शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

साहित्य अकादमीची ‘दलित चेतना’ आता देशभर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2019 15:50 IST

साहित्य अकादमीने ‘दलित चेतना’ या नावाने केवळ दलित लेखकांसाठी स्थापन केलेले व्यासपीठ सध्या केवळ दिल्लीपुरता मर्यादित असून लवकरच ते संपूर्ण देशात पोहोचणार आहे.

नितीन नायगांवकर

नवी दिल्ली - साहित्य अकादमीने ‘दलित चेतना’ या नावाने केवळ दलित लेखकांसाठी स्थापन केलेले व्यासपीठ सध्या केवळ दिल्लीपुरता मर्यादित असून लवकरच ते संपूर्ण देशात पोहोचणार आहे. अकादमीच्या मुंबई, कोलकाता आणि बंगळुरू येथील प्रादेशिक कार्यालयांना अलीकडेच पत्राद्वारे सूचना देण्यात आल्या आहेत. 

साहित्य अकादमीच्या प्रत्येक कार्यक्रमात साहित्यातील सर्व घटकांना सामावून घेण्याचा प्रयत्न होतोय. दलित साहित्यदेखील यातून सुटलेले नाही. अकादमीने खास या समाजातील लेखकांसाठी संमेलनेही आयोजित केली. यात महाराष्ट्राचे योगदान मोठे राहिलेले आहे. परंतु, तरीही दलित समाजातील लेखक वर्गाला पूर्णपणे सामावून घेण्यात अकादमीला यश आलेले नाही. त्यामुळे खास दलित लेखकांसाठी ‘दलित चेतना’ या उपक्रमाची सुरुवात अकादमीने दोन महिन्यांपूर्वी केली. दर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दिल्लीमध्ये याअंतर्गत कार्यक्रमाचे आयोजन होत असते. या मालिकेतील दोन कार्यक्रम झाले आहेत. यात विविध राज्यांच्या दलित लेखकांना आमंत्रित करण्यात आले. कथावाचन, कविता, पुस्तकांवरील चर्चा, सामाजिक विषयांवरील चर्चा असे या कार्यक्रमाचे स्वरुप आहे. तिसरा कार्यक्रम या महिन्याच्या अखेरीस दिल्लीत होईल. पण, हा उपक्रम दिल्लीतपुरता मर्यादित ठेवला तर उद्देश साध्य होणार नाही, याचा विचार करून साहित्य अकादमीने तिन्ही प्रादेशिक कार्यालयांना याअंतर्गत कार्यक्रम आयोजित करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

देशातील सर्व २४ भाषांमधील दलित लेखक यात सहभागी करून घेण्यासाठी ‘दलित चेतना’ राजधानीतून बाहेर पडणार आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत या समाजातील नवलेखक-कवींचे साहित्य पोहोचावे, या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे, असे अकादमीचे सचिव डॉ. के. श्रीनिवास राव यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. मुंबईतील प्रादेशिक कार्यालयांतर्गत महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा ही तीन राज्ये येतात. त्यामुळे मुंबईतच कार्यक्रम होईल असे नाही. महाराष्ट्राच्या कुठल्याही गावात, शहरात ‘दलित चेतना’चे आयोजन होऊ शकेल, असेही डॉ. राव म्हणाले. 

खास दलित लेखकांसाठी स्वतंत्र व्यासपीठ असावे, अशी ‘दलित चेतना’ या उपक्रमामागची कल्पना होती. देशभरात त्याचा विस्तार व्हावा, या उद्देशाने प्रादेशिक कार्यालयांना पत्र पाठविण्यात आले आहे.

- डॉ. के. श्रीनिवास राव, सचिव, साहित्य अकादमी

टॅग्स :literatureसाहित्य