शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

सरपंच तरुणीने बदलला गावाचा चेहरामोहरा!

By admin | Updated: September 3, 2016 03:00 IST

छत्तीसगडमधील सर्वात तरुण सरपंच बनण्याचा मान मिळालेली रितू पंदराम सध्या विकास कामांद्वारे गावकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी परिश्रम करीत आहे.

रायपूर : छत्तीसगडमधील सर्वात तरुण सरपंच बनण्याचा मान मिळालेली रितू पंदराम सध्या विकास कामांद्वारे गावकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी परिश्रम करीत आहे. गरीब मुलांना नि:शुक्ल शिकवणीची सोय व सरकारी योजना खेचून आणण्यास पाठपुरावा करून तिने चुणूक दाखवली असून, गावकरी तिच्या कामावर खुश आहेत. गावच्या विकासासाठी झटताना ती ‘आयएएस’ अधिकारी बनण्याचे स्वत:चे स्वप्न प्रत्यक्षात उतरण्यासाठीही तेवढ्याच तन्मयतेने प्रयत्न करीत आहे. सारबहारा गावची ही तरुण सरपंच गावातील पाणीटंचाई आणि स्वच्छतेसारखे मुद्दे सोडविण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन प्रयत्न करीत आहे. गावात पाणी, वीज आणि शिक्षणाची सुविधा उपलब्ध असल्यास ग्रामस्थांच्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन घडून येईल आणि त्यांचे भविष्य उज्ज्वल होईल, असे त्यांनी सांगितले. सारबहाराची नऊ हजार लोकसंख्या आहे. गावातील बहुतांश लोक आदिवासी आहेत. रितू बिलासपूर येथील गुरू घासीदास केंद्रीय विद्यापीठात जैवतंत्रज्ञान विषयात पदव्युत्तर शिक्षण घेत असून, नागरी सेवा परीक्षेत उत्तीर्ण होण्याचे तिचे ध्येय आहे. तिचे हे ध्येय ग्रामपंचायत निवडणूक लढविण्याच्या आड आले नाही. २०१५ मध्ये निवडणूक जिंकून राज्यातील सर्वात तरुण सरपंच बनण्याचा मान तिने पटकावला. निवडणुकीनंतर तिने शिक्षण सुरूच ठेवले. कॉलेजमधील माझे मित्र मला नेताजी म्हणून हाक मारत. राजकारण हा माझा प्रांत नसल्यामुळे आपण निवडणूक लढवू असा कधी विचारही माझ्या मनाला शिवला नव्हता. आता माझ्या गावातील लोक मीच सर्वात योग्य असल्याचे म्हणतात. रितूचे वडील उदयसिंह पंदराम शेतकरी आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)स्वच्छता, रस्ते बांधण्यावर दिला भरसरपंच झाल्यापासून रितूने गावच्या विकासाचा ध्यास घेतला आहे. स्वच्छता ठेवणे आणि रस्ते बांधण्यावर तिने भर दिला. आमच्या गावात १२ वी पर्यंत सरकारी शाळा व एक निमसरकारी आदर्श शाळा आहे. तथापि, विद्यार्थ्यांना गणित आणि विज्ञानातील मूलभूत गोष्टी समजाव्यात यासाठी त्यांच्याकडे अतिरिक्त लक्ष देण्याची आवश्यकता आहे. माझ्या नि:शुल्क शिकवणी वर्गात गेल्यावर्षी १२ ते १३ मुले होती. यावर्षी ही संख्या ३० वर गेली आहे.