नवी दिल्ली : अभिनेता सैफ अली खान याने मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये केलेली मारपीट त्याच्या अंगलट येऊ शकते. मुंबई न्यायालयाने त्याच्यावर आरोप निश्चित केल्याचे पाहता त्याला देण्यात आलेला पद्म पुरस्कार परत घेण्याची मागणी जोर धरू लागली असून सरकारने त्याबाबत चाचपणी चालवली आहे.
आरटीआय कार्यकर्ते एस.सी. अग्रवाल यांनी 14 मार्च रोजी केंद्रीय गृहमंत्रलयाकडे सादर केलेल्या तक्रारीत सैफचा पुरस्कार मागे घेण्याची विनंती केली होती. सैफला 2क्1क् मध्ये पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले आहे.
या प्रकरणी अभ्यास केला जात असल्याचे उत्तर गृहमंत्रलयाकडून मिळाले असल्याचे अग्रवाल यांनी सांगितले आहे. आपल्या तक्रारीबाबत काय स्थिती आहे अशी विचारणा त्यांनी एका अर्जात केली होती. (लोकमत न्यूज नेटवर्क)