शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

तामिळनाडूतील सत्यमंगलम अभयारण्य

By admin | Updated: January 19, 2017 05:06 IST

भारताच्या पश्चिम घाटात वसलेले तामिळनाडूतील सत्यमंगलम वन्यजीवन अभयारण्य आणि व्याघ्र प्रकल्प हे संरक्षित क्षेत्र आहे.

भारताच्या पश्चिम घाटात वसलेले तामिळनाडूतील सत्यमंगलम वन्यजीवन अभयारण्य आणि व्याघ्र प्रकल्प हे संरक्षित क्षेत्र आहे. सत्यमंगलमला २००८ मध्ये वन्यजीव अभयारण्य घोषित करण्यात येऊन २०११ मध्ये त्याची व्याप्ती वाढविण्यात आली. १,४११.६ चौरस कि.मी.चे क्षेत्र असलेले सत्यमंगलम तामिळनाडूतील सर्वांत मोठे अभयारण्य आहे. २०१३ मध्ये त्याला व्याघ्र प्रकल्प घोषित करण्यात आले. सत्यमंगलम उष्णकटीबंधीय शुष्क जंगल असून, ते पूर्व आणि पश्चिम घाटाला जोडते. २००९ मध्ये करण्यात आलेल्या प्राणिगणनेनुसार येथे १० वाघ, ८६६ भारतीय हत्ती, ६७२ गवे आणि २७ बिबटे होते. तथापि, २०१२ च्या गणनेत पंचवीसहून अधिक वाघ येथे दिसून आले. जगात सर्वाधिक आशियाई हत्ती येथेच आहेत. सत्यमंगलममध्ये हरणांच्या विविध प्रजाती असून, जंगली म्हशींचे कळपही आढळून येतात. या अभयारण्यात इलुगा आणि सोलिगा या दोन आदिवासी जमातींच्या वसाहती असून, मध आणि इतर वनसंपदेद्वारे त्यांचा उदरनिर्वाह चालतो. कुख्यात चंदनतस्कर वीरप्पनचे तस्करी साम्राज्यही याच जंगलात होते. तो हत्तींना मारून त्यांच्या दाताची तसेच चंदनाच्या झाडांची तस्करी करीत असे. प्रसिद्ध कन्नड अभिनेते राजकुमार यांचे अपहरण करणाऱ्या वीरप्पनने अनेकांची हत्या केली होती. २००४ मध्ये तामिळनाडू पोलिसांनी या क्रूरकर्म्याला ठार केले होते.