शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

सलमान खान दोषी नाही, सबळ पुराव्याचा अभाव - मुंबई हायकोर्ट

By admin | Updated: December 10, 2015 17:50 IST

हिट अँड रन प्रकरणात सलमान खानवरील आरोप सिद्ध करण्यास सरकारी पक्ष अपयशी ठरला असून केवळ संशयाच्या आधारे सलमानला दोषी ठरवता येणार नाही, असे मुंबई हायकोर्टाने म्हटले आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १० - मुंबई उच्च न्यायालयाने २००२ मधल्या हिट अँड रन प्रकरणी सबळ पुराव्याअभावी सर्व आरोपांमधून सलमान खानला मुक्त केले आणि बॉलीवूडमधल्या या सुपरस्टारच्या डोळ्यातआनंदाश्रू तरळले. सत्र न्यायालयाने सलमानला दारू पिऊन विनापरवाना गाडी चालवल्याबद्दल दोषी धरले होते आणि फूटपाथवर झोपलेल्यांना चिरडल्याप्रकरणी पाच वर्षांची शिक्षा ठोठावली होती. हायकोर्टातून तात्काळ जामीन मिळवत सलमानने त्यावेळी तुरुंगवारी वाचवली होती, परंतु हायकोर्टाच्या निकालाची टांगती तलवार त्याच्या मानेवर होती, जी आज उतरली.
सलमान सलीम खानने दाखल केलेली याचिका स्वीकारण्यात येत आहे आणि त्याच्याविरोधातील सर्व आरोपांमधून त्याला मुक्त करण्यात येत आहे, असा निकाल न्यायाधीश ए. आर. जोशी यांनी दिला आणि सलमानला प्रचंड दिलासा मिळाला. त्याला सत्र न्यायालयाने दिलेली शिक्षा रद्द करण्यात येत असल्याचे जोशी यांनी जाहीर केले. 
सलमानच्या वकिलांनी त्यानंतर कायदेशीर बाबी पूर्ण केल्या तर सलमान कुटुंबियांच्या घोळक्यात दाखल झाला. सलमानचा बॉडीगार्ड शेरा, त्याची बहीण अलविरा अग्निहोत्री, मेहुणा आयुष शर्मा सलमानसोबत होते. आज निकाल जाहीर होणार हे सकाळी निश्चित झाले आणि निकाल आरोपीच्या उपस्थितीतच सुनावला जात असल्याने कर्जतला शुटिंगमध्ये असलेला सलमान दुपारी दीडच्या सुमारास कोर्टात आला आणि खान कुटुंबियांसाठी शेवट गोड झाला. 
सलमानची बाजू कोर्टात मांडणा-या अमित देसाई या वकिलाचे सलमानने आभार मानले. 
 
काय म्हणाले न्यायाधीश ए. आर. जोशी
 
- सलमान खानवरील आरोप सिद्ध करण्यास सरकारी पक्ष अपयशी ठरला असून केवळ संशयाच्या आधारे सलमानला दोषी ठरवले जाऊ शकत नाही. 
- सलमान खान गाडी चालवत होता का, तो गाडी चालवत असेल तर दारू प्यायला होता का, गाडीचा अपघात टायर फुटल्यानंतर झाला की अपघातानंतर टायर फुटला या गोष्टी निर्विवादपणे सिद्ध करण्यास सरकारी वकिल पूर्णपणे अपयशी ठरले आहे.
- शिक्षा होण्यासाठी आरोप निर्विवाद सिद्ध व्हावा लागतो, केवळ परिस्थितीजन्य पुरावा, जनमत आणि प्रसारमाध्यमांमधील चर्चा याआधारे शिक्षा देता येत नाही.
- मृत शरीररक्षक रवींद्र पाटील याने सलमान गाडी चालवत होता ही साक्ष दिली होती. परंतु हा साक्षीदार संपूर्णपणे विश्वासार्ह नाही.
 
काय आहे हे प्रकरण
 
२००२ साली अभिनेता सलमान खानने दारूच्या नशेत बेदरकारपणे गाडी चालवून वांद्रे येथील फूटपाथवरील लोकांना चिरडले, असा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला होता. या अपघातात एकाचा मृत्यू तर चार जण जखमी झाले होते. याप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने सलमानला दोषी ठरवत त्याला पाच वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर हायकोर्टात जामीन मिळवत सलमानने तुरुंगवारी वाचवली होती. त्यामुळे उच्च न्यायालय काय निर्णय देते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.