शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
3
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
4
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
5
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
6
‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
7
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
8
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
9
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
10
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
11
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
12
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
13
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
14
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
15
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
16
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
17
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
18
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
19
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
20
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा

उपग्रह धोरण तातडीने गतिमान करावे

By admin | Updated: November 7, 2015 01:59 IST

उपग्रहांद्वारे पडताळणी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्याविषयीचे धोरण महाराष्ट्राने तातडीने कार्यान्वित करणे आवश्यक असून तसे झाल्यास दोन वर्षांनंतर शेतकऱ्यांपर्यंत

- राजू नायक, नवी दिल्लीउपग्रहांद्वारे पडताळणी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्याविषयीचे धोरण महाराष्ट्राने तातडीने कार्यान्वित करणे आवश्यक असून तसे झाल्यास दोन वर्षांनंतर शेतकऱ्यांपर्यंत त्याचे लाभ पोहोचू शकतील, असे मत ‘सीएसई’चे शास्त्रज्ञ अर्जुन श्रीनिधी यांनी व्यक्त केले.विज्ञान आणि पर्यावरण केंद्राने (सीएसई) वातावरण बदलावर पत्रकारांसाठी येथे आयोजित केलेल्या कार्यशाळेच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’शी बोलताना श्रीनिधी यांनी महाराष्ट्राने उपग्रहाचे तंत्रज्ञान वापरण्याच्या कार्यक्रमास गती देण्याची आवश्यकता प्रतिपादीत केली. सद्यस्थितीत काही मोजकेच उपग्रह बाजारभाव व पिकांविषयीच्या माहितीचे संकलन आणि हस्तांतरण करत आहेत. रडारसेटद्वारे तर सर्व प्रकारचे हवामान, भूपृष्ठाची सुस्पष्ट छायाचित्रे उपलब्ध होत असतात. ज्यावरुन पिकाविषयीच्या सद्यस्थितीची माहिती मिळू शकते आणि नैसर्गिक व अन्य कारणांमुळे झालेल्या वैयक्तिक हानीचा अचूक निष्कर्षही काढला जाऊ शकतो, असे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रात प्रायोगिक तत्त्वावर ५०० गावांतून ही योजना कार्यान्वित होईल आणि कालांतराने ती राज्यभर राबविली जाईल. सध्याच्या व्यवस्थेमुळे अनेकदा शेतकऱ्यांचे प्रत्यक्ष झालेले नुकसान आणि मिळालेली भरपाई यात प्रचंड तफावत असते. मात्र उपग्रह मॅपिंगद्वारे मिळणाऱ्या अचूक माहितीमुळे प्रत्येक शेतकऱ्याच्या वैयक्तिक नुकसानीचा थेट पुरावा उपलब्ध होतो.हवामानाचा अंदाज वर्तविणाऱ्या खासगी कंपन्यांवर सरकारचे नियंत्रण असण्याची गरज आहे. खासगी कंपन्यांमुळे विमा कंपन्यांना लाभ होत असल्याने त्यांचे संगनमत असते; पण दुर्दैवाने शेतकरीही खासगी कंपन्यांच्या अंदाजांच्या नादी लागून तोंडघशी पडतात. - सुनीता नारायण, सरसंचालिका, सीएसई यंदाचे पर्जन्यमान सर्वसाधारण असेल, असा अंदाज खासगी कंपन्यांनी वर्तविला होता. प्रत्यक्षात शेतकरी यंदा अवर्षणाचा सामना करत आहे. देशातील खासगी हवामान कंपन्यांसाठी कोणतीच नियमावली नाही. त्यांच्यावर प्रशासनाचे कोणतेही नियंत्रण नाही. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.- चंद्रभूषण, उपसंचालक, सीएसई