शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
2
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
3
संतापजनक! मोबाईल दुरुस्ती दुकानातून खाजगी व्हिडीओ लीक, आता येत आहेत वाईट मेसेज
4
"तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन?
5
EV सेक्टरच्या शेअरची कमाल! दिला 8600% परतावा, 59 पैशांचा स्टॉक 51 रुपयांवर पोहोचला; करतोय मालामाल
6
पार्थ पवारांनी पैसे दिले, जॅकलिनने लालबागच्या राजाच्या पेटीत टाकले, पाहा VIDEO
7
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
8
Pooja Kumari : कष्टाचं फळ! भाजी, कपडे विकले, कोरोनात मास्क शिवले; अडचणींवर मात करुन झाली अधिकारी
9
जिओ IPO, AI आणि नवीन उर्जा... मुकेश अंबानी उद्या मोठ्या घोषणा करणार? गुंतवणूकदारांना संधी?
10
बिहारमध्ये हाय अलर्ट, जैश-ए-मोहम्मदचे तीन पाकिस्तानी दहशतवादी नेपाळमधून घुसले
11
सोनं झळाळलं, चांदी कडाडली... दोघांचीही किंमत चांगलीच वधारली! कॅरेटप्रमाणे पटापट चेक करा सोन्याचे लेटेस्ट रेट
12
इंजेक्शन घेऊन वर्ल्ड कप खेळला; आता त्याच्या फिटनेसवर नाही भरवसा! मोहम्मद शमी म्हणाला...
13
TVS: टीव्हीएसचा बाजारात धमाका! स्टायलिश डिझाइनसह ई-स्कूटर केली लॉन्च, जाणून घ्या किंमत
14
Video: महादेव बनलेल्या तरुणाचा सगळ्यांसमोरच गेला जीव; शोभायात्रेतील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Open AI: एआयचा वापर धोकादायक? चॅटजीपीटीमुळे १६ वर्षांच्या मुलाने आत्महत्या केल्याचा आरोप
16
८ कोटींच्या पॅकेजची नोकरी अवघ्या ५ महिन्यात सोडली; IIT मुंबईतील पदवीधर युवकानं का घेतला निर्णय?
17
Koyel Bar : अभिमानास्पद! लेकीने वेटलिफ्टर बनून पूर्ण केलं वडिलांचं मोठं स्वप्न; जिंकले २ गोल्ड मेडल
18
सचिन तेंडुलकरची मॉडिफाय लॅम्बोर्गिनी उरुस एस कार पाहून मुंबईकर चकीत!
19
Video: धक्कादायक! काँग्रेसच्या कार्यक्रमातून PM नरेंद्र मोदींना आईच्या नावाने शिवीगाळ
20
विमाधारकांनो सावधान! पॉलिसी घेताना 'ही' चूक पडेल महागात! क्लेमचा एक पैसाही मिळणार नाही!

म्हणे पठाणकोट हे भारताचेच नाटक

By admin | Updated: April 6, 2016 08:14 IST

पठाणकोट हवाई तळावर हल्ला करणारे चार दहशतवादी पाकिस्तानी होते हे कबूल केल्यानंतर काही दिवस उलटत नाही तोच पाकिस्तानच्या संयुक्त तपास पथकाने (जेआयटी) कोलांट उडी मारत

नवी दिल्ली : पठाणकोट हवाई तळावर हल्ला करणारे चार दहशतवादी पाकिस्तानी होते हे कबूल केल्यानंतर काही दिवस उलटत नाही तोच पाकिस्तानच्या संयुक्त तपास पथकाने (जेआयटी) कोलांट उडी मारत पठाणकोट हल्ला म्हणजे पाकला बदनाम करण्यासाठी भारतानेच रचलेले नाटक होते, असा आरोप केला आहे. जेआयटीच्या या आरोपाबाबतचे वृत्त ‘पाकिस्तान टुडे’त प्रसिद्ध झाले आहे. पठाणकोटच्या तपासासाठी नुकतेच भारतात येऊन गेलेले हे पथक पंतप्रधान नवाज शरीफ यांना अहवाल सादर करणार आहे. या अहवालाची माहिती जेआयटीच्या एका सूत्राने पाकिस्तान टुडेला दिली. भारताला हल्ला होण्यापूर्वीच दहशतवाद्यांविषयी माहिती होती, असा भयंकर निष्कर्ष या अहवालात काढण्यात आला आहे. जेआयटीने एनआयए अधिकारी तंजील अहमद यांच्या हत्येचाही संदर्भ दिला आहे. उत्तर प्रदेशात शनिवारी झालेल्या या हत्येतून भारत हे प्रकरण दडपत असल्याचे स्पष्ट होते, असेही या अहवालात नमूद आहे. भारतीय लष्कर आणि कथित दहशतवादी यांच्यातील संघर्ष अवघ्या काही तासांत संपला. यावरून हा हल्ला पाकची प्रतिमा मलिन करण्यासाठी रचलेले नाट्य होते, असे स्पष्ट होते. हल्ल्याच्या रात्री तळावरील दिवे सुरू नव्हते. यावरून भारताला दहशतवाद्यांची आधीच माहिती होती की काय असा स्वाभाविक प्रश्न उपस्थित होतो, असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. पाकिस्तानी माध्यमे किंवा जेआयटीने भारतावर पुरावे लपविल्याचा आरोप करण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वीही असे आरोप करण्यात आलेले आहेत. भारतीय अधिकाऱ्यांनी जेआयटीला पुरावे व माहिती देण्यास टाळाटाळ केल्याचे वृत्त दुनिया न्यूज या पाकिस्तानी वृत्तवाहिनीने २८ मार्च रोजी दिले होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)४पाकिस्तानी जेआयटीच्या या अहवालाबाबत आश्चर्यचकित करणारी बाब म्हणजे याच जेआयटीने काही दिवसांपूर्वी हल्ला करणारे दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे कबूल केले होते. एवढेच नाहीतर या दहशतवाद्यांचे जैश-ए-मोहंमद या संघटनेशी संबंध जोडण्याइतपत पुरेसे पुरावे आपल्याकडे असल्याचेही म्हटले होते.हल्ल्यात सहभागी दहशतवाद्यांचे डीएनए अहवाल, दूरध्वनी नोंदी आणि पठाणकोट हवाई तळाच्या कमांडरची माहिती जेआयटीला देण्यात आली नाही, असे डेली टाईम्सच्या वृत्तात म्हटले आहे, तर हल्ल्याबाबत भारत सरकार आणि सीमा सुरक्षा दलाच्या भूमिकेतच विरोधाभास असल्याचा दावा दुनिया न्यूजच्या वृत्तात करण्यात आला आहे. दहशतवाद्यांनी दहा फूट उंचीच्या संरक्षक भिंतीवर चढून पठाणकोट हवाई तळावर प्रवेश केल्याचे भारतीय प्रशासनाने म्हटले आहे. मात्र, दहशतवाद्यांनी चढाईसाठी वापरलेले दोरखंड कुठेही आढळून आले नाहीत, असेही या अहवालात नमूद आहे.