शहरं
Join us  
Trending Stories
1
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
2
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
3
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
4
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
5
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
6
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
7
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
8
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
9
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
10
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
11
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
12
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
13
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
14
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
15
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
16
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
17
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
18
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
19
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
20
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर

दिल्लीत सम-विषम योजनेच्या दुस-या टप्प्याला सुरुवात

By admin | Updated: April 15, 2016 09:51 IST

शाळकरी मुलांना तसंच एकट्या किंवा मुलांसोबत जाणा-या महिलांना सूट देण्यात आली आहे. 30 एप्रिलपर्यंत ही योजना लागू करण्यात येणार आहे

ऑनलाइन लोकमत - 
नवी दिल्ली, दि. १५ - दिल्ली सरकारने सुरु केलेल्या सम-विषम योजनेच्या दुस-या टप्प्याला आज शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे. प्रदुषणावर नियंत्रण आणण्यासाठी केजरीवाल सरकारचा हा प्रयत्न आहे. मात्र वाढती गर्मी आणि शाळा सुरु असल्याने दिल्लीकरांचा हिरमोड होण्याची शक्यता आहे. अरविंद केजरीवाल यांनी मात्र दिल्लीकर चांगला प्रतिसाद देतील अशी आशा व्यक्त केली आहे. यावेळी शाळकरी मुलांना तसंच एकट्या किंवा मुलांसोबत जाणा-या महिलांना सूट देण्यात आली आहे. 30 एप्रिलपर्यंत ही योजना लागू करण्यात येणार आहे.
 
नियमांच उल्लंघन करणा-यांकडून दंड वसूल करण्यासाठी सरकारने 120 पथक पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. जानेवारी महिन्यात पहिल्या टप्प्यावेळी 110 पथक पाठवण्यात आली होती. स्वयंसेवकांच्या संख्येतही वाढ करण्यात आली असून 5300 स्वयंसेवक रस्त्यावर असणार आहेत. लोकांमध्ये जागरुकता पसरवण्याचं तसंच नियमांच पालन करण्याचं आवाहन स्वयंसेवक करणार आहेत. 
 
120 पथकांमध्ये माजी सैनिकांचादेखील समावेश असणार आहे. वाहतूक विभागातर्फे विशेष माजी सैनिकांची वाहतूक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. वाहतूक विभागातील अंमलबजावणी पथकाचे 180 कर्मचारी देखील यात सहभागी असून नियमांचं उल्लंघन करणा-यांकडून 2 हजारांचा दंड वसूल करण्याच काम करणार आहेत. 
पहिल्या टप्प्यातील योजनेशी तुलना करता यावेळी दिल्लीतील हवामान वेगळे आहे ज्याचा परिणाम योजनेवर होऊ शकतो. तापमान जास्त असल्यामुळे सार्वजनिक वाहतुकीचा वापर न करता कारने प्रवास करण्यावर लोकांचा भर असेल. 'यावेळी सम-विषम योजनेत अनेक अडचणी आहेत याची आम्हाला कल्पना आहे मात्र लोकांवर आमचा विश्वास आहे', असं वाहतूक मंत्री गोपाल राय बोलले आहेत. 
 
गेल्यावेळीप्रमाणे यावेळीदेखील दुचाकी वाहनांना सूट देण्यात आली आहे. मात्र यावेळी शाळकरी मुलांना घेऊन जाणा-या वाहनांनाही सूट देण्यात आली आहे, जी गेल्यावेळी देण्यात आली नव्हती. दुसरा टप्पादेखील जर पहिल्या टप्प्याप्रमाणे यशस्वी झाला तर प्रत्येक महिन्याला पंधरा दिवसांसाठी ही योजना लागू केली जाईल अशी माहिती केजरीवाल यांनी दिली आहे.