शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
3
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
4
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
5
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
6
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
7
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
8
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
9
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
10
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
11
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
12
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
13
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
14
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
15
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
16
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
17
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
18
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
19
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
20
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण

संसद अधिवेशनाचे दुसरे सत्र आजपासून

By admin | Updated: April 25, 2016 03:42 IST

उत्तराखंडमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यावरून विरोधी पक्ष सरकारला घेरण्याच्या तयारीत असल्याने, हे अधिवेशन वादळी ठरण्याची चिन्हे आहेत.

नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे दुसरे सत्र आज सोमवारपासून सुरू होत आहे. उत्तराखंडमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यावरून विरोधी पक्ष सरकारला घेरण्याच्या तयारीत असल्याने, हे अधिवेशन वादळी ठरण्याची चिन्हे आहेत. तथापि, सरकारनेही विरोधकांचा आक्रमक पद्धतीनेच मुकाबला करण्याचा निर्णय घेतला आहे.सरकारने या दुसऱ्या सत्रासाठी मोठा अजेंडा तयार केला आहे, ज्यात लोकसभेत १३ आणि राज्यसभेत ११ विधेयके पारित करण्याचा समावेश आहे. तथापि, अधिवेशनाच्या सुरुवातीलाच जीएसटीसारखे विधेयक पुढे रेटणे शक्य होणार नाही, याची सरकारला जाणीव आहे. डावे पक्ष, संजद आणि अन्य विरोधी पक्षांच्या पाठिंब्याने काँग्रेस उत्तराखंड आणि अरुणाचल प्रदेशमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यावरून सरकारला घेरण्याच्या तयारीत आहे. राष्ट्रपती राजवट लागू करणे म्हणजे संघराज्य चौकटीवर हल्ला असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.केंद्रात काँग्रेसचे सरकार असताना अनेक राज्यांत राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती, असे सांगत काँग्रेसला प्रत्युत्तर देण्याची तयारी भाजपाने केली आहे. सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १९५१ पासून देशात १११ वेळा राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. त्यात भाजपा वा रालोआ सत्तेत नसताना ९१ वेळा राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. उत्तराखंड मुद्यावर चर्चा व्हावी, अशी आमची मागणी आहे. आम्ही नियम ५६ अंतर्गत स्थगन प्रस्ताव आणू, असे काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी या बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले. ते म्हणाले, या बैठकीत सदस्यांनी विविध मागण्या मांडल्या. त्यात उत्तराखंडमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या मुद्यासह देशाच्या विविध भागांमध्ये पडलेला दुष्काळ आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई या मुद्यांचाही समावेश आहे, असे खरगे म्हणाले.