच भारत व संयुक्त राष्ट्रसंघ दोघांचेही उद्दिष्ट आहे. गरिबी निर्मूलनाचे, गरिबांना सशक्त बनवण्याचे आमचे (भारत) ध्येय असून त्यासाठीच कौशल्यविकासाची कास धरण्यात आली आहे. तसेच भारतात पायाभूत सुविधा वाढवण्यावर भर देण्यात येत आहे, असे त्यांनी आपल्या भाषणात नमूद केले. पर्यावरण सुरक्षेसाठी सर्वांनीच संकल्प करून वैश्‍विक जनभागीदारी निर्माण करण्याची वेळ आली असल्याचे सांगत हवामान बदलासंदर्भातील उद्दिष्टांची पूर्ती सर्व विकसित देशांनी केली पाहिजे, असे मोदी म्हणाले. तसेच पर्यावरण रक्षणासाठी पुढील पिढीला जागरूक करण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.