शहरं
Join us  
Trending Stories
1
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
2
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
3
ICICI बँकेचा यु-टर्न; अकाऊंटमध्ये ५० हजार रुपये नाही तर 'इतकी' रक्कम ठेवावी लागणार
4
७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही...
5
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
6
Viral Video : काय म्हणावं यांना! लाबुबू डॉलची पूजा करू लागली महिला, म्हणाली "ही बाहुली नाही, तर..."
7
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,६०० च्या वर, IT-फार्मा शेअर्समध्ये मोठी खरेदी
8
राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?
9
'फुले' सिनेमाच्या अपयशावर प्रतीक गांधीने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "जितकी अपेक्षा..."
10
पाकिस्तानचं स्वातंत्र्यदिनी हे कसलं सेलिब्रेशन... हवेत गोळीबार, तिघांचा मृत्यू, ६० जखमी
11
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
12
शिल्पा शिरोडकरच्या कारला बसची धडक, अभिनेत्रीने केली तक्रार; तर बस मालकांनी केली अरेरावी
13
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
14
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
15
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
16
फडणवीस, शिंदे, ठाकरे आज एका व्यासपीठावर..?; बीडीडीवासीयांचे पाऊल आज नव्या घरात
17
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
18
मुनीर यांचा बाष्कळ थयथयाट, भारताविषयी वक्तव्ये करण्याआधी 'आका'ची परवानगी घेतली का?
19
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
20
महाभियोग टाळण्यास राजीनामा हा एकच पर्याय; अन्यथा न्या. वर्मांचे पेन्शन, इतर लाभही जाणार

हस्तक्षेप केल्यास सुरक्षेवर परिणाम

By admin | Updated: February 24, 2016 23:45 IST

आयबी, रॉ व एनटीआरओ या गुप्तचर यंत्रणांना न्यायालयीन निगराणीखाली आणल्यास देशाच्या सुरक्षेवर परिणाम होऊ शकतो, असे स्पष्ट करीत सर्वोच्च न्यायालयाने संबंधित याचिका मंगळवारी फेटाळली.

नवी दिल्ली : आयबी, रॉ व एनटीआरओ या गुप्तचर यंत्रणांना न्यायालयीन निगराणीखाली आणल्यास देशाच्या सुरक्षेवर परिणाम होऊ शकतो, असे स्पष्ट करीत सर्वोच्च न्यायालयाने संबंधित याचिका मंगळवारी फेटाळली.उपरोक्त संस्थांना कामकाज आणि खर्चाबाबत संसदेप्रती उत्तरदायी ठरविले जावे, अशी विनंती ‘सेंटर फॉर पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन’ या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने प्रशांत भूषण यांनी केली होती. आम्ही ही याचिका दाखल करवून घेणार नाही. गुप्तचर संस्थांच्या क्षेत्रात हस्तक्षेप करणे म्हणजे देशाच्या सुरक्षेला बाधक ठरेल, असे दीपक मिश्रा आणि शिव कीर्ती सिंग यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले. ब्रिटन, अमेरिकेसारख्या देशात अशा संस्था संसदीय समितीला उत्तरदायी ठरतात. त्यांच्यावरील खर्चही करदात्यांच्या पैशातून केला जातो, असे भूषण यांनी म्हटले होते. त्यावर असे भारतात शक्य नाही. आपल्या सरकारकडे कोणतीही यंत्रणा नाही असे म्हणता येणार नाही. काही बाबतीत सावधगिरी बाळगायला हवी, असे खंडपीठाने स्पष्ट केले. यापूर्वी केंद्राला नोटीस...गुप्तचर यंत्रणांना संसद आणि कॅगच्या निगराणीखाली आणण्याची विनंती करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने २०१३ मध्ये केंद्र सरकारला नोटीस जारी करीत उत्तर मागितले होते, त्यामुळे ही याचिका फेटाळता येणार नाही, असे भूषण यांनी म्हटले. त्यावर खंडपीठाने यासंबंधी सल्ला किंवा सूचना अ‍ॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांच्याकडे मांडण्यास सुचविले.