शहरं
Join us  
Trending Stories
1
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
2
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
3
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
4
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
5
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
6
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
7
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
8
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
9
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
10
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
11
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
12
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
13
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
14
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
15
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
16
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
17
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
18
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
19
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
20
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?

सलमान खान दोषी नाही, सबळ पुराव्याचा अभाव - मुंबई हायकोर्ट

By admin | Updated: December 10, 2015 17:50 IST

हिट अँड रन प्रकरणात सलमान खानवरील आरोप सिद्ध करण्यास सरकारी पक्ष अपयशी ठरला असून केवळ संशयाच्या आधारे सलमानला दोषी ठरवता येणार नाही, असे मुंबई हायकोर्टाने म्हटले आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १० - मुंबई उच्च न्यायालयाने २००२ मधल्या हिट अँड रन प्रकरणी सबळ पुराव्याअभावी सर्व आरोपांमधून सलमान खानला मुक्त केले आणि बॉलीवूडमधल्या या सुपरस्टारच्या डोळ्यातआनंदाश्रू तरळले. सत्र न्यायालयाने सलमानला दारू पिऊन विनापरवाना गाडी चालवल्याबद्दल दोषी धरले होते आणि फूटपाथवर झोपलेल्यांना चिरडल्याप्रकरणी पाच वर्षांची शिक्षा ठोठावली होती. हायकोर्टातून तात्काळ जामीन मिळवत सलमानने त्यावेळी तुरुंगवारी वाचवली होती, परंतु हायकोर्टाच्या निकालाची टांगती तलवार त्याच्या मानेवर होती, जी आज उतरली.
सलमान सलीम खानने दाखल केलेली याचिका स्वीकारण्यात येत आहे आणि त्याच्याविरोधातील सर्व आरोपांमधून त्याला मुक्त करण्यात येत आहे, असा निकाल न्यायाधीश ए. आर. जोशी यांनी दिला आणि सलमानला प्रचंड दिलासा मिळाला. त्याला सत्र न्यायालयाने दिलेली शिक्षा रद्द करण्यात येत असल्याचे जोशी यांनी जाहीर केले. 
सलमानच्या वकिलांनी त्यानंतर कायदेशीर बाबी पूर्ण केल्या तर सलमान कुटुंबियांच्या घोळक्यात दाखल झाला. सलमानचा बॉडीगार्ड शेरा, त्याची बहीण अलविरा अग्निहोत्री, मेहुणा आयुष शर्मा सलमानसोबत होते. आज निकाल जाहीर होणार हे सकाळी निश्चित झाले आणि निकाल आरोपीच्या उपस्थितीतच सुनावला जात असल्याने कर्जतला शुटिंगमध्ये असलेला सलमान दुपारी दीडच्या सुमारास कोर्टात आला आणि खान कुटुंबियांसाठी शेवट गोड झाला. 
सलमानची बाजू कोर्टात मांडणा-या अमित देसाई या वकिलाचे सलमानने आभार मानले. 
 
काय म्हणाले न्यायाधीश ए. आर. जोशी
 
- सलमान खानवरील आरोप सिद्ध करण्यास सरकारी पक्ष अपयशी ठरला असून केवळ संशयाच्या आधारे सलमानला दोषी ठरवले जाऊ शकत नाही. 
- सलमान खान गाडी चालवत होता का, तो गाडी चालवत असेल तर दारू प्यायला होता का, गाडीचा अपघात टायर फुटल्यानंतर झाला की अपघातानंतर टायर फुटला या गोष्टी निर्विवादपणे सिद्ध करण्यास सरकारी वकिल पूर्णपणे अपयशी ठरले आहे.
- शिक्षा होण्यासाठी आरोप निर्विवाद सिद्ध व्हावा लागतो, केवळ परिस्थितीजन्य पुरावा, जनमत आणि प्रसारमाध्यमांमधील चर्चा याआधारे शिक्षा देता येत नाही.
- मृत शरीररक्षक रवींद्र पाटील याने सलमान गाडी चालवत होता ही साक्ष दिली होती. परंतु हा साक्षीदार संपूर्णपणे विश्वासार्ह नाही.
 
काय आहे हे प्रकरण
 
२००२ साली अभिनेता सलमान खानने दारूच्या नशेत बेदरकारपणे गाडी चालवून वांद्रे येथील फूटपाथवरील लोकांना चिरडले, असा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला होता. या अपघातात एकाचा मृत्यू तर चार जण जखमी झाले होते. याप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने सलमानला दोषी ठरवत त्याला पाच वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर हायकोर्टात जामीन मिळवत सलमानने तुरुंगवारी वाचवली होती. त्यामुळे उच्च न्यायालय काय निर्णय देते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.