शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

साहित्य अकादमीचे राजकारण नको - विश्वनाथ प्रसाद तिवारी

By admin | Updated: October 7, 2015 16:06 IST

दादरीतील घटनेच्या निषेधार्थ नयतनारा सेहगल व अशोक वाजपेयी यांनी साहित्य अकादमी पुरस्करा परत करण्याच्या प्रकारावर साहित्य अकादमीचे अध्यक्ष विश्वनाथ प्रसाद तिवारी यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली, दि . ७ -  दादरीतील घटनेच्या निषेधार्थ नयतनारा सेहगल व अशोक वाजपेयी यांनी साहित्य अकादमी पुरस्करा परत करण्याच्या प्रकारावर साहित्य अकादमीचे अध्यक्ष विश्वनाथ प्रसाद तिवारी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. साहित्य अकादमीसारख्या  स्वायत्त संस्थेचे राजकारण करु नका असे त्यांनी म्हटले असून पुरस्कार परत केला तरी या पुरस्कारामुळे मिळालेला सन्मान व प्रतिष्ठेच काय करणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. 
दादरीत गोमांस ठेवल्याच्या संशयावरुन जमावाने एका मुस्लिम व्यक्तीची हत्या केली होती. या घटनेनंतर अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि जगण्याच्या अधिकार हे दोन मुलभूत हक्कांची पायमल्ली होत असल्याची टीका करत मंगळवारी नयनतारा सेहगल तर  बुधवारी अशोक वाजपेयी यांनी साहित्य अकादमी पुरस्कार केला आहे. या पार्श्वभूमीवर साहित्य अकादमीचे प्रमुख विश्वनाथ प्रसाद तिवारी यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये या प्रकारावर नाराजी व्यक्त केली. तिवारी म्हणाले, साहित्य अकादमी ही सरकारी संस्था नसून ही एक स्वायत्त संस्था आहे. लेखकाला त्याच्या एका ठराविक कामासाठी हा पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार पद्म पुरस्कारासारखा नसल्याने तो पुरस्कार परत करण्यात काहीच अर्थ नाही असे तिवारींनी नमूद केले. 
साहित्य अकादमी गेल्या ६० वर्षांपासून अधिक काळ कार्यरत आहे.  साहित्य क्षेत्राला पुढे नेणे हीच अकादमीची मुख्य भूमिका आहे. इमर्जन्सीच्या काळातही अकादमीने कोणतीही भूमिका घेतली नव्हती अशी आठवणही त्यांनी करुन दिली. लेखक हे अकादमीचा नव्हे तर सरकारचा विरोध करत आहे, त्यामुळे त्यांनी पुरस्कार परत करण्याऐवजी अन्य मार्गांनी विरोध दर्शवला पाहिजे असे तिवारी यांनी स्पष्ट केले.