शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा ‘निकाल’ लागताच राज ठाकरे-CM फडणवीस भेट; पाऊण तास चर्चा, तर्कांना उधाण
2
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
3
"श्री गणेश करते हैं..."; जेव्हा रशियन राजदूतांनी हिंदीमध्ये सुरू केली पत्रकार परिषद! 'सुदर्शन चक्र'चा उल्लेख करत दिलं मोठं आश्वासन, बघा VIDEO
4
हाय स्पीड कॅमेरे, सेन्सर अन् 3D मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजीसह या गोलंदाजाची अ‍ॅक्शन रेकॉर्ड केली जाणार
5
इंजिनीअर तरुणाने आईच्या मदतीने पत्नीला संपवलं, मृतदेह चादरीत गुंडाळला अन्...; कारण ऐकून होईल संताप!
6
ड्रीम११ आणि My11Circle चे भविष्य धोक्यात? ऑनलाइन गेमिंग बिलामुळे 'हे' प्लॅटफॉर्म कायमचे बंद होणार?
7
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
8
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत
9
पत्नीचा मृतदेह पाहून पतीला बसला धक्का, एका कोपऱ्यात बसला आणि तासाभरातच...  
10
Ramayana चित्रपटातील 'राम' Ranbir Kapoor नं 'या' कंपनीत केली मोठी गुंतवणूक; शेअर करुन देतोय जबरदस्त कमाई
11
Ganesh Chaturthi 2025: बाप्पा आपल्या भेटीला येतोय, पण कधी 'या' गुप्त गणेश मंदिरात बाप्पाची भेट घ्या!
12
शिल्पा शेट्टीच्या रेस्टॉरंटमध्ये पोहोचली 'सावली', प्राप्ती रेडकरचा ग्लॅम लूक; सोबत दिसली 'भैरवी'
13
शाळेत मारल्याच्या रागातून नववीतील विद्यार्थ्याने शिक्षकावर झाडली गोळी, लंच बॉक्समधून आणला कट्टा आणि...  
14
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
15
OMG! आर्यन खानची पहिलीच सीरिज आग लावणार, प्रीव्ह्यूच्या शेवटी 'त्या' डायलॉगने वेधलं लक्ष
16
अमेरिकेची 'मोस्ट वॉन्टेड' महिला अखेर भारतात सापडली, एफबीआयने केली मोठी कारवाई!
17
BEST Election Results: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
18
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
20
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली

साहित्य अकादमीची ‘दलित चेतना’ आता देशभर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2019 15:50 IST

साहित्य अकादमीने ‘दलित चेतना’ या नावाने केवळ दलित लेखकांसाठी स्थापन केलेले व्यासपीठ सध्या केवळ दिल्लीपुरता मर्यादित असून लवकरच ते संपूर्ण देशात पोहोचणार आहे.

नितीन नायगांवकर

नवी दिल्ली - साहित्य अकादमीने ‘दलित चेतना’ या नावाने केवळ दलित लेखकांसाठी स्थापन केलेले व्यासपीठ सध्या केवळ दिल्लीपुरता मर्यादित असून लवकरच ते संपूर्ण देशात पोहोचणार आहे. अकादमीच्या मुंबई, कोलकाता आणि बंगळुरू येथील प्रादेशिक कार्यालयांना अलीकडेच पत्राद्वारे सूचना देण्यात आल्या आहेत. 

साहित्य अकादमीच्या प्रत्येक कार्यक्रमात साहित्यातील सर्व घटकांना सामावून घेण्याचा प्रयत्न होतोय. दलित साहित्यदेखील यातून सुटलेले नाही. अकादमीने खास या समाजातील लेखकांसाठी संमेलनेही आयोजित केली. यात महाराष्ट्राचे योगदान मोठे राहिलेले आहे. परंतु, तरीही दलित समाजातील लेखक वर्गाला पूर्णपणे सामावून घेण्यात अकादमीला यश आलेले नाही. त्यामुळे खास दलित लेखकांसाठी ‘दलित चेतना’ या उपक्रमाची सुरुवात अकादमीने दोन महिन्यांपूर्वी केली. दर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दिल्लीमध्ये याअंतर्गत कार्यक्रमाचे आयोजन होत असते. या मालिकेतील दोन कार्यक्रम झाले आहेत. यात विविध राज्यांच्या दलित लेखकांना आमंत्रित करण्यात आले. कथावाचन, कविता, पुस्तकांवरील चर्चा, सामाजिक विषयांवरील चर्चा असे या कार्यक्रमाचे स्वरुप आहे. तिसरा कार्यक्रम या महिन्याच्या अखेरीस दिल्लीत होईल. पण, हा उपक्रम दिल्लीतपुरता मर्यादित ठेवला तर उद्देश साध्य होणार नाही, याचा विचार करून साहित्य अकादमीने तिन्ही प्रादेशिक कार्यालयांना याअंतर्गत कार्यक्रम आयोजित करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

देशातील सर्व २४ भाषांमधील दलित लेखक यात सहभागी करून घेण्यासाठी ‘दलित चेतना’ राजधानीतून बाहेर पडणार आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत या समाजातील नवलेखक-कवींचे साहित्य पोहोचावे, या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे, असे अकादमीचे सचिव डॉ. के. श्रीनिवास राव यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. मुंबईतील प्रादेशिक कार्यालयांतर्गत महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा ही तीन राज्ये येतात. त्यामुळे मुंबईतच कार्यक्रम होईल असे नाही. महाराष्ट्राच्या कुठल्याही गावात, शहरात ‘दलित चेतना’चे आयोजन होऊ शकेल, असेही डॉ. राव म्हणाले. 

खास दलित लेखकांसाठी स्वतंत्र व्यासपीठ असावे, अशी ‘दलित चेतना’ या उपक्रमामागची कल्पना होती. देशभरात त्याचा विस्तार व्हावा, या उद्देशाने प्रादेशिक कार्यालयांना पत्र पाठविण्यात आले आहे.

- डॉ. के. श्रीनिवास राव, सचिव, साहित्य अकादमी

टॅग्स :literatureसाहित्य