शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
2
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
3
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
4
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
5
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
6
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
7
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
8
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
9
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
10
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
11
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
12
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
13
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
14
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
15
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
16
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
17
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
18
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
19
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
20
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ

संघाने भाजपाला दिला घरचा अहेर

By admin | Updated: February 18, 2015 01:25 IST

भारतीय जनता पक्ष (भाजप) दिल्ली विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवाच्या धक्क्यातून अद्याप सावरला नसतानाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पक्षावर शरसंधान साधले आहे.

दिल्ली विधानसभा निवडणूक : किरण बेदी यांच्या निवडीवर प्रश्नचिन्हनवी दिल्ली : भारतीय जनता पक्ष (भाजप) दिल्ली विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवाच्या धक्क्यातून अद्याप सावरला नसतानाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पक्षावर शरसंधान साधले आहे. माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार करण्याच्या निर्णयावर संघाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. याशिवाय पक्ष कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष करण्याची भाजपला कशी किंमत मोजावी लागली याकडेही संघटनेने लक्ष वेधले आहे. संघाचे मुखपत्र असलेल्या पांचजन्यच्या ताज्या अंकात ‘आकांक्षाओंकी उडान’ आणि ‘वादे, सवाल, केजरीवाल’ या शीर्षकाखाली दोन लेख प्रकाशित झाले आहेत. या लेखांमधून दिल्लीत भाजपच्या पराभवाची कारणमीमांसा करण्यात आली आहे. अखेर भाजप पराभूत का झाला? बेदी यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार करण्याचा निर्णय योग्य होता काय? या पदासाठी हर्षवर्धन अथवा राज्यातील इतर कुठल्या नेत्याची निवड केली असती तर निकालाचे चित्र वेगळे असते काय? आदी प्रश्न यात उपस्थित करण्यात आले आहेत. मनोज वर्मा यांनी लिहिलेल्या लेखात पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कामगिरी जनतेसमक्ष मांडण्यात अपयशी ठरला की मोदी लाटेवर अवाजवी अवलंबून राहिला, असाही सवाल उपस्थित करण्यात आला आहे. यात बेदींची उमेदवारी कशी महागात पडली याकडे लक्ष वेधतानाच असे नमूद करण्यात आले की, संघटनेत ऐक्य, नियोजनाचा अभाव आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार झाला नाही. (लोकमत न्यूज नेटवर्क)च्हितेश शंकर यांनी लिहिलेल्या दुसऱ्या लेखात भाजपच्या नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. भाजपच्या पदाधिकाऱ्यांना त्यांच्याकडे संघ सिद्धांतांची शिदोरी आणि पक्ष कार्यकर्त्यांच्या समर्पणाशिवाय दुसरे कुठले भांडवल आहे याचे उत्तर द्यावे लागणार आहे.च्पक्ष म्हणजे एखाद्या यंत्राप्रमाणे असून ते आपल्या इच्छेनुसार त्याचा कारभार चालवू शकतात, असे संघटना आणि सरकारमधील काही लोकांना वाटू लागले असेल तर या निकालांनी त्यांचा हा भ्रमाचा भोपळा फुटला पाहिजे. च्कारण केवळ पक्ष कार्यकर्त्यांचे समर्पण आणि राष्ट्रवादी सिद्धांताप्रती असलेली वचनबद्धता याच्या बळावरच भाजप आपली मते कायम ठेवू शकला आहे, अशा कठोर शब्दांत या लेखात पक्ष नेतृत्वाची कानउघाडणी करण्यात आली आहे.