शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
4
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
5
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
6
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
7
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
8
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
9
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
10
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
12
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
13
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
14
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
15
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
16
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
17
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
18
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
19
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
20
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!

मनाच्या शुद्धीकरणासाठी संस्कृतला प्रोत्साहन देणे गरजेचे

By admin | Updated: June 29, 2015 00:17 IST

संस्कृत भाषेला चालना दिली पाहिजे. कारण संस्कृत भाषा लोकांच्या मनाचे शुद्धीकरण करते आणि अशा प्रकारे संपूर्ण जगाला पवित्र करते, असा दावा भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी येथे केला.

बँकॉक : संस्कृत भाषेला चालना दिली पाहिजे. कारण संस्कृत भाषा लोकांच्या मनाचे शुद्धीकरण करते आणि अशा प्रकारे संपूर्ण जगाला पवित्र करते, असा दावा भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी येथे केला. ६० देशांतील संस्कृत विद्वानांच्या पाच दिवसीय संमेलनाचे उद्घाटन रविवारी त्यांच्या हस्ते झाले.संमेलनाच्या उद्घाटनपर भाषणात सुषमा स्वराज यांनी संस्कृतला ‘आधुनिक आणि सार्वत्रिक’ भाषा संबोधत याच्या परंपरेची गंगा नदीशी तुलना केली. ६०० हून अधिक संस्कृत विद्वानांची उपस्थिती असलेल्या या संमेलनात सुषमा यांनी आपले संपूर्ण भाषण संस्कृतमध्ये दिले.१६ व्या जागतिक संस्कृत संमेलनाच्या प्रमुख अतिथी म्हणून संबोधित करताना सुषमा यांनी परराष्ट्र मंत्रालयात संयुक्त सचिव (संस्कृत) असे स्वतंत्र पद तयार करण्याची घोषणा केली.भाषेची ओळख, अनुवाद, सायबर सुरक्षा आणि कृत्रिम गुप्तचर सेवा यासारख्या अन्य क्षेत्रांत सॉफ्टवेअर विकसित करण्यात संस्कृत महत्त्वाची भूमिका निभावू शकते, असा मतप्रवाह वैज्ञानिकांत असल्याचे स्वराज म्हणाल्या. जागतिक संस्कृत संमेलनात प्रथमच सुषमा स्वराज यांच्या पातळीचा एखादा केंद्रीय मंत्री सामील झाला. यावरून केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार संस्कृत भाषेच्या प्रचार-प्रसाराला किती महत्त्व देते याचे संकेत मिळतात. मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी दोन जुलै रोजी या संमेलनाच्या समारोप समारंभाला उपस्थित राहणार आहेत. पहिले संस्कृत संमेलन १९७२ मध्ये दिल्लीला झाले होते.यावेळी भारतातून २५० संस्कृत विद्वानांनी संमेलनाला उपस्थिती लावली. यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित संस्कृत भारती या संस्थेचे ३० प्रतिनिधी होते. संस्कृत भारतीच्या भूमिकेचेही स्वराज यांनी यावेळी कौतुक केले. (वृत्तसंस्था)शास्त्र-विज्ञानातील अंतर दूर करण्यासाठी प्रयत्न४सुषमा स्वराज म्हणाल्या, ‘गोमुखातून उगम पाऊन गंगा सागरला (येथे समुद्राला मिळते) पोहोचल्यानंतरही गंगा नदी पवित्र राहते. तिने उपनद्यांना पवित्र बनविले. याचप्रमाणे ‘संस्कृत’ पवित्र असून अन्य कोणत्याही भाषा तिच्या संपर्कात आल्यानंतर त्या सर्वांना पवित्र बनविले.’ या पार्श्वभमीवर संस्कृतचा प्रचार-प्रसार होणे गरजेचे असून यामुळे लोकांच्या मनाचे शुद्धीकरण होईल व अशा प्रकारे संपूर्ण जग पवित्र होईल. ४‘संस्कृतच्या ज्ञानाने तापमान वाढ, सभ्यतांमधील संघर्ष, गरिबी, दहशतवाद यासारख्या समकालीन समस्यांवर तोडगा निघू शकतो. आमचा प्रयत्न शास्त्र आणि विज्ञान यांच्या अभ्यासातील अंतर दूर करण्याच्या दिशेने सुरू आहे,’ असे त्या म्हणाल्या.