शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
2
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
3
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
4
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
5
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
6
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
7
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
8
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
9
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
10
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
11
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
12
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
13
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
14
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
15
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
16
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
17
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ
18
क्या बात! रितेश देशमुखच्या आईसाहेबांनी बल्बच्या प्रकाशात घेतलं ड्रॅगन फ्रूटचं पीक; सूनबाईंना कौतुक, शेअर केला व्हिडीओ
19
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

संत तुकाराम महाराज पालखी सोहळा जोड व चौकटी

By admin | Updated: July 10, 2015 23:13 IST

संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्याचे सायंकाळी फर्ग्युसन रस्त्यावर आगमन होणार असल्याने दुपारपासून शिवाजीनगर परिसरातील नागरिकांनी रस्त्यावर दुर्तफा गर्दी केली होती. फर्ग्युसन रस्त्यावर सुरेख रांगोळया काढण्यात आल्या होत्या. ज्ञानेश्वर पादुका चौकातील मंदिरामध्ये स्पिकरवर अभंगवाणी लावण्यात आल्याने भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. युवक -युवती, लहान मुले, महिला, ज्येष्ठ ...


संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्याचे सायंकाळी फर्ग्युसन रस्त्यावर आगमन होणार असल्याने दुपारपासून शिवाजीनगर परिसरातील नागरिकांनी रस्त्यावर दुर्तफा गर्दी केली होती. फर्ग्युसन रस्त्यावर सुरेख रांगोळया काढण्यात आल्या होत्या. ज्ञानेश्वर पादुका चौकातील मंदिरामध्ये स्पिकरवर अभंगवाणी लावण्यात आल्याने भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. युवक -युवती, लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक मोठया आतुरतेने पालखीची वाट पाहत होते. सायंकाळी सात वाजता संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे फर्ग्युसन रस्त्यावर आगमन झाले. पालखीचे दर्शन घेण्यासाठी नागरिकांची एकच झुंबड उडाली. पादुकांना स्पर्श करून दर्शन घेतल्यानंतर कृतकृत्य झाल्याची भावना भाविकांच्या चेहर्‍यावर दिसून येत होती.
संत तुकाराम महाराजांची पालखी फर्ग्युसन रस्त्यावर आल्यानंतर वरूणराजाने हलक्या सरींचा वर्षाव करीत पालखीचे स्वागत केले. संत तुकाराम पादुका मंदिराजवळ पालखी आल्यानंतर दरवर्षीप्रमाणे मोठया उत्साहात सायंकाळी सव्वा सात वाजता आरती करण्यात आली. हरीनामाचा जयघोष करीत पालखी पुढे सरकत होती. वारकर्‍यांना राजगिर्‍याचे लाडू, बिस्किट, पाणी यांचे वाटप केले जात होते. अभंग म्हणत, विठठ्लाचे गुणगाण करीत पालखी पुढे सरकत होती.

चौकट
अन् अश्रूंचा बांध फुटला
सासू आणि सुन या दोघी मिळून पालखीच्या दर्शनासाठी आलेल्या होत्या. संत तुकाराम महाराजांची पालखी आल्यानंतर अचानक मोठी गर्दी झाली, या गर्दीत रानडे इन्टिटयूटजवळ थांबलेल्या सासू व सुना यांची तुटातुट झाली. दोघींनीही एकमेंकींची शोधाशोध सुरू केली. सासूचा मोबाइल सुनेच्याच पर्समध्ये असल्याने आणखीनच अडचण निर्माण झाली. सासू सापडत नसल्याने सुनबाई खूपच घाबरून गेल्या होत्या. डोळयात पाणी आणून त्या सासूचा शोध घेत होत्या. अखेर काही वेळाने सासूबाई त्यांना भेटल्या, त्यावेळी सूनेने खूप वेळापासून रोखून धरलेला अश्रूंचा बांध फुटला. दोघींनी एकमेंकींना गच्च मिठी मारली.
................

चौकट
वाटपाच्या साहित्याची फेकाफेकी
पालखी सोहळयात सहभागी झालेल्या वारकर्‍यांना वाटण्यासाठी अनेकांनी राजगिर्‍याचे लाडू, बिस्किट, पाण्याच्या बॉटल आणल्या होत्या. पालखी आल्यानंतर मोठी गर्दी झाल्याने या साहित्याचे वाटप करण्यासाठी वारकर्‍यांपर्यंत पोहचता येईना. त्यावेळी राजगिर्‍याचे लाडू, बिस्किटचे पुडे दिंडीतील वारकर्‍यांच्या अंगावर फेकले जाऊ लागले. वारकर्‍यांना ते जोरात लागत होते, हा चुकीचा प्रकार यावेळी दिसून आला.
..............