शहरं
Join us  
Trending Stories
1
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
2
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
3
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
4
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
5
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
6
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
7
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
8
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
9
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
10
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
11
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
12
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
13
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
14
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
15
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
16
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
17
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
18
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
19
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
20
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

संघाने भाजपाला दिला घरचा अहेर

By admin | Updated: February 18, 2015 01:25 IST

भारतीय जनता पक्ष (भाजप) दिल्ली विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवाच्या धक्क्यातून अद्याप सावरला नसतानाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पक्षावर शरसंधान साधले आहे.

दिल्ली विधानसभा निवडणूक : किरण बेदी यांच्या निवडीवर प्रश्नचिन्हनवी दिल्ली : भारतीय जनता पक्ष (भाजप) दिल्ली विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवाच्या धक्क्यातून अद्याप सावरला नसतानाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पक्षावर शरसंधान साधले आहे. माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार करण्याच्या निर्णयावर संघाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. याशिवाय पक्ष कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष करण्याची भाजपला कशी किंमत मोजावी लागली याकडेही संघटनेने लक्ष वेधले आहे. संघाचे मुखपत्र असलेल्या पांचजन्यच्या ताज्या अंकात ‘आकांक्षाओंकी उडान’ आणि ‘वादे, सवाल, केजरीवाल’ या शीर्षकाखाली दोन लेख प्रकाशित झाले आहेत. या लेखांमधून दिल्लीत भाजपच्या पराभवाची कारणमीमांसा करण्यात आली आहे. अखेर भाजप पराभूत का झाला? बेदी यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार करण्याचा निर्णय योग्य होता काय? या पदासाठी हर्षवर्धन अथवा राज्यातील इतर कुठल्या नेत्याची निवड केली असती तर निकालाचे चित्र वेगळे असते काय? आदी प्रश्न यात उपस्थित करण्यात आले आहेत. मनोज वर्मा यांनी लिहिलेल्या लेखात पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कामगिरी जनतेसमक्ष मांडण्यात अपयशी ठरला की मोदी लाटेवर अवाजवी अवलंबून राहिला, असाही सवाल उपस्थित करण्यात आला आहे. यात बेदींची उमेदवारी कशी महागात पडली याकडे लक्ष वेधतानाच असे नमूद करण्यात आले की, संघटनेत ऐक्य, नियोजनाचा अभाव आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार झाला नाही. (लोकमत न्यूज नेटवर्क)च्हितेश शंकर यांनी लिहिलेल्या दुसऱ्या लेखात भाजपच्या नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. भाजपच्या पदाधिकाऱ्यांना त्यांच्याकडे संघ सिद्धांतांची शिदोरी आणि पक्ष कार्यकर्त्यांच्या समर्पणाशिवाय दुसरे कुठले भांडवल आहे याचे उत्तर द्यावे लागणार आहे.च्पक्ष म्हणजे एखाद्या यंत्राप्रमाणे असून ते आपल्या इच्छेनुसार त्याचा कारभार चालवू शकतात, असे संघटना आणि सरकारमधील काही लोकांना वाटू लागले असेल तर या निकालांनी त्यांचा हा भ्रमाचा भोपळा फुटला पाहिजे. च्कारण केवळ पक्ष कार्यकर्त्यांचे समर्पण आणि राष्ट्रवादी सिद्धांताप्रती असलेली वचनबद्धता याच्या बळावरच भाजप आपली मते कायम ठेवू शकला आहे, अशा कठोर शब्दांत या लेखात पक्ष नेतृत्वाची कानउघाडणी करण्यात आली आहे.