शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
2
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
3
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
4
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
5
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
6
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
7
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
8
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
9
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
10
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
11
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
12
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
13
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
14
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
15
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी
16
तिन्ही मार्गावर मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’; पश्चिम, मध्य, हार्बरवरील वेळापत्रक कसे असेल?
17
मुंबई सेंट्रल स्थानकावर पहिले डिजिटल लाउंज; केवळ प्रवासी नाही तर नागरिकांनाही लाभ मिळणार
18
दारूच्या नशेत बेभान कंटेनर चालकाने वाहनांसह २० नागरिकांना उडविले; बीडमधील थरार, महिला ठार
19
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
20
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात

विश्वासार्हता टिकवण्यासाठी सुरक्षा परिषदेत सुधारणा आवश्यक - नरेंद्र मोदी

By admin | Updated: September 26, 2015 14:09 IST

संयुक्त राष्ट्रांची विश्वासार्हता व औचित्य टिकवण्यासाठी सुरक्षा परिषदेत सुधारणा करण्याची आवश्यकता असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्ट केले.

ऑनलाइन लोकमत
न्यूयॉर्क, दि. २६ - संयुक्त राष्ट्रांची विश्वासार्हता व औचित्य टिकवण्यासाठी सुरक्षा परिषदेत व्यापक प्रतिनिधित्व व सुधारणा करण्याची आवश्यकता असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्ट केले. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेतील भारताच्या कायम सदस्यत्वासाठी राष्ट्रसंघाच्या शाश्‍वत विकास परिषदेमध्ये ते बोलत होते. 'सध्याच्या जगातील वास्तविकतेचा विचार केल्यास संयुक्त राष्ट्रसंघांच्या रचनेते बदल केले पाहिजेत तसेच प्रत्येकाला सुरक्षित वाटेल अशा जगाची निर्मिती आपण केली पाहिजे,' असे ते म्हणाले. तसेच 'मानवतेचा विकास हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवले पाहिजे. जगात शांतता कायम राहण्यासाठी गरिबी हटवणे आवश्यक आहे, त्याशिवाय कोणत्याही देशाचा पूर्णपणे विकास होणे अशक्य असल्याचेही त्यांनी सांगितले.
शेवटच्या स्तरातील व्यक्तींपर्यंत लाभ पोहोचवणे हेच भारत व संयुक्त राष्ट्रसंघ दोघांचेही उद्दिष्ट आहे. गरिबी निर्मूलनाचे, गरिबांना सशक्त बनवण्याचे आमचे (भारत) ध्येय असून त्यासाठीच कौशल्यविकासाची कास धरण्यात आली आहे. तसेच भारतात पायाभूत सुविधा वाढवण्यावर भर देण्यात येत आहे, असे त्यांनी आपल्या भाषणात नमूद केले. पर्यावरण सुरक्षेसाठी सर्वांनीच संकल्प करून वैश्‍विक जनभागीदारी निर्माण करण्याची वेळ आली असल्याचे सांगत हवामान बदलासंदर्भातील उद्दिष्टांची पूर्ती सर्व विकसित देशांनी केली पाहिजे, असे मोदी म्हणाले. तसेच पर्यावरण रक्षणासाठी पुढील पिढीला जागरूक करण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.