शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

फूस लावणाऱ्यांनो, उत्तर द्यावे लागेल

By admin | Updated: August 29, 2016 02:46 IST

एकता आणि प्रेम हाच काश्मीर प्रश्नावर मूलमंत्र आहे, असे सांगतानाच अशांततेसाठी मुलांना फूस देणाऱ्यांना एक दिवस या ‘निष्पापांसमोर’ उत्तर द्यावे लागेल, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले

नवी दिल्ली : एकता आणि प्रेम हाच काश्मीर प्रश्नावर मूलमंत्र आहे, असे सांगतानाच अशांततेसाठी मुलांना फूस देणाऱ्यांना एक दिवस या ‘निष्पापांसमोर’ उत्तर द्यावे लागेल, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. काश्मिरात जर कुठल्याही व्यक्तीचा किंवा सुरक्षा कर्मचाऱ्याचा जीव जात असेल तर ते आमच्या देशाचे नुकसान आहे, असेही ते म्हणाले. मोदी यांनी आपल्या ‘मन की बात’मधून हे मत व्यक्त केले. ते म्हणाले, काश्मीर प्रश्नावर सर्वपक्षीयांशी चर्चा केल्यानंतर एक बाब प्रामुख्याने समोर आली आहे. ती म्हणजे प्रेम आणि एकता. काश्मीरवर सर्व राजकीय पक्षांनी एका सुरात यावर मत व्यक्त केले आहे. हा संदेश पूर्ण जगात आणि फुटीरवाद्यांपर्यंत पोहोचला आहे. काश्मीरच्या लोकांपर्यंत या माध्यमातून आमच्या भावना पोहोचल्या आहेत. मोदी यांनी या एकीची संसदेतील जीएसटी विधेयकाशी तुलना केली. मोदी म्हणाले की, ही सर्वांची भावना आहे, अगदी गावातील सरपंचापासून ते पंतप्रधानांपर्यंत १२५ कोटी नागरिकांना असे वाटते की, काश्मिरात एकाही व्यक्तीचा मृत्यू होत असेल तर ते देशाचे नुकसान आहे. ‘मन की बात’ कार्यक्रमात मोदी यांनी आॅलिम्पिकमधील महिला शक्तीचे कौतुक केले. बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू व साक्षी मलिकचा उल्लेख केला. जिम्नॅस्टिक दीपा कर्माकर हिचेही त्यांनी कौतुक केले.मोदींच्या निषेधाचा ठराव बलुच प्रांतिक मंडळातपंतप्रधान मोदी यांनी स्वातंत्र्य दिनी केलेल्या भाषणात पाकिस्तानचा प्रांत बलुचिस्तानबाबत केलेल्या उल्लेखाबद्दल त्यांचा निषेध करणारा ठराव बलुचिस्तान प्रांतिक कायदे मंडळात एकमताने संमत करण्यात आला. पाकिस्तान मुस्लीम लीगचे (नवाज) प्रतिनिधी मुहम्मद खान लेहरी यांनी हा ठराव सभागृहात मांडला तर मुख्यमंत्री सनाउल्ला जेहरी यांनी त्यावर सही केली. तत्पूर्वी, सगळ्या पक्षांनी या ठरावाला अनुमोदन दिले होते.पाकविरोधात निदर्शने : काश्मीर प्रश्नाला आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानची शनिवारी मोठी कोंडी झाली. जर्मनीच्या लेपझिग शहरात बलुचिस्तानातील काही डझन निर्वासितांनी पाकिस्तानविरोधात व नरेंद्र मोदी यांच्या बाजूच्या घोषणा दिल्या. निदर्शकांच्या हातात भारताचे ध्वज होते. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी काश्मीर प्रश्नाला आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्यासाठी २२ लोकप्रतिनिधींच्या नियुक्तीची घोषणा केल्यानंतर ही निदर्शने झाली.आपल्या चुकांमुळेच काश्मिरी तरुण उतरताहेत रस्त्यावरआपण सर्वांनी केलेल्या चुकांमुळेच आज काश्मिरी तरुण रस्त्यावर उतरत आहे, असे मत काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी व्यक्त केले, तर ‘मन की बात’ कार्यक्रमात मोदी यांनी काश्मीरचा उल्लेख केल्याबद्दल त्यांनी मोदी यांचे कौतुक केले. ओमर यांनी टिष्ट्वट केले की, गत आठवड्यात विरोधी पक्षांशी चर्चा केल्यानंतर मोदी यांनी या प्रकरणी पुढची वाटचाल सुरू केली आहे. हे पाहून चांगले वाटत आहे. दगडफेकीच्या घटनांबाबत मोदी यांच्या वक्तव्याचा धागा पकडून ओमर म्हणाले की, आमच्या सर्वांच्या चुकीमुळे आज काही तरुण या आंदोलनाचे शिकार बनले आहेत. यापूर्वी ‘मन की बात’ कार्यक्रमात काश्मीरचा उल्लेख न केल्याने ओमर यांनी मोदींवर टीका केली होती. एकावन्न दिवसांच्या संचारबंदीच्या काळात काश्मीरमधे ७0 लोक ठार तर सुरक्षा दलाच्या जवानांसह सुमारे ७५00 लोक जखमी झाले. हल्लेखोरांनी३0 पोलीस ठाण्यांसह काही सरकारी इमारतींवर चढवलेल्या हल्ल्यात, पोलीस दलाचे ४ जवान व निमलष्करी दलाचा एक अधिकारी हिंसाचारात ठार झाला. अतिरेकी निदर्शकांनी १४१ रुग्णवाहिकांसह ३00 सरकारी वाहनांवर हल्ले चढवून यापैकी काही वाहनांना आग लावून दिली. हा हिंसाचार रोखण्यासाठी पॅलेट गनद्वारा १६ लाख पॅलेटसचा वापर करण्यात आला. त्यात ४00 तरुणांच्या डोळ्यांना इजा झाली. यापैकी १00 जणांच्या डोळ्यांची शस्त्रक्रिया करावी लागली.