शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

सलाहुदीनची भारतात परतण्याची इच्छा

By admin | Updated: July 6, 2015 01:06 IST

बंदी असणाऱ्या हिज्बुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा नेता सईद सलाहुद्दीन याला अजूनही भारतात परतण्याची इच्छा आहे, असे रॉ संघटनेचे माजी प्रमुख ए.एस. दुलात यांनी म्हटले आहे.

नवी दिल्ली : बंदी असणाऱ्या हिज्बुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा नेता सईद सलाहुद्दीन याला अजूनही भारतात परतण्याची इच्छा आहे, असे रॉ संघटनेचे माजी प्रमुख ए.एस. दुलात यांनी म्हटले आहे. सईद सलाहुद्दीन याच्या परतण्याचा कार्यक्रम ठरविण्यात सरकारने फार वेळ घेतला, असे दुलात यांना वाटते. २००१ पर्यंत सईद भारतात परतण्यास तयार होता. ही त्याची इच्छा मी अनेक वेळा सांगितली होती. माझ्यानंतरचे रॉचे प्रमुख विक्रम सूद यांना या प्रस्तावात रस नसावा. पंतप्रधान कार्यालयातून मी काश्मीर प्रश्न हाताळत असल्याने बाकीच्या कर्मचाऱ्यांनीही यात पडण्याची गरज नाही, असा निर्णय घेतला असावा, असे दुलात यांनी ‘काश्मीर : द वाजपेयी इअर्स’ या पुस्तकात म्हटले आहे. रॉतून २००० साली निवृत्त झाल्यानंतर दुलात वाजपेयी सरकारच्या काळात पंतप्रधान कार्यालयाचे काश्मीरवरील विशेष सल्लागार होते.  सलाहुद्दीनने माजी मुख्यमंत्री मीर कासीम यांच्याशी १९९० च्या मध्यात संपर्क साधला होता. मला विसरू नका, असे त्याने कासीम यांना सांगितले होते. तुम्ही वाटाघाटी करीत असाल तर मला विसरू नका, असे सलाहुद्दीन म्हणाला होता, असे दुलात यांनी या पुस्तकात म्हटले आहे. अजूनही मला संदेश मिळतात. २० वर्षांनंतरही आपले काही लोक पाकिस्तानात अडकले आहेत, असे दुलात यांचे म्हणणे आहे.--------------> दुलात यांनी हा प्रसंग वर्णन करताना असे म्हटले आहे की, तत्कालीन श्रीनगरमधील आय.बी. प्रमुख के.एम. सिंग यांना सलाहुद्दीनचा फोन आला होता. त्याच्या मुलाला भारतात मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश हवा होता. ते काम झाले आणि सलाहुद्दीनने आभार मानण्यासाठी पुन्हा सिंग यांना फोन केला. > त्याच्या या बोलण्यातून योग्य तो बोध घ्यायला हवा होता; पण तसे झाले नाही. अगदी कमी वेळेत घ्यायच्या या निर्णयसाठी वेळ वाया घालवला गेला. निर्णय झालाच नाही.