शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
"मला ही भूमिका साकारायची...", आमिर खानने दिली 'महाभारत' प्रोजेक्टची हिंट, सुरु करणार काम
4
मुंबईच्या हॉटेलमध्ये प्रियकराची हत्या, पत्नीला केला मेसेज...; राजस्थानात महिलेला अटक
5
एकनाथ शिंदेंचा एकाचवेळी काँग्रेस, शरद पवार गटाला धक्का; पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत
6
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
7
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
9
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
10
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
11
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
13
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
14
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
15
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! भारताचा सुस्पष्ट संदेश; आता पाकिस्तानने चूक केल्यास...
16
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
17
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
18
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
19
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  

एकाच वेळी निवडणुका योग्य

By admin | Updated: January 26, 2017 05:23 IST

लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेण्याला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी स्पष्टपणे पाठिंबा दिला व चलनातून ५०० आणि एक हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय योग्य ठरवला.

नवी दिल्ली : लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेण्याला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी स्पष्टपणे पाठिंबा दिला व चलनातून ५०० आणि एक हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय योग्य ठरवला. प्रजासत्ताक दिनानिमित्त बुधवारी रात्री राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात मुखर्जी म्हणाले की, ‘राजकीय पक्षांशी विचारविनिमय करून निवडणूक आयोगाने एकाच वेळी निवडणुका घेण्याचा विचार पुढे न्यावा. देशाचे सामर्थ्य हे अनेकदा आणि विविधतेमध्ये सामावलेले असून, भारताने वादविवाद करणारा भारतीय अशी प्रसिद्धी मिळवलेली आहे, असहिष्णू भारतीय अशी नाही.’लोकशाही समृद्ध होण्यासाठी समंजस आणि विवेकी मन आवश्यक असल्याचे ते म्हणाले. लोकसभा आणि विधानसभेतील कामकाज विस्कळीत करण्याच्या प्रकारावर त्यांनी सावध केले. नोटाबंदीच्या विषयावर बोलताना प्रणव मुखर्जी म्हणाले की, ‘या निर्णयामुळे अर्थव्यवस्थेची गती तात्पुरती मंदावलेली असू शकते, परंतु अर्थव्यवहारांत त्यामुळे अधिक पारदर्शकता येईल. आर्थिक वर्ष २०१६-२०१७ च्या पहिल्या सहा महिन्यांत अर्थव्यवस्था ७.२ टक्क्यांनी वाढली. त्या आधीच्या वर्षाच्या याच काळातही ती त्याच दराने होती,’ असे ते म्हणाले. आम्ही आर्थिक दृढीकरणाच्या मार्गावर ठामपणे चालत असून, चलनवाढही सुसह्य असल्याचे मुखर्जी म्हणाले. मूल्ये, सहिष्णुता, सोशिकता आणि इतरांबद्दल आदर राहिला, तर सुदृढ लोकशाही राहील. ही मूल्ये प्रत्येक भारतीयाच्या हृदयात व मनात राहिली पाहिजेत, असे आवाहनही त्यांनी केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)