शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटील 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीला; मुंबईत NCP शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत येणार?
2
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
3
UPSC यशानंतर IPS अधिकारी बनली पूर्वा चौधरी, सौंदर्यासोबतच वादामुळे चर्चेत, जाणून घ्या प्रकरण
4
सोनं विक्रमी उच्चांकावर, चांदी एका झटक्यात १३११७ रुपयांनी उसळली! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
5
काँग्रेसची १२५हून अधिक तिकिटे फायनल; प्रदेश निवड समितीच्या बैठकीत १५ मिनिटांत आटोपली चर्चा
6
"२१ कोटींची मागणी आणि...", अक्षय खन्नाची 'दृश्यम ३' सिनेमातून एक्झिट, अखेर खरं कारण समोर
7
MS Dhoni Pension: बीसीसीआय महेंद्रसिंह धोनीला किती पेन्शन देते? जाणून घ्या!
8
"मुंबईचा महापौर पठाण, शैख, सैयद, अन्सारी का होऊ शकत नाही?"; वारीस पठाण यांचा प्रश्न, संजय राऊतांचंही स्पष्टच उत्तर!
9
भारतीयांना रशियन दारूचे वेड! १० महिन्यांत ५२० टन व्हिस्की, जिन आणि वोडका रिचवली
10
Vijay Hazare Trophy: थोरल्या भावाने दिली धाकट्याला पदार्पणाची कॅप; दोघांच्यातील शतकी भागीदारीनंतर जे घडलं ते कमालच!
11
कानातले, मोजे आणि अंडरगारमेंट गायब...; उदयपूर गँगरेपमधील IT मॅनेजर पीडितेची आपबीती
12
मनसेचं ‘नऊ’निर्माण होईल? १६-०१-२०२६ ची ‘बेरीज’ राज ठाकरेंसाठी ठरेल का ‘मंगल’? काय सांगते अंक-ज्योतिषशास्त्राची युती?
13
मंत्री भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले २४ दिवसांपासून पोलिसांना सापडेना, महाडमधील प्रकरण काय?
14
पोलिसांवर दगडफेक! 12 महिलांसह 75 जणांना अटक; जयपूरमध्ये मध्यरात्री नेमकं काय झालं?
15
"धुरंधर हा एक भयानक कुत्रा, तो प्रत्येक 'बिग बजेट'...", राम गोपाल वर्मा यांची पोस्ट चर्चेत; नेमकं काय म्हणाले?
16
"राहिलेलं आयुष्य राजसाहेबांसोबत" म्हणणाऱ्या पाटलांनी मनसे सोडली; भाजपला लबाड म्हटल्याचा व्हिडीओ व्हायरल
17
भाईंदरनंतर आता ठाण्यात बिबट्या घुसला, नागरिकांमध्ये दहशत, नेमका कुठे आणि कधी दिसला?
18
भाजपाच्या सांगण्यावरून शिवसेना चालणार का?; संतप्त शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांचं पुण्यात आंदोलन
19
भारतातच फिरायला जायचा विचार करताय? 'या' ४ राज्यांत विनापरवाना गेलात तर होईल ५ वर्षांची जेल!
20
₹७६१३ वरुन ₹१५२२ वर आला 'हा' शेअर; अखेर का एका दिवसात ८० टक्क्यांनी स्वस्त झाला स्टॉक?
Daily Top 2Weekly Top 5

तामिळनाडूतील सत्यमंगलम अभयारण्य

By admin | Updated: January 19, 2017 05:06 IST

भारताच्या पश्चिम घाटात वसलेले तामिळनाडूतील सत्यमंगलम वन्यजीवन अभयारण्य आणि व्याघ्र प्रकल्प हे संरक्षित क्षेत्र आहे.

भारताच्या पश्चिम घाटात वसलेले तामिळनाडूतील सत्यमंगलम वन्यजीवन अभयारण्य आणि व्याघ्र प्रकल्प हे संरक्षित क्षेत्र आहे. सत्यमंगलमला २००८ मध्ये वन्यजीव अभयारण्य घोषित करण्यात येऊन २०११ मध्ये त्याची व्याप्ती वाढविण्यात आली. १,४११.६ चौरस कि.मी.चे क्षेत्र असलेले सत्यमंगलम तामिळनाडूतील सर्वांत मोठे अभयारण्य आहे. २०१३ मध्ये त्याला व्याघ्र प्रकल्प घोषित करण्यात आले. सत्यमंगलम उष्णकटीबंधीय शुष्क जंगल असून, ते पूर्व आणि पश्चिम घाटाला जोडते. २००९ मध्ये करण्यात आलेल्या प्राणिगणनेनुसार येथे १० वाघ, ८६६ भारतीय हत्ती, ६७२ गवे आणि २७ बिबटे होते. तथापि, २०१२ च्या गणनेत पंचवीसहून अधिक वाघ येथे दिसून आले. जगात सर्वाधिक आशियाई हत्ती येथेच आहेत. सत्यमंगलममध्ये हरणांच्या विविध प्रजाती असून, जंगली म्हशींचे कळपही आढळून येतात. या अभयारण्यात इलुगा आणि सोलिगा या दोन आदिवासी जमातींच्या वसाहती असून, मध आणि इतर वनसंपदेद्वारे त्यांचा उदरनिर्वाह चालतो. कुख्यात चंदनतस्कर वीरप्पनचे तस्करी साम्राज्यही याच जंगलात होते. तो हत्तींना मारून त्यांच्या दाताची तसेच चंदनाच्या झाडांची तस्करी करीत असे. प्रसिद्ध कन्नड अभिनेते राजकुमार यांचे अपहरण करणाऱ्या वीरप्पनने अनेकांची हत्या केली होती. २००४ मध्ये तामिळनाडू पोलिसांनी या क्रूरकर्म्याला ठार केले होते.