शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

वाळू, विटा विक्रेत्यांनी गिळला रस्ता मनपाचेही अतिक्रमण: प्रचंड रहदारी तरीही दुर्लक्ष कायम

By admin | Updated: July 27, 2016 19:18 IST

जळगाव : आयटीआय ते आकाशवाणी चौक या भागात दिवसभर प्रचंड रहदारी असते. त्यातच बहिणाबाई उद्यानाच्या मागील समांतर रस्त्याच्या जागेत वाळू माफीयांनी मोठ्या प्रमाणात समांतर रस्ता बळकावला आहे. याबाबत वारंवार तक्रारी होऊनही त्याची दखल घेतली गेली नसल्याच्या परिसरातील नागरिकांच्या तक्रारी आहेत.

जळगाव : आयटीआय ते आकाशवाणी चौक या भागात दिवसभर प्रचंड रहदारी असते. त्यातच बहिणाबाई उद्यानाच्या मागील समांतर रस्त्याच्या जागेत वाळू माफीयांनी मोठ्या प्रमाणात समांतर रस्ता बळकावला आहे. याबाबत वारंवार तक्रारी होऊनही त्याची दखल घेतली गेली नसल्याच्या परिसरातील नागरिकांच्या तक्रारी आहेत.
आयटीआय व मुलींचे आयटीआयच्या भिंतीला लागूनच मोठे अतिक्रमण आहे. यातील बरीचशी जागा मनपाने सागरपार्कवरील हॉकर्सला दिली आहे. त्यामुळे सायंकाळच्या वेळी या ठिकाणी प्रचंड गर्दी असते. पुढे बहिणाबाई उद्यानाच्या मागे समांतर रस्त्यावर अतिक्रमण करण्यात जणू स्पर्धा सुरू असल्याचीच प्रचिती येते. महामार्गाच्या दोन्ही बाजूने ही परिस्थिती दिसून येते. टपर्‍या, खाद्य पदार्थांच्या गाड्यांचा महामार्गाला वेढा असल्याचीच प्रचिती या भागात येते. बहिणाबाई उद्यानाच्या पुढील हॉकर्सला मागच्या बाजुने जागा देण्यात आली आहे. त्याच्याच पुढे वाळू, विटा, खडी विके्रत्यांनी मोठा रस्ता बळकावला असल्याचे लक्षात येते. केवळ टपर्‍याच नाही तर या मंडळींची ट्रक, डंपर,ट्रॅक्टर तसेच वाळू, विटा, खडीचे ढीग या ठिंकाणी लावून रस्ता बळकावला असल्याचे लक्षात येते. त्यामुळे येथे प्रचंड गर्दी सतत असते.
-----
धोकादायक प्रकार
ब्रुकबॉण्ड कॉलनीच्या मागील बाजूने रिंगरोडकडून अनेक जण महामार्गाकडे येत असतात. अग्रवाल हॉस्पिटलजवळ चार रस्ते एकत्र येतात. एक बहिणाबाई उद्याकडून, दुसरा रिंगरोडकडून तिसरा महामार्ग एक रस्ता मु.जे. महाविद्यालयाकडून येतो. या ठिकाणी मोठमोठे गतिरोधक असल्याने वाहने हळू होतात मात्र एकमेकांच्या पुढे जाण्याची कसरत या ठिंकाणी नेहमी सुरू असते. त्यामुळे बर्‍याच वेळेस अपघात होतात. या भागातील समांतर काही ठिकाणी आहे. तो दुरुस्त करून त्यावरून रहदारी वळविल्यास महामार्गावरील गर्दी कमी होऊ शकते. अशीच परिस्थिती प्रभात चौकाकडून गणपती हॉस्पिटलकडे जाणार्‍या रस्त्याचीही आहे. तेथेही समांतर रस्ता चांगला आहे. तो थेट पुढे आकाशवाणी चौकाकडे येतो. तेथून रहदारीही बर्‍यापैकी आहे. मात्र रस्ता खराब झाला आहे. त्याची डागडुजी केली गेल्यास तेथून वाहने जाऊ शकतील.