शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
2
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
3
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
4
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
5
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
6
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
7
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
8
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
9
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
10
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
11
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
12
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
13
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
15
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
16
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
17
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
18
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
19
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
20
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली

भिन्न प्रमाण वेळांचा वैज्ञानिक अभ्यास

By admin | Updated: June 23, 2017 00:24 IST

संपूर्ण भारतासाठी सध्या असलेली एकच प्रमाण वेळ बदलून विविध भागांसाठी भिन्न प्रमाण वेळा ठरविणे कितपत व्यवहार्य आहे

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : संपूर्ण भारतासाठी सध्या असलेली एकच प्रमाण वेळ बदलून विविध भागांसाठी भिन्न प्रमाण वेळा ठरविणे कितपत व्यवहार्य आहे याचा वैज्ञानिक अभ्यास केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने सुरू केला आहे.या विभागाचे सचिव आशुतोष शर्मा यांनी सांगितले की, सरकारला यावर निर्णय घेणे शक्य व्हावे यासाठी या विषयाच्या वैज्ञानिक बाबी तपासण्याचे काम आम्ही करत आहोत. ईशान्येकडील राज्यांसाठी स्वतंत्र प्रमाण वेळ ठरवावी, अशी मागणी अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खंडू यांनी अलीकडेच व त्याआधी आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांनी केली होती. हे प्रकरण तिथे न्यायालयातही गेले होते.या राज्यांमध्ये देशाच्या इतर भागांच्या तुलनेत सूर्योदय व सूर्यास्त खूप लवकर होतो. मात्र सरकारी कार्यालये व अन्य व्यवहार दिल्लीच्या प्रमाण वेळेनुसार होत असल्याने ते सुरू होईपर्यंत अर्धा दिवस संपलेला असतो. कार्यालयीन वेळ संपेपर्यंत बरीच रात्र झालेली असते. परिणामी दिवसा उजेडीचा निम्मा वेळ कामाविना जातो व रात्री वीज जाळून काम करावे लागते, असे पेमा खंडू यांनी ही मागणी करताना सांगितले होते. या संदर्भात सचिव शर्मा म्हणाले की, निरनिराळ्या प्रमाण वेळा ठरविल्याने नेमकी किती वीज बचत होऊ शकते, वाहतुकीची त्याने कितपत सोय होईल. एकूणच याचे काय फायदे-तोटे आहेत याचा वैज्ञानिक अभ्यास सुरू आहे. अंदमान-निकोबार आणि लक्षद्वीप व मिनिकॉय या द्वीपसमूहांमध्येही सूर्योदय, सूर्यास्ताच्या वेळा वेगळ्या असल्याने सामायिक प्रमाण वेळेमुळे येणाऱ्या अडचणी तेथेही आहेत.