शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
3
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
4
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
5
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
6
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
7
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
8
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
9
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
10
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
11
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
12
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
13
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
14
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
15
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
16
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
17
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
18
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
19
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
20
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!

विश्वासार्हता टिकवण्यासाठी सुरक्षा परिषदेत सुधारणा आवश्यक - नरेंद्र मोदी

By admin | Updated: September 26, 2015 14:09 IST

संयुक्त राष्ट्रांची विश्वासार्हता व औचित्य टिकवण्यासाठी सुरक्षा परिषदेत सुधारणा करण्याची आवश्यकता असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्ट केले.

ऑनलाइन लोकमत
न्यूयॉर्क, दि. २६ - संयुक्त राष्ट्रांची विश्वासार्हता व औचित्य टिकवण्यासाठी सुरक्षा परिषदेत व्यापक प्रतिनिधित्व व सुधारणा करण्याची आवश्यकता असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्ट केले. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेतील भारताच्या कायम सदस्यत्वासाठी राष्ट्रसंघाच्या शाश्‍वत विकास परिषदेमध्ये ते बोलत होते. 'सध्याच्या जगातील वास्तविकतेचा विचार केल्यास संयुक्त राष्ट्रसंघांच्या रचनेते बदल केले पाहिजेत तसेच प्रत्येकाला सुरक्षित वाटेल अशा जगाची निर्मिती आपण केली पाहिजे,' असे ते म्हणाले. तसेच 'मानवतेचा विकास हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवले पाहिजे. जगात शांतता कायम राहण्यासाठी गरिबी हटवणे आवश्यक आहे, त्याशिवाय कोणत्याही देशाचा पूर्णपणे विकास होणे अशक्य असल्याचेही त्यांनी सांगितले.
शेवटच्या स्तरातील व्यक्तींपर्यंत लाभ पोहोचवणे हेच भारत व संयुक्त राष्ट्रसंघ दोघांचेही उद्दिष्ट आहे. गरिबी निर्मूलनाचे, गरिबांना सशक्त बनवण्याचे आमचे (भारत) ध्येय असून त्यासाठीच कौशल्यविकासाची कास धरण्यात आली आहे. तसेच भारतात पायाभूत सुविधा वाढवण्यावर भर देण्यात येत आहे, असे त्यांनी आपल्या भाषणात नमूद केले. पर्यावरण सुरक्षेसाठी सर्वांनीच संकल्प करून वैश्‍विक जनभागीदारी निर्माण करण्याची वेळ आली असल्याचे सांगत हवामान बदलासंदर्भातील उद्दिष्टांची पूर्ती सर्व विकसित देशांनी केली पाहिजे, असे मोदी म्हणाले. तसेच पर्यावरण रक्षणासाठी पुढील पिढीला जागरूक करण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.