शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

भिन्न प्रमाण वेळांचा वैज्ञानिक अभ्यास

By admin | Updated: June 23, 2017 00:24 IST

संपूर्ण भारतासाठी सध्या असलेली एकच प्रमाण वेळ बदलून विविध भागांसाठी भिन्न प्रमाण वेळा ठरविणे कितपत व्यवहार्य आहे

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : संपूर्ण भारतासाठी सध्या असलेली एकच प्रमाण वेळ बदलून विविध भागांसाठी भिन्न प्रमाण वेळा ठरविणे कितपत व्यवहार्य आहे याचा वैज्ञानिक अभ्यास केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने सुरू केला आहे.या विभागाचे सचिव आशुतोष शर्मा यांनी सांगितले की, सरकारला यावर निर्णय घेणे शक्य व्हावे यासाठी या विषयाच्या वैज्ञानिक बाबी तपासण्याचे काम आम्ही करत आहोत. ईशान्येकडील राज्यांसाठी स्वतंत्र प्रमाण वेळ ठरवावी, अशी मागणी अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खंडू यांनी अलीकडेच व त्याआधी आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांनी केली होती. हे प्रकरण तिथे न्यायालयातही गेले होते.या राज्यांमध्ये देशाच्या इतर भागांच्या तुलनेत सूर्योदय व सूर्यास्त खूप लवकर होतो. मात्र सरकारी कार्यालये व अन्य व्यवहार दिल्लीच्या प्रमाण वेळेनुसार होत असल्याने ते सुरू होईपर्यंत अर्धा दिवस संपलेला असतो. कार्यालयीन वेळ संपेपर्यंत बरीच रात्र झालेली असते. परिणामी दिवसा उजेडीचा निम्मा वेळ कामाविना जातो व रात्री वीज जाळून काम करावे लागते, असे पेमा खंडू यांनी ही मागणी करताना सांगितले होते. या संदर्भात सचिव शर्मा म्हणाले की, निरनिराळ्या प्रमाण वेळा ठरविल्याने नेमकी किती वीज बचत होऊ शकते, वाहतुकीची त्याने कितपत सोय होईल. एकूणच याचे काय फायदे-तोटे आहेत याचा वैज्ञानिक अभ्यास सुरू आहे. अंदमान-निकोबार आणि लक्षद्वीप व मिनिकॉय या द्वीपसमूहांमध्येही सूर्योदय, सूर्यास्ताच्या वेळा वेगळ्या असल्याने सामायिक प्रमाण वेळेमुळे येणाऱ्या अडचणी तेथेही आहेत.