शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
2
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
3
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
4
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
5
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल चामखीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
Plane Crash: उड्डाणानंतर काही मिनिटांतच विमान कोसळलं; भयानक घटना कॅमेऱ्यात कैद!
8
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
9
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
10
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
11
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
12
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
13
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
14
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
15
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
16
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
17
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
18
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
19
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
20
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...

उपग्रह धोरण तातडीने गतिमान करावे

By admin | Updated: November 7, 2015 01:59 IST

उपग्रहांद्वारे पडताळणी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्याविषयीचे धोरण महाराष्ट्राने तातडीने कार्यान्वित करणे आवश्यक असून तसे झाल्यास दोन वर्षांनंतर शेतकऱ्यांपर्यंत

- राजू नायक, नवी दिल्लीउपग्रहांद्वारे पडताळणी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्याविषयीचे धोरण महाराष्ट्राने तातडीने कार्यान्वित करणे आवश्यक असून तसे झाल्यास दोन वर्षांनंतर शेतकऱ्यांपर्यंत त्याचे लाभ पोहोचू शकतील, असे मत ‘सीएसई’चे शास्त्रज्ञ अर्जुन श्रीनिधी यांनी व्यक्त केले.विज्ञान आणि पर्यावरण केंद्राने (सीएसई) वातावरण बदलावर पत्रकारांसाठी येथे आयोजित केलेल्या कार्यशाळेच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’शी बोलताना श्रीनिधी यांनी महाराष्ट्राने उपग्रहाचे तंत्रज्ञान वापरण्याच्या कार्यक्रमास गती देण्याची आवश्यकता प्रतिपादीत केली. सद्यस्थितीत काही मोजकेच उपग्रह बाजारभाव व पिकांविषयीच्या माहितीचे संकलन आणि हस्तांतरण करत आहेत. रडारसेटद्वारे तर सर्व प्रकारचे हवामान, भूपृष्ठाची सुस्पष्ट छायाचित्रे उपलब्ध होत असतात. ज्यावरुन पिकाविषयीच्या सद्यस्थितीची माहिती मिळू शकते आणि नैसर्गिक व अन्य कारणांमुळे झालेल्या वैयक्तिक हानीचा अचूक निष्कर्षही काढला जाऊ शकतो, असे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रात प्रायोगिक तत्त्वावर ५०० गावांतून ही योजना कार्यान्वित होईल आणि कालांतराने ती राज्यभर राबविली जाईल. सध्याच्या व्यवस्थेमुळे अनेकदा शेतकऱ्यांचे प्रत्यक्ष झालेले नुकसान आणि मिळालेली भरपाई यात प्रचंड तफावत असते. मात्र उपग्रह मॅपिंगद्वारे मिळणाऱ्या अचूक माहितीमुळे प्रत्येक शेतकऱ्याच्या वैयक्तिक नुकसानीचा थेट पुरावा उपलब्ध होतो.हवामानाचा अंदाज वर्तविणाऱ्या खासगी कंपन्यांवर सरकारचे नियंत्रण असण्याची गरज आहे. खासगी कंपन्यांमुळे विमा कंपन्यांना लाभ होत असल्याने त्यांचे संगनमत असते; पण दुर्दैवाने शेतकरीही खासगी कंपन्यांच्या अंदाजांच्या नादी लागून तोंडघशी पडतात. - सुनीता नारायण, सरसंचालिका, सीएसई यंदाचे पर्जन्यमान सर्वसाधारण असेल, असा अंदाज खासगी कंपन्यांनी वर्तविला होता. प्रत्यक्षात शेतकरी यंदा अवर्षणाचा सामना करत आहे. देशातील खासगी हवामान कंपन्यांसाठी कोणतीच नियमावली नाही. त्यांच्यावर प्रशासनाचे कोणतेही नियंत्रण नाही. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.- चंद्रभूषण, उपसंचालक, सीएसई