शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

संघाची विचारसरणी देशाच्या हिताची नाही

By admin | Updated: April 19, 2016 03:24 IST

देशात सहिष्णुता असणे आवश्यक असून, भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे दोघे मिळून असहिष्णुतेचे वातारण निर्माण करीत आहेत, त्यातून देशातील शांतता आणि सद्भाव यांना धक्का पोहोचला आहे

पाटणा : देशात सहिष्णुता असणे आवश्यक असून, भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे दोघे मिळून असहिष्णुतेचे वातारण निर्माण करीत आहेत, त्यातून देशातील शांतता आणि सद्भाव यांना धक्का पोहोचला आहे. एकूणच संघ आणि भाजप यांची विचारसरणी देशाच्या हिताची नाही, असे प्रतिपादन बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी सोमवारी केले.दोन वर्षांपूर्वी लोकसभा निवडणुकांच्या वेळी भाजपने जी आश्वासने दिली होती, ती पूर्ण करण्यात त्या पक्षाला अपयश आले आहे. त्यामुळे त्यापासून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी शांतता आणि सद्भाव यांनाच धक्का देत समाजामध्ये असहिष्णुता निर्माण केली जात आहे, असे सांगून ते म्हणाले की काळा पैसा परत आणण्याची भाषा करणारा हा पक्ष आता गोमांस, जिहाद यासारखे मुद्दे उकरून काढत आहे. आम्ही काही काळ भारतीय जनता पक्षासोबत सत्तेत सहभागी होतो, हे खरे आहे. पण त्यामुळे आम्ही आमच्या विचारसरणीशी कधी समझोता केला नाही, असे ते म्हणाले. (वृत्तसंस्था)