शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
3
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
4
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
5
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
6
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
7
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
8
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
9
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
10
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
11
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
12
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
13
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
14
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
15
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार
16
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
17
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
18
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
19
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
20
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?

पु्न्हा भूकंप, नेपाळ व उत्तर भारत हादरला

By admin | Updated: May 12, 2015 20:50 IST

मंगळवारी दुपारी बसलेल्या भूकंपाच्या धक्क्यांमुळे नेपाळ व उत्तर भारत हादरला असून नेपाळमध्ये २९ तर भारतात १७ जण ठार झाले.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. १२ - नेपाळमध्ये अवघ्या दोन आठवड्यांपूर्वी आलेल्या  भूकंपाच्या कटू आठवणी ताज्या असतानाच मंगळवारी दुपारी नेपाळ व उत्तर भारत पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरले असून नेपाळमध्ये २९ तर बारतात १७ जण ठार झाल्याचे वृत्त आहे. नेपाळमधील कोडारी येथे भूकंपाचा केंद्रबिंदू असून या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ७.४ एवढी होती. तेथे सुमारे ९८१ जण जखमी झाले आहेत. नेपाळमध्ये नुकत्याच झालेल्या भूकंपात सात हजाराहून अधिक जण ठार तर १५ हजारांहून अधिक जखमी झाले होते. नेपाळवासी त्या धक्‌यातून सावरत असतानाच आज त्यांना पुन्हा मोठा धक्का बसला.

मंगळवारी दुपारी १२.३५ मिनीटांनी व १२.३८ मिनीटांनी नेपाळमध्ये मोठ्या तीव्रतेचे धक्के बसले. यातील पहिला भूकंपाचा केंद्रबिंद कोडारी येथे होता तर दुसरा भूकंपाचा केंद्रबिंदूही नेपाळ - चीन सीमारेषेजवळ होता. पहिला भूकंप ७.१ तर दुसरा भूकंप ७.४ रिश्टर स्केल ऐवढा तीव्रतेचा होता. यानंतर आणखी एक भूकंपाचा धक्का बसला. लागोपाठ आलेल्या तीन भूकंपाचे धक्के  उत्तर व पूर्व भारतातील दिल्ली, पश्चिम बंगाल, पंजाब, आसाम, ओदिशा अशा अनेक राज्यांमध्येही जाणवले. गुजरातमधील अहमदाबादपर्यंत भूकंपाचे धक्के जाणवले आहे. अफगाणस्तानमध्येही भूकंपाचा धक्का बसल्याचे वृत्त आहे. या भूकंपात जीवितहानी व वित्तहानी झाल्याचे वृत्त अद्याप समोर आलेले नाही. मात्र या भूकंपामुळे पुन्हा एकदा घबराटीचे वातावरण पसरले आहे. भूकंपानंतर नेपाळचे काठमांडू विमानतळ पूर्णपणे बंद करण्यात आले असून भारतातही खबरदारी म्हणून दिल्ली, कोलकाता येथील मेट्रो सेवा बंद करण्यात आली. तर सुप्रीम कोर्टाचे कामकाजही काही वेळ थांबवण्यात आले होते. येत्या ३० मे पर्यंत नेपाळमधील सर्व शाळाही बंद राहणार आहेत.

केंद्रीय गृहमंत्रालय भूकंपाविषयीची माहिती घेत असून नागरिकांनी घाबरु नये असे आवाहन गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केले आहे.