शहरं
Join us  
Trending Stories
1
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
2
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
3
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
4
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
5
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
6
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
7
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
8
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
9
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
10
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
11
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
12
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
13
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
14
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
15
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
16
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
17
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
18
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
19
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
20
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल

संघाने भाजपाला दिला घरचा अहेर

By admin | Updated: February 18, 2015 01:25 IST

भारतीय जनता पक्ष (भाजप) दिल्ली विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवाच्या धक्क्यातून अद्याप सावरला नसतानाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पक्षावर शरसंधान साधले आहे.

दिल्ली विधानसभा निवडणूक : किरण बेदी यांच्या निवडीवर प्रश्नचिन्हनवी दिल्ली : भारतीय जनता पक्ष (भाजप) दिल्ली विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवाच्या धक्क्यातून अद्याप सावरला नसतानाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पक्षावर शरसंधान साधले आहे. माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार करण्याच्या निर्णयावर संघाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. याशिवाय पक्ष कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष करण्याची भाजपला कशी किंमत मोजावी लागली याकडेही संघटनेने लक्ष वेधले आहे. संघाचे मुखपत्र असलेल्या पांचजन्यच्या ताज्या अंकात ‘आकांक्षाओंकी उडान’ आणि ‘वादे, सवाल, केजरीवाल’ या शीर्षकाखाली दोन लेख प्रकाशित झाले आहेत. या लेखांमधून दिल्लीत भाजपच्या पराभवाची कारणमीमांसा करण्यात आली आहे. अखेर भाजप पराभूत का झाला? बेदी यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार करण्याचा निर्णय योग्य होता काय? या पदासाठी हर्षवर्धन अथवा राज्यातील इतर कुठल्या नेत्याची निवड केली असती तर निकालाचे चित्र वेगळे असते काय? आदी प्रश्न यात उपस्थित करण्यात आले आहेत. मनोज वर्मा यांनी लिहिलेल्या लेखात पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कामगिरी जनतेसमक्ष मांडण्यात अपयशी ठरला की मोदी लाटेवर अवाजवी अवलंबून राहिला, असाही सवाल उपस्थित करण्यात आला आहे. यात बेदींची उमेदवारी कशी महागात पडली याकडे लक्ष वेधतानाच असे नमूद करण्यात आले की, संघटनेत ऐक्य, नियोजनाचा अभाव आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार झाला नाही. (लोकमत न्यूज नेटवर्क)च्हितेश शंकर यांनी लिहिलेल्या दुसऱ्या लेखात भाजपच्या नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. भाजपच्या पदाधिकाऱ्यांना त्यांच्याकडे संघ सिद्धांतांची शिदोरी आणि पक्ष कार्यकर्त्यांच्या समर्पणाशिवाय दुसरे कुठले भांडवल आहे याचे उत्तर द्यावे लागणार आहे.च्पक्ष म्हणजे एखाद्या यंत्राप्रमाणे असून ते आपल्या इच्छेनुसार त्याचा कारभार चालवू शकतात, असे संघटना आणि सरकारमधील काही लोकांना वाटू लागले असेल तर या निकालांनी त्यांचा हा भ्रमाचा भोपळा फुटला पाहिजे. च्कारण केवळ पक्ष कार्यकर्त्यांचे समर्पण आणि राष्ट्रवादी सिद्धांताप्रती असलेली वचनबद्धता याच्या बळावरच भाजप आपली मते कायम ठेवू शकला आहे, अशा कठोर शब्दांत या लेखात पक्ष नेतृत्वाची कानउघाडणी करण्यात आली आहे.