शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सलमानला नक्कीच जामीन मिळेल! वकिलांना खात्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 01:34 IST

सलमान गुरुवारपासून येथील तुरुंगात असला, तरी त्याच्या अल्विरा व अर्पिता या दोन्ही बहिणींचा मुक्काम अद्याप जोधपूरमध्येच आहे. त्या जामीन अर्जाचा उद्या काय निकाल लागतो, हे पाहण्यासाठी थांबल्या आहेत.

जोधपूर - सलमान गुरुवारपासून येथील तुरुंगात असला, तरी त्याच्या अल्विरा व अर्पिता या दोन्ही बहिणींचा मुक्काम अद्याप जोधपूरमध्येच आहे. त्या जामीन अर्जाचा उद्या काय निकाल लागतो, हे पाहण्यासाठी थांबल्या आहेत. तो निकाल आज लागेल, अशी त्यांची अपेक्षा होती. सलमानला निश्चितच जामीन मिळेल, असे त्याच्या वकिलांना वाटत आहे.अभिनेत्री प्रीती झिंटा हिने आज सकाळी तुरुंगात सलमानची भेट घेतली. सलमानला उद्या जामीन मिळेल व तो नंतर मुंबईला येईल, या अंदाजामुळे बॉलिवूडमधील कोणीही त्याला भेटण्यासाठी जोधपूरला आले नसल्याचे समजते. प्रीती आधीपासून राजस्थानात असल्याने ती भेटायला गेली, असे समजते. सलमानला जामीन मिळाल्यानंतर तो मुंबईत आला की मात्र बॉलिवूडमधील मंडळी त्याला भेटायला त्याच्या घरी जातील, असे सूत्रांनी सांगितले. हिंदी चित्रपटसृष्टीतील कोणालाही त्याला आताही भेटण्यात अडचण वाटत नाही. पण उद्या त्याची सुटका होण्याची शक्यता असल्याने कोणी आज जोधपूरला गेले नाही, असे सांगण्यात आले. (वृत्तसंस्था)सलमानच्या वकिलाला धमक्याजोधपूर सत्र न्यायालयासमोर सलमान खानची बाजू मांडणारे अ‍ॅड. महेश बोरा यांनी आपणास आज धमक्या देण्यात आल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, सलमानच्या जामीन अर्जाच्या सुनावणीला मी उपस्थित राहू नये, यासाठी मला धमक्या देण्यात आल्या. मला एसएमएस व इंटरनेट कॉलद्वारे धमकावण्यात आल्याचे अ‍ॅड बोरा यांनी न्यायालयाबाहेर पत्रकारांना सांगितले.वन्यजीवांच्या रक्षणासाठी बिष्णाई टायगर्स फोर्ससंपूर्णत  शाकाहारी असणाऱ्या समाजाने वन्यजीव संरक्षण कायद्याच्या उल्लंघनाची म्हणजेच जनावरांच्या शिकारीची आतापर्यंत ४00 हून अधिक प्रकरणे उघडकीस आणली असून, कित्येकांना तुरुंगातही पाठविले आहे. शिकार रोखणे व ती झाल्यास तक्रार नोंदवून तिचा पाठपुरावा करणे, यांत त्यांची बिष्णोई टायगर्स फोर्स ही संघटना सक्रिय असते. त्यामुळेच सलमान खानला काल शिक्षा होताच, बिष्णोई समाजाने न्यायालयाबाहेर आनंदोत्सव साजरा केला होता.न्यायालयात प्रकरण गेल्यावर साक्षीदार तिथे वेळेत पोहोचतील, व्यवस्थित साक्ष देतील, ते फुटणार नाहीत आणि पुराव्यात कोणत्याही त्रुटी राहू नयेत, याची काळजी ही संघटना घेते, असे फोर्सचे अध्यक्ष रामपाल भंवड यांनी सांगितले. वन्यजीवांचे संरक्षण करताना, बिष्णोई समाजाचे २0 हून अधिक लोक मरण पावले असल्याचा दावाही त्यांनी केला.

टॅग्स :Salman Khanसलमान खानBlackbuck poaching caseकाळवीट शिकार प्रकरणCourtन्यायालय