शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

सलमान खान दोषी नाही, सबळ पुराव्याचा अभाव - मुंबई हायकोर्ट

By admin | Updated: December 10, 2015 17:50 IST

हिट अँड रन प्रकरणात सलमान खानवरील आरोप सिद्ध करण्यास सरकारी पक्ष अपयशी ठरला असून केवळ संशयाच्या आधारे सलमानला दोषी ठरवता येणार नाही, असे मुंबई हायकोर्टाने म्हटले आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १० - मुंबई उच्च न्यायालयाने २००२ मधल्या हिट अँड रन प्रकरणी सबळ पुराव्याअभावी सर्व आरोपांमधून सलमान खानला मुक्त केले आणि बॉलीवूडमधल्या या सुपरस्टारच्या डोळ्यातआनंदाश्रू तरळले. सत्र न्यायालयाने सलमानला दारू पिऊन विनापरवाना गाडी चालवल्याबद्दल दोषी धरले होते आणि फूटपाथवर झोपलेल्यांना चिरडल्याप्रकरणी पाच वर्षांची शिक्षा ठोठावली होती. हायकोर्टातून तात्काळ जामीन मिळवत सलमानने त्यावेळी तुरुंगवारी वाचवली होती, परंतु हायकोर्टाच्या निकालाची टांगती तलवार त्याच्या मानेवर होती, जी आज उतरली.
सलमान सलीम खानने दाखल केलेली याचिका स्वीकारण्यात येत आहे आणि त्याच्याविरोधातील सर्व आरोपांमधून त्याला मुक्त करण्यात येत आहे, असा निकाल न्यायाधीश ए. आर. जोशी यांनी दिला आणि सलमानला प्रचंड दिलासा मिळाला. त्याला सत्र न्यायालयाने दिलेली शिक्षा रद्द करण्यात येत असल्याचे जोशी यांनी जाहीर केले. 
सलमानच्या वकिलांनी त्यानंतर कायदेशीर बाबी पूर्ण केल्या तर सलमान कुटुंबियांच्या घोळक्यात दाखल झाला. सलमानचा बॉडीगार्ड शेरा, त्याची बहीण अलविरा अग्निहोत्री, मेहुणा आयुष शर्मा सलमानसोबत होते. आज निकाल जाहीर होणार हे सकाळी निश्चित झाले आणि निकाल आरोपीच्या उपस्थितीतच सुनावला जात असल्याने कर्जतला शुटिंगमध्ये असलेला सलमान दुपारी दीडच्या सुमारास कोर्टात आला आणि खान कुटुंबियांसाठी शेवट गोड झाला. 
सलमानची बाजू कोर्टात मांडणा-या अमित देसाई या वकिलाचे सलमानने आभार मानले. 
 
काय म्हणाले न्यायाधीश ए. आर. जोशी
 
- सलमान खानवरील आरोप सिद्ध करण्यास सरकारी पक्ष अपयशी ठरला असून केवळ संशयाच्या आधारे सलमानला दोषी ठरवले जाऊ शकत नाही. 
- सलमान खान गाडी चालवत होता का, तो गाडी चालवत असेल तर दारू प्यायला होता का, गाडीचा अपघात टायर फुटल्यानंतर झाला की अपघातानंतर टायर फुटला या गोष्टी निर्विवादपणे सिद्ध करण्यास सरकारी वकिल पूर्णपणे अपयशी ठरले आहे.
- शिक्षा होण्यासाठी आरोप निर्विवाद सिद्ध व्हावा लागतो, केवळ परिस्थितीजन्य पुरावा, जनमत आणि प्रसारमाध्यमांमधील चर्चा याआधारे शिक्षा देता येत नाही.
- मृत शरीररक्षक रवींद्र पाटील याने सलमान गाडी चालवत होता ही साक्ष दिली होती. परंतु हा साक्षीदार संपूर्णपणे विश्वासार्ह नाही.
 
काय आहे हे प्रकरण
 
२००२ साली अभिनेता सलमान खानने दारूच्या नशेत बेदरकारपणे गाडी चालवून वांद्रे येथील फूटपाथवरील लोकांना चिरडले, असा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला होता. या अपघातात एकाचा मृत्यू तर चार जण जखमी झाले होते. याप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने सलमानला दोषी ठरवत त्याला पाच वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर हायकोर्टात जामीन मिळवत सलमानने तुरुंगवारी वाचवली होती. त्यामुळे उच्च न्यायालय काय निर्णय देते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.